शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

सव्वाशे वर्षापूर्वी प्रभावी आपत्ती व्यवस्थापन, एकाचाही मृत्यू झाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:11 IST

अशीच एक घटना सव्वाशे वर्षापूर्वी घडली होती. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात अलकनंदा नदीची एक उपनदी आहे. तिचे नाव विरही गंगा ...

अशीच एक घटना सव्वाशे वर्षापूर्वी घडली होती. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात अलकनंदा नदीची एक उपनदी आहे. तिचे नाव विरही गंगा आहे. १८९३ मध्ये एक डोंगर खचल्यामुळे नदीचा प्रवाह बंद झाला. त्यावेळी पावसाचे दिवस होते. जवळच्या गावकऱ्यांनी इंग्रजांना याची माहिती दिल्यानंतर ते ताबडतोब सक्रिय झाले. सुमारे पावणे दोनशे किलोमीटर दूर असलेल्या हरिद्वारच्या रायवाला येथील अधीक्षक अभियंता ले. कर्नल पुलफोर्ड यांनी तत्काळ आपल्या अभियंत्यांना घटनास्थळावर पाठवले. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तो बांध भरण्यासाठी एक वर्ष लागेल असा अंदाज लावण्यात आला. तसेच, बांध फुटल्यास मोठे नुकसान होईल अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली. त्या बांधाला गौना ताल नाव देण्यात आले. कर्नल पुलफोर्ड यांनी त्यांच्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांना बांधावरच तैनात ठेवले. तेथून रायवालापर्यंत टेलिग्राफ लाईन टाकण्यात आली. तो टेलिग्राफ म्हणजे तार, जो गेल्यावर्षी संपुष्टात आला. ती टेलिग्राफ लाईन डोंगरांवरील जंगलात झाडांवर ठोकून लावण्यात आली. बांधावर सतत लक्ष ठेवले जात होते. दरम्यान, बांध तीन किलोमीटर लांब झाला. इंग्रजांनी जवळच गेस्ट हाऊस बांधले. तेथून बांध स्पष्ट दिसत होता. बांधाच्या पाण्यात बोटिंग व मासेमारी सुरू झाली. तो बांध भूवैज्ञानिकांसाठी कुतूहलाचा विषय झाला. त्यावेळचे सर्वात मोठे भूवैज्ञानिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले. दरम्यान, तो बांध १५ ऑगस्ट १८९४ रोजी फुटण्याचा अंदाज लावण्यात आला. इंग्रजांनी नागरिकांना हटवण्यास सुुरुवात केली. त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले. अलकनंदा नदीवरील काही पूल हटवण्यात आले. त्यानंतर २७ ऑगस्ट १८९४ रोजी तो बांध फुटला व चमोली, रुद्रप्रयाग, श्रीनगर, ऋषिकेश, हरिद्वार या भागात मोठे नुकसान झाले. या घटनेला कुणीच थांबवू शकत नव्हते, पण विशेष म्हणजे या घटनेत एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.

८५ वर्षानंतर १९७० मध्ये तो बांध दुसऱ्यांदा फुटल्यानंतर जनधनाचे मोठे नुकसान झाले होते. त्यावरून इंग्रजांनी केलेले आपत्ती व्यवस्थापन किती उत्तम होते हे दिसून येते. देशविदेशातील तज्ज्ञ आजही त्या व्यवस्थापनाला सन्मानासह स्मरण करतात. परंतु, आपल्या सरकारकरिता ही घटना केवळ फाईलमधील एक उल्लेख आहे. त्यातून काही शिकण्याची कुणाचीच इच्छा नाही.

**************

पर्यावरणतज्ज्ञ व ज्येष्ठ पत्रकार सुशील बहुगुणा यांनी डोंगराळ भागातील आपत्तीवर २०१५ मध्ये लेख लिहिला होता. तो लेख सोशल मीडियावर उपलब्ध आहे. उत्तराखंड येथील चमोली जिल्ह्यात ग्लेशियर तुटल्यामुळे आलेली आपत्ती लक्षात घेता तो लेख प्रकाशित केला जात आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास सर्वात मोठी आपत्तीही कशी टाळली जाऊ शकते यावर हा लेख प्रकाश टाकतो.