शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

पहिल्याच दिवशी १८ जाेडप्यांनी बांधली रेशीमगाठ, बॅण्ड-बाजाविना लग्नाला पसंती

By निशांत वानखेडे | Updated: January 1, 2024 18:59 IST

मावळत्या वर्षात ३६५० जाेडप्यांचे काेर्टातून शुभमंगल

नागपूर: नववर्ष किंवा व्हॅलेन्टाईन असाे की वाढदिवस, असे विशेष दिवस अविस्मरणीय करण्यासाठी काहींचा प्रयत्न असताे. प्रेमीयुगालांचा तर हमखास प्रयत्न असताे. प्रेमाचा धागा जुळला की मग एकत्र येऊन ताे अधिक घट्ट करण्याचे वेध लागते आणि मग विशेष दिवसाला काही खास करण्याचा प्रयत्न सुरू हाेताे. प्रेमधागा जुळलेल्या १८ जाेडप्यांनी थेट नववर्षाचा मुहूर्त साधत रेशीमगाठ बांधली आणि हा उत्साहाचा दिवस कायमचा संस्मरणीय केला.

जिल्ह्याच्या विवाह नाेंदणी कार्यालयातून ही खास बातमी मिळाली. १८ जाेडप्यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शुभमंगल उरकून नव्या संसाराला सुरुवात केली. तसे काेर्टातून लग्न करण्यात एकतर प्रेमीयुगलांचा समावेश असताे किंवा ज्यांना बॅण्डबाजाऐवजी साधेपणा भावताे, त्यांच्याकडून प्राधान्य दिले जाते. मात्र दरवर्षीच्या आकड्यावरून बॅण्ड-बाजा-बारात पेक्षा काेर्टातून साधेपणाने लग्न करण्याकडे लाेकांचा कल वाढ असल्याचे दिसून येते. एकतर लग्नासाठी लागणारा अवाढव्य खर्च आणि ताेपर्यंत हाेणारा मनस्ताप, यामुळे नाेंदणी पद्धतीने शुभमंगल करण्याला प्राधान्य दिले जाते. तसेही परगावी नाेकरी व मुहूर्ताची कटकट न ठेवता झटपट लग्नासाठी काेर्टाला पसंती दिली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

नाेंदणी कार्यालयात दर महिन्याला २८० ते ३०० च्या आसपास विवाह हाेतात. मावळत्या वर्षात म्हणजे २०२३ मध्ये ३६५० जाेडप्यांनी नाेंदणी पद्धतीने विवाह उरकून घेतले. त्यापूर्वी २०२२ मध्ये हा आकडा ३७०० वर हाेता. यापूर्वी २७०० ते २८०० जाेडप्यांचे नाेंदणी पद्धतीने शुभमंगल व्हायचे. त्यामुळे काेर्टातून लग्न करण्याकडे लाेकांचा कल वाढत चालल्याचे दिसून येते.

काेराेनानंतर वाढला कलकाेराेना काळात बहुतेकांचे जुळलेले लग्न थांबवावे लागले. त्यानंतरही दाेन वर्ष थाटामाटात गर्दी जमवत लग्न करणे शक्य झाले नाही. त्यामुळे न्यायालयात साेप्या पद्धतीने विवाह उरकले गेले. परदेशी किंवा परराज्यात किंवा इतर शहरात वास्तव्यास असलेल्यांसाठी हा मार्ग अतिशय व्यवहार्य ठरणारा हाेता. त्यामुळे न्यायालयीन विवाहाकडे कल वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

न्यायालयीन विवाह जोडप्यांना त्यांचा धर्म, जात किंवा राष्ट्रीयत्व विचारात न घेता त्यांचे एकत्रीकरण करण्याची आणि नोंदणी करण्याची परवानगी देतात. हे कोणत्याही सामाजिक बंधनांशिवाय व्यक्तींना त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करते. आता विवाह नाेंदणी अनिवार्य असल्याने हा कायदेशीर मार्ग सर्वात चांगला आहे, ज्याला सर्वत्र मान्यता आहे. दुसरे म्हणजे न्यायालयीन विवाह हा पारंपारिक व महागडे समारंभ न करणे पसंत करणाऱ्या जोडप्यांसाठी एक सोपा, कायदेशीर व लोकप्रिय पर्याय आहे. हे चांगले संकेत आहेत.- अॅड. स्मिता सिंगलकर, सामाजिक कार्यकर्त्या.

टॅग्स :marriageलग्नnagpurनागपूरCourtन्यायालय