शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने उभारले ऑन-ग्रीड सौर ऊर्जा प्रकल्प

By नरेश डोंगरे | Updated: July 13, 2023 15:06 IST

मारमझिरी, टाकू, जौलखेडा आणि दोडरामोहर रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जा प्रकल्प : विजेची आणि आर्थिक बचत होणार

नरेश डोंगरे

नागपूर : उर्जा समस्येवर पर्याय आणि पर्यावरणाला अनुकूल बनविण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने काही रेल्वे स्थानकांवर 'ऑन-ग्रिड सोलर पॉवर प्लांट' उभारले आहेत. या प्रकल्पाच्या निर्मितीमुळे मध्य रेल्वेला भविष्यात अनेक फायदे होणार असून, मोठ्या खर्चाच्या बचतीसह पर्यावरणास पोषक वातावरणही निर्माण होणार असल्याचा दावा मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मारमझिरी (एमजेडाय) आणि टाकू (टीएक्यू) रेल्वे स्थानकांवर दोन १० किलोवॅट ऑन-ग्रीड सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. यावर ५,४४,००० रुपये खर्च झाला असून त्यामुळे दरवर्षी १ लाख, ७२ हजार, ५०० रुपयांची बचत होणार आहे.

जौलखेडा आणि दोडरामोहर या स्थानकावर प्रत्येकी ५ किलोवॅट क्षमतेचे दोन ऑन-ग्रीड सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत. त्याला २ लाख, ८९ हजार रुपये खर्च आला असला तरी त्यातून दरवर्षी ६८,५०० रुपयांचा खर्च वाचणार आहे. शिवाय ६५७० किलोवॅट उर्जेचीही बचत होणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. 

या दोन प्रकल्पाव्यतिरिक्त नागपूर विभागाने उर्जेचा वापर कमीतकमी करून वातावरणाला प्रदुषण पोषक बनविण्यासाठी अतिरिक्त सौर उर्जेवर चालणाऱ्या आणखी काही उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार दोडारामोहर रेल्वे स्थानकावर पाणी उपसण्यासाठी ३ एचपीचा सोलर वॉटर पंप बसवला आहे. या सेटसाठी एकदाच केवळ १ लाख, ६० हजार रुपये खर्च आला असून त्यातून दरवर्षी ६,४०० किलोवॅट उर्जा आणि ६७ हजार रुपये खर्चाची बचत होण्याची अपेक्षा आहे. याच स्थानकावर १३, ५०० रुपये खर्चून स्वयंचलित फिरणारे दोन १२ वॅटचे पथदिवे बसविलेआहे. त्यातून वर्षाला ८५०० रुपयांची बचत अपेक्षित आहे.उर्जेचा वापर १०.२५ टक्के कमी

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कनेक्टेड लोड मे २०२२ मध्ये २०,१५६.७७ किलोवॅट होते. ते मे २०२३ मध्ये २०,२३६.४७ किलोवॅट वाढले असून उर्जा बचतीच्या या पर्यायी व्यवस्थेमुळे उर्जेचा वापर १०.२५ टक्के कमी झाला आहे.कृती आराखडा तयार सुरू असलेल्या आर्थिक वर्षांत उर्जा संवर्धनासाठी आणखी असेच काही प्रकल्प ठिकठिकाणी उभारले जाणार असून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने त्यासाठी एक कृती आराखडा तयार केल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे