शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

नराधम वसंता दुपारेला आता फाशीच; राष्ट्रपतींनी फेटाळली दया याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2023 19:57 IST

Nagpur News २००८ साली नागपुरातील वाडी परिसरातील अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून ठार मारणारा नराधम वसंता दुपारेला चांगलाच झटका बसला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याची फाशीच्या शिक्षेबाबतची दया याचिका फेटाळली आहे.

नागपूर : २००८ साली नागपुरातील वाडी परिसरातील अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून ठार मारणारा नराधम वसंता दुपारेला चांगलाच झटका बसला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याची फाशीच्या शिक्षेबाबतची दया याचिका फेटाळली आहे. राष्ट्रपती भवनाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

३ एप्रिल २००८ साली वसंता संपत दुपारे याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या बालिकेसोबत कुकृत्य करून तिची हत्या केली होती. या प्रकरणात त्याला २०१० साली नागपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेदेखील ती शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर वसंता दुपारेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेदेखील त्याची याचिका फेटाळली होती. तसेच ३ मे २०१७ रोजी पुनर्विलोकन याचिकादेखील फेटाळत त्याच्याविरोधात संताप व्यक्त केला होता. अखेरचा पर्याय म्हणून त्याने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती. या प्रकरणात राष्ट्रपती सचिवालयाला २८ मार्च रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अभिप्राय प्राप्त झाला होता. त्याच्या कृत्यातील क्रूरता व त्यामुळे समाजमनावर झालेला आघात पाहता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वसंताची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे त्याला फाशी होणार हे स्पष्ट झाले असून आता प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या कलमांअंतर्गत सुनावली होती शिक्षाभादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत (अत्याचार) अंतर्गत जन्मठेप, कलम ३६३ (अपहरण) व कलम ३६७ (दुखापत करण्याच्या उद्देशाने अपहरण) अंतर्गत ७ वर्षे सश्रम कारावास व कलम २०१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येक कलमांतर्गत वेगवेगळ्या दंडाची शिक्षा सुनावली होती.

डोके ठेचून केली होती हत्यावसंताच्या वासनेची शिकार ठरलेली ही निरागस मुलगी नागपूरमध्ये वाडी भागात कदगाव-कळमेश्वर मार्गावरील शिवशक्ती नगर येथे कुशाल बनसोड यांच्या चाळीत राहायची. वसंता त्याच्या शेजाऱ्यांचा मित्र होता व तो नेहमी त्यांच्याकडे यायचा. ३ एप्रिल २००८ रोजी वसंता आला तेव्हा ही मुलगी घराबाहेर खेळत होती. वसंताने तिला नागपूरच्या चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवून सायकलवर नेले व एका गोदामाजवळच्या झुडुपांमध्ये तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून दगडांनी तिचे डोके ठेचत खून केला. या प्रकरणामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता व संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चादेखील नेला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय