शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नराधम वसंता दुपारेला आता फाशीच; राष्ट्रपतींनी फेटाळली दया याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2023 19:57 IST

Nagpur News २००८ साली नागपुरातील वाडी परिसरातील अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून ठार मारणारा नराधम वसंता दुपारेला चांगलाच झटका बसला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याची फाशीच्या शिक्षेबाबतची दया याचिका फेटाळली आहे.

नागपूर : २००८ साली नागपुरातील वाडी परिसरातील अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून ठार मारणारा नराधम वसंता दुपारेला चांगलाच झटका बसला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याची फाशीच्या शिक्षेबाबतची दया याचिका फेटाळली आहे. राष्ट्रपती भवनाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

३ एप्रिल २००८ साली वसंता संपत दुपारे याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या बालिकेसोबत कुकृत्य करून तिची हत्या केली होती. या प्रकरणात त्याला २०१० साली नागपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेदेखील ती शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर वसंता दुपारेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेदेखील त्याची याचिका फेटाळली होती. तसेच ३ मे २०१७ रोजी पुनर्विलोकन याचिकादेखील फेटाळत त्याच्याविरोधात संताप व्यक्त केला होता. अखेरचा पर्याय म्हणून त्याने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती. या प्रकरणात राष्ट्रपती सचिवालयाला २८ मार्च रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अभिप्राय प्राप्त झाला होता. त्याच्या कृत्यातील क्रूरता व त्यामुळे समाजमनावर झालेला आघात पाहता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वसंताची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे त्याला फाशी होणार हे स्पष्ट झाले असून आता प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या कलमांअंतर्गत सुनावली होती शिक्षाभादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत (अत्याचार) अंतर्गत जन्मठेप, कलम ३६३ (अपहरण) व कलम ३६७ (दुखापत करण्याच्या उद्देशाने अपहरण) अंतर्गत ७ वर्षे सश्रम कारावास व कलम २०१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येक कलमांतर्गत वेगवेगळ्या दंडाची शिक्षा सुनावली होती.

डोके ठेचून केली होती हत्यावसंताच्या वासनेची शिकार ठरलेली ही निरागस मुलगी नागपूरमध्ये वाडी भागात कदगाव-कळमेश्वर मार्गावरील शिवशक्ती नगर येथे कुशाल बनसोड यांच्या चाळीत राहायची. वसंता त्याच्या शेजाऱ्यांचा मित्र होता व तो नेहमी त्यांच्याकडे यायचा. ३ एप्रिल २००८ रोजी वसंता आला तेव्हा ही मुलगी घराबाहेर खेळत होती. वसंताने तिला नागपूरच्या चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवून सायकलवर नेले व एका गोदामाजवळच्या झुडुपांमध्ये तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून दगडांनी तिचे डोके ठेचत खून केला. या प्रकरणामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता व संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चादेखील नेला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय