शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

कामाचे ओझे आहे म्हणून जुने खटले थांबवून ठेवू शकत नाही; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: April 4, 2025 08:27 IST

High Court News: भारतीय राज्यघटनेने नागरिकांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार बहाल केला आहे. फौजदारी प्रकरणांमधील आरोपींनाही हा अधिकार आहे. त्यामुळे आरोपींविरुद्धचे खटले वेगात निकाली काढणे आवश्यक आहे.

- राकेश घानोडेनागपूर -  भारतीय राज्यघटनेने नागरिकांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार बहाल केला आहे. फौजदारी प्रकरणांमधील आरोपींनाही हा अधिकार आहे. त्यामुळे आरोपींविरुद्धचे खटले वेगात निकाली काढणे आवश्यक आहे. न्यायालयावर कामाचे खूप जास्त ओझे आहे म्हणून जुन्या खटल्यांवरील कार्यवाही थांबवून ठेवली जाऊ शकत नाही. न्यायालयाने या समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हवा, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी एका जामीन प्रकरणावरील निर्णयात नमूद केले.

आरोपीलाही अधिकारया प्रकरणातील आरोपीला ७ जून २०१९ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात होता. त्याच्याविरुद्धच्या खटल्यामध्ये काहीच प्रगती झाली नाही. त्यामुळे आरोपीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून जामीन मागितला होता.त्यावरील सुनावणीच्या वेळी आरोपीचे वकील ॲड. समीर सोनवणे यांनी आरोपीच्या मूलभूत अधिकाराकडे न्यायालयाचे लक्ष वेधून खटला निकाली निघण्यासाठी खूप विलंब होत असल्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी केली. 

सत्र न्यायाधीशांना समज या आरोपीविरुद्धचा खटला सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. परिणामी, उच्च न्यायालयाने संबंधित सत्र न्यायाधीशांना खटल्यासंदर्भात अहवाल मागितला असता त्यांनी कामाच्या ओझ्यामुळे या खटल्यावरील कार्यवाहीला अद्याप सुरुवात करता आली नाही, अशी माहिती दिली.उच्च न्यायालयाने ही बाब लक्षात घेता संबंधित निरीक्षण नोंदवून सत्र न्यायाधीशांना त्यांचे स्पष्टीकरण स्वीकारले जाऊ शकत नाही, अशी समज दिली, तसेच आरोपीला विविध अटींसह जामीन मंजूर केला.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर