शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

'त्यांच्या' तर आयुष्याच्या पुस्तकाचे कव्हर फाटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:15 IST

लॉकडाऊनमध्ये शहरातील जुन्या पुस्तक विक्रेत्यांसमोर परिस्थितीचे आव्हान उभे ठाकले आहे. दोन महिन्यांपासून पुस्तक विक्रीला खीळ बसली असून यावर अवलंबून असलेल्यांच्या आयुष्याच्या पुस्तकाचेच कव्हर फाटल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या रूपाने फार मोठे संकट उभे झाले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले, रोजगार गेले आणि असंख्य लोकांना देशोधडीला लावले आहे. लॉकडाऊनमध्ये शहरातील जुन्या पुस्तक विक्रेत्यांसमोर परिस्थितीचे आव्हान उभे ठाकले आहे. दोन महिन्यांपासून पुस्तक विक्रीला खीळ बसली असून यावर अवलंबून असलेल्यांच्या आयुष्याच्या पुस्तकाचेच कव्हर फाटल्याची स्थिती निर्माण झाली आहे.शहरात जुन्या पुस्तकांच्या विक्रीचा जवळपास १०० वर्षाचा इतिहास आहे. अनेक जुने सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील नामवंत लोक या दुकानांचा उल्लेख करतात. सध्या सीताबर्डी मेन रोडवर ३० च्यावर पुस्तकांची दुकाने आहेत. याशिवाय महाल, सदर, रामनगर तसेच हिंगणा रोड आदी परिसरात जुन्या पुस्तकांची दुकाने आहेत. एका दुकानात २ ते ३ कामगार असा विचार केल्यास अडीचशेच्या वर लोकांची कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. कोरोनाच्या संकटाने इतर व्यवसायाप्रमाणे पुस्तक विक्रीचा व्यवसायही गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प पडला आहे. या दुकानात काम करणाऱ्या कामगारांचे रोजीप्रमाणे चालते. लॉकडाऊनमध्ये विक्रेत्यांसोबत या कामगारांचाही रोजगार बंद पडला आहे. त्यामुळे या कामगार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्थेचे नरेश वाहाने यांनी या कामगारांच्या दयनीय अवस्थेची माहिती दिली. बहुतेकांच्या कुटुंबांचे उदरभरण आणि मुलांच्या शिक्षणाचे साधन यावरच अवलंबून आहे. दुकाने बंद झाल्याने सर्वच लोक हवालदिल झाले आहेत. दोन महिन्यापासून रोजगार नसल्याने हे लोक पैशापैशाला मोहताज झाले आहेत. घरात अन्नाची भ्रांत, मुलांचे भुकेले चेहरे बघून अनेकजण मनातून कोलमडले आहेत. सीताबर्डीत मेट्रोचे काम व महालमध्ये रस्त्याच्या विस्तारीकरणात आधीच विक्रेत्यांच्या व्यवसायावर गदा आली होती आणि आता कोरोनाच्या संकटाने ते पुरते मोडले असून या परिस्थितीत जगायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.एकमेकांना उधारी मागून जगणेनरेश वाहाने यांनी सांगितले की, संघटनेचा अध्यक्ष म्हणून दररोज दुकानात काम करणाºया अनेकांचे फोन मदतीसाठी येतात. अनेकजण एकमेकांना उधारी मागून कुटुंबाची गरज भागविण्याचा प्रयत्न करतात. मात्र प्रत्येकाचे आभाळ फाटले असल्याने कोण कुणाची कशी मदत करेल, हा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस