शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

'त्यांच्या' तर आयुष्याच्या पुस्तकाचे कव्हर फाटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:15 IST

लॉकडाऊनमध्ये शहरातील जुन्या पुस्तक विक्रेत्यांसमोर परिस्थितीचे आव्हान उभे ठाकले आहे. दोन महिन्यांपासून पुस्तक विक्रीला खीळ बसली असून यावर अवलंबून असलेल्यांच्या आयुष्याच्या पुस्तकाचेच कव्हर फाटल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या रूपाने फार मोठे संकट उभे झाले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले, रोजगार गेले आणि असंख्य लोकांना देशोधडीला लावले आहे. लॉकडाऊनमध्ये शहरातील जुन्या पुस्तक विक्रेत्यांसमोर परिस्थितीचे आव्हान उभे ठाकले आहे. दोन महिन्यांपासून पुस्तक विक्रीला खीळ बसली असून यावर अवलंबून असलेल्यांच्या आयुष्याच्या पुस्तकाचेच कव्हर फाटल्याची स्थिती निर्माण झाली आहे.शहरात जुन्या पुस्तकांच्या विक्रीचा जवळपास १०० वर्षाचा इतिहास आहे. अनेक जुने सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील नामवंत लोक या दुकानांचा उल्लेख करतात. सध्या सीताबर्डी मेन रोडवर ३० च्यावर पुस्तकांची दुकाने आहेत. याशिवाय महाल, सदर, रामनगर तसेच हिंगणा रोड आदी परिसरात जुन्या पुस्तकांची दुकाने आहेत. एका दुकानात २ ते ३ कामगार असा विचार केल्यास अडीचशेच्या वर लोकांची कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. कोरोनाच्या संकटाने इतर व्यवसायाप्रमाणे पुस्तक विक्रीचा व्यवसायही गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प पडला आहे. या दुकानात काम करणाऱ्या कामगारांचे रोजीप्रमाणे चालते. लॉकडाऊनमध्ये विक्रेत्यांसोबत या कामगारांचाही रोजगार बंद पडला आहे. त्यामुळे या कामगार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्थेचे नरेश वाहाने यांनी या कामगारांच्या दयनीय अवस्थेची माहिती दिली. बहुतेकांच्या कुटुंबांचे उदरभरण आणि मुलांच्या शिक्षणाचे साधन यावरच अवलंबून आहे. दुकाने बंद झाल्याने सर्वच लोक हवालदिल झाले आहेत. दोन महिन्यापासून रोजगार नसल्याने हे लोक पैशापैशाला मोहताज झाले आहेत. घरात अन्नाची भ्रांत, मुलांचे भुकेले चेहरे बघून अनेकजण मनातून कोलमडले आहेत. सीताबर्डीत मेट्रोचे काम व महालमध्ये रस्त्याच्या विस्तारीकरणात आधीच विक्रेत्यांच्या व्यवसायावर गदा आली होती आणि आता कोरोनाच्या संकटाने ते पुरते मोडले असून या परिस्थितीत जगायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.एकमेकांना उधारी मागून जगणेनरेश वाहाने यांनी सांगितले की, संघटनेचा अध्यक्ष म्हणून दररोज दुकानात काम करणाºया अनेकांचे फोन मदतीसाठी येतात. अनेकजण एकमेकांना उधारी मागून कुटुंबाची गरज भागविण्याचा प्रयत्न करतात. मात्र प्रत्येकाचे आभाळ फाटले असल्याने कोण कुणाची कशी मदत करेल, हा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस