शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

उपराजधानीत खाद्यतेल महागले! दिवाळीपासून भाववाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 11:06 IST

किरकोळमध्ये सोयाबीन तेल १०४ रुपये आणि शेंगदाणा तेल १२८ रुपये किलोवर पोहोचले आहे. खाद्यतेलाचा तडका महागल्याने गृहिणींना स्वयंपाकघरात हात आवरता घ्यावा लागत आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटकासोयाबीन १५, तर पाम तेल २३ रुपयांनी महाग!

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खाद्यान्न, कांदे, पेट्रोल, डिझेल पाठोपाठ खाद्यतेलाचे भाव भडकल्यामुळे गरीब, सर्वसामान्यांना महागाईचेही चटके बसत आहेत. खाद्यतेलाच्या भावात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. किरकोळमध्ये सोयाबीन तेल १०४ रुपये आणि शेंगदाणा तेल १२८ रुपये किलोवर पोहोचले आहे. खाद्यतेलाचा तडका महागल्याने गृहिणींना स्वयंपाकघरात हात आवरता घ्यावा लागत आहे.

हॉटेल्सचा सोयाबीन तेलाच्या खरेदीवर भरदिवाळीपासून ठोक बाजारात सोयाबीन तेलाचे भाव १५ किलोमागे २१० रुपयांनी वाढून १५०० ते १५२० रुपयांवर पोहोचले आहेत. दहा दिवसात तब्बल १०० रुपयांची वाढ झाली आहे.किरकोळमध्ये जवळपास १४ ते १५ रुपयांची वाढ होऊन भाव प्रति किलो १०४ रुपये झाले आहेत. पाम तेल १५ किलोमागे तब्बल ३४० रुपयांनी वाढून १३६० ते १३८० रुपये तर किरकोळमध्ये प्रति किलो २२ ते २३ रुपयांची वाढ होऊन भाव १०० रुपयांवर पोहोचले आहे. दोन्ही तेलाच्या भावात जास्त फरक नसल्यामुळे पूर्वी पाम तेलाची खरेदी करणाऱ्या हॉटेल्स संचालकांनी आता सोयाबीन तेलाची खरेदी वाढविली आहे. त्याचा भाववाढीला हातभार लागत आहे. भाव दरदिवशी वाढतच आहेत.नागपूर जिल्ह्यात दरदिवशी १५ ते १६ हजार डब्यांची (प्रति डबा १५ किलो) विक्री होते. त्यात ८ ते १० हजार सोयाबीन आणि ३ ते ४ हजार पाम तेलाच्या डब्यांची विक्री होते. या तेलाचे खरेदीदार गरीब आणि सामान्य आहे. भाववाढीचा सर्वाधिक फटका गरीब आणि सामान्यांनाच बसत आहे. केंद्र सरकारने कच्च्या सोयाबीनचे आयात शुल्क कमी केले तरच भाव कमी होतील, असे मत इतवारीतील राणी सती एन्टरप्राईजेसचे संचालक अनिल अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

मलेशियात पाम तेलापासून बायोडिझेलची निर्मिती बंधनकारकभारतात कच्च्या पाम तेलाची आयात मलेशिया आणि इंडोनेशिया देशातून होते. मलेशियात एकूण उत्पादनापैकी ३० टक्के पाम तेलापासून बायोडिंझेलची निर्मिती बंधनकारक केली आहे. त्यामुळे ७० टक्केच पाम तेल भारतात आयात होत आहे. आयातीवर ३५ टक्के शुल्क आहे. त्याचाही फटका पाम तेलाच्या भाववाढीला बसला आहे. त्यामुळे या तेलाचे भाव किरकोळमध्ये १०० रुपयांवर पोहोचले आहेत. केंद्राने आयात शुल्क कमी केल्यास आयात वाढून पाम तेलाचे भाव कमी होतील. त्याचा परिणाम सोयाबीन तेलाच्या घसरणीवर निश्चितच होणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

देशात जवस, सरकी व सरसो खाद्यतेलाचा प्रचार व्हावाकांद्याच्या भाववाढीवर निरंतर प्रतिक्रिया देणारे राजकीय नेते महिन्यात सोयाबीन खाद्यतेलाचे भाव १५ रुपये किलोने वाढल्यानंतर चर्चा करताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आणायचे असल्यास देशात जवस, सरकी आणि सरसो तेलाचा प्रचार करावा. शासकीय स्तरावरून चर्चा करून अन्न व औषध प्रशासन विभागाने लहान जवस खाद्यतेल विक्रेत्यांवर धाडी टाकल्या होत्या. त्यामुळे मधल्या काळात जवस तेल बाजारातून गायब झाले होते. जवस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे.- ज्ञानेश्वर रक्षक, महासचिव, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन.

सोयाबीनची आवक मंदावली

सोयाबीन आणि पाम तेलाच्या भाववाढीची तीन कारणे आहेत. यंदा अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे ५० टक्के पीक खराब झाले आहे. कळमन्यात दरवर्षी दिवाळीपासून तीन महिन्यांपर्यंत दररोज होणारी २५ ते ३० हजार पोत्यांची आवक यंदा ५ हजारांपर्यंत घसरली आहे. याशिवाय तेल उत्पादक कंपन्यांना सोयाबीनचा तुटवडा जाणवत आहे. जास्त भावात सोयाबीन खरेदी करून क्रशिंग करणे कठीण जात आहे. अर्जेंटिना देशाने कच्च्या सोयाबीनचे निर्यात शुल्क २५ वरून ३० टक्क्यांपर्यंत वाढविले आहे.शिवाय भारतात आयात शुल्क जास्त असल्यामुळे विदेशातून कच्चे सोयाबीन तेल मागविणे महाग झाले असून, रुपयांच्या अवमूल्यनाचा आयातीवर परिणाम झाला आहे. ही सर्व कारणे सोयाबीन तेलाच्या भाववाढीसाठी कारणाभूत ठरली आहेत. देशात सोयाबीनची उपलब्धता कमीच आहे.

टॅग्स :Marketबाजार