शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत खाद्यतेल महागले! दिवाळीपासून भाववाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 11:06 IST

किरकोळमध्ये सोयाबीन तेल १०४ रुपये आणि शेंगदाणा तेल १२८ रुपये किलोवर पोहोचले आहे. खाद्यतेलाचा तडका महागल्याने गृहिणींना स्वयंपाकघरात हात आवरता घ्यावा लागत आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटकासोयाबीन १५, तर पाम तेल २३ रुपयांनी महाग!

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खाद्यान्न, कांदे, पेट्रोल, डिझेल पाठोपाठ खाद्यतेलाचे भाव भडकल्यामुळे गरीब, सर्वसामान्यांना महागाईचेही चटके बसत आहेत. खाद्यतेलाच्या भावात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. किरकोळमध्ये सोयाबीन तेल १०४ रुपये आणि शेंगदाणा तेल १२८ रुपये किलोवर पोहोचले आहे. खाद्यतेलाचा तडका महागल्याने गृहिणींना स्वयंपाकघरात हात आवरता घ्यावा लागत आहे.

हॉटेल्सचा सोयाबीन तेलाच्या खरेदीवर भरदिवाळीपासून ठोक बाजारात सोयाबीन तेलाचे भाव १५ किलोमागे २१० रुपयांनी वाढून १५०० ते १५२० रुपयांवर पोहोचले आहेत. दहा दिवसात तब्बल १०० रुपयांची वाढ झाली आहे.किरकोळमध्ये जवळपास १४ ते १५ रुपयांची वाढ होऊन भाव प्रति किलो १०४ रुपये झाले आहेत. पाम तेल १५ किलोमागे तब्बल ३४० रुपयांनी वाढून १३६० ते १३८० रुपये तर किरकोळमध्ये प्रति किलो २२ ते २३ रुपयांची वाढ होऊन भाव १०० रुपयांवर पोहोचले आहे. दोन्ही तेलाच्या भावात जास्त फरक नसल्यामुळे पूर्वी पाम तेलाची खरेदी करणाऱ्या हॉटेल्स संचालकांनी आता सोयाबीन तेलाची खरेदी वाढविली आहे. त्याचा भाववाढीला हातभार लागत आहे. भाव दरदिवशी वाढतच आहेत.नागपूर जिल्ह्यात दरदिवशी १५ ते १६ हजार डब्यांची (प्रति डबा १५ किलो) विक्री होते. त्यात ८ ते १० हजार सोयाबीन आणि ३ ते ४ हजार पाम तेलाच्या डब्यांची विक्री होते. या तेलाचे खरेदीदार गरीब आणि सामान्य आहे. भाववाढीचा सर्वाधिक फटका गरीब आणि सामान्यांनाच बसत आहे. केंद्र सरकारने कच्च्या सोयाबीनचे आयात शुल्क कमी केले तरच भाव कमी होतील, असे मत इतवारीतील राणी सती एन्टरप्राईजेसचे संचालक अनिल अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

मलेशियात पाम तेलापासून बायोडिझेलची निर्मिती बंधनकारकभारतात कच्च्या पाम तेलाची आयात मलेशिया आणि इंडोनेशिया देशातून होते. मलेशियात एकूण उत्पादनापैकी ३० टक्के पाम तेलापासून बायोडिंझेलची निर्मिती बंधनकारक केली आहे. त्यामुळे ७० टक्केच पाम तेल भारतात आयात होत आहे. आयातीवर ३५ टक्के शुल्क आहे. त्याचाही फटका पाम तेलाच्या भाववाढीला बसला आहे. त्यामुळे या तेलाचे भाव किरकोळमध्ये १०० रुपयांवर पोहोचले आहेत. केंद्राने आयात शुल्क कमी केल्यास आयात वाढून पाम तेलाचे भाव कमी होतील. त्याचा परिणाम सोयाबीन तेलाच्या घसरणीवर निश्चितच होणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

देशात जवस, सरकी व सरसो खाद्यतेलाचा प्रचार व्हावाकांद्याच्या भाववाढीवर निरंतर प्रतिक्रिया देणारे राजकीय नेते महिन्यात सोयाबीन खाद्यतेलाचे भाव १५ रुपये किलोने वाढल्यानंतर चर्चा करताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आणायचे असल्यास देशात जवस, सरकी आणि सरसो तेलाचा प्रचार करावा. शासकीय स्तरावरून चर्चा करून अन्न व औषध प्रशासन विभागाने लहान जवस खाद्यतेल विक्रेत्यांवर धाडी टाकल्या होत्या. त्यामुळे मधल्या काळात जवस तेल बाजारातून गायब झाले होते. जवस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे.- ज्ञानेश्वर रक्षक, महासचिव, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन.

सोयाबीनची आवक मंदावली

सोयाबीन आणि पाम तेलाच्या भाववाढीची तीन कारणे आहेत. यंदा अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे ५० टक्के पीक खराब झाले आहे. कळमन्यात दरवर्षी दिवाळीपासून तीन महिन्यांपर्यंत दररोज होणारी २५ ते ३० हजार पोत्यांची आवक यंदा ५ हजारांपर्यंत घसरली आहे. याशिवाय तेल उत्पादक कंपन्यांना सोयाबीनचा तुटवडा जाणवत आहे. जास्त भावात सोयाबीन खरेदी करून क्रशिंग करणे कठीण जात आहे. अर्जेंटिना देशाने कच्च्या सोयाबीनचे निर्यात शुल्क २५ वरून ३० टक्क्यांपर्यंत वाढविले आहे.शिवाय भारतात आयात शुल्क जास्त असल्यामुळे विदेशातून कच्चे सोयाबीन तेल मागविणे महाग झाले असून, रुपयांच्या अवमूल्यनाचा आयातीवर परिणाम झाला आहे. ही सर्व कारणे सोयाबीन तेलाच्या भाववाढीसाठी कारणाभूत ठरली आहेत. देशात सोयाबीनची उपलब्धता कमीच आहे.

टॅग्स :Marketबाजार