शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

अधिकाऱ्यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सावरगाव : परिसरात १२ दिवसांपूर्वी काेसळलेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील गहू व हरभऱ्याचे कापणीला आलेले पीक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावरगाव : परिसरात १२ दिवसांपूर्वी काेसळलेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील गहू व हरभऱ्याचे कापणीला आलेले पीक आणि संत्र्याच्या अंबिया बहाराचे माेठे नुकसान झाले. स्थानिक लाेकप्रतिनिधी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या नुकसानग्रस्त पिकांची नुकतीच पाहणी केली असून, पंचनामा अहवाल शासनाकडे सादर करणार असल्याचे सांगितले.

अवकाळी पावसामुळे सावरगाव (ता. नरखेड) व परिसरातील गावांमधील गहू, हरभरा व संत्र्याच्या अंबिया बहराचे माेठे नुकसान झाले, शिवाय गहू व हरभऱ्याची प्रतही खालावली. त्यामुळे या नुकसानाची शासनाकडून याेग्य नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही या भागातील शेतकऱ्यांनी रेटून धरली हाेती. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद सदस्य देवका बाेडखे, कृषी सहायक गाेपाल मानकर व अन्य कर्मचाऱ्यांनी राजेंद्र कुडे (रा. सावरगाव) यांच्या सावरगाव शिवारातील तसेच इतर शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. या नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा अहवाल तातडीने तयार करून ताे शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही देवका बाेडखे व गाेपाल मानकर यांनी संयुक्तरीत्या दिली. यावेळी माजी सरपंच उमेश सावंत, राकेश बोदड, हंसराज गिरडकर, समीर गोडबोले, विवेक गोडबोले, तौसिफ शेख, ललित तांदळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.