शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नागपुरात रेती तस्करीत अधिकाऱ्यांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 10:21 IST

पोलिसांनी शुक्रवारी रेती जप्तीची धडक कारवाई केल्यानंतर रेती तस्करीशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

ठळक मुद्देदलालांच्या माध्यमातून बांधले अनेकांचे हातराज्याचा महसूल बुडतोय

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलिसांनी शुक्रवारी रेती जप्तीची धडक कारवाई केल्यानंतर रेती तस्करीशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविणाऱ्या रेती माफियांनी दलालांच्या माध्यमातून प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचेही हात बांधल्याची माहिती पुढे आली आहे. माफियांना प्रशासनातील भ्रष्टाचाऱ्यांचे पाठबळ असल्याची माहिती चर्चेला आल्यामुळे संबंधितांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.नागपुरात गेल्या अनेक वर्षांपासून रेती तस्करी बिनबोभाट सुरू आहे. प्रशासनातील काही भ्रष्ट वृत्तीच्या मंडळींची साथ घेऊन रेती माफिया एकीकडे खनिज संपत्तीची लूट करीत आहेत, दुसरीकडे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवीत आहेत. घाटावरून एका रात्रीतून शंभरावर ट्रक रेती नागपूर आणि आजूबाजूच्या शहरात आणली जात आहे. कारवाईचा अधिकार असलेल्यांपैकी काही जणांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे तस्कर कमालीचे निर्ढावले आहेत. त्याचमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला चोरलेली रेती साठवून ठेवण्याचा निर्ढावलेपणा ते दाखवत आहेत. येथे अभिनाश कुमार पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी तस्करांच्या मुसक्या आवळून रेती तस्करीला आळा घातला होता. डॉ. आरती सिंह पोलीस अधीक्षक असताना त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही नागपूर जिल्ह्यात तस्करांची नाकेबंदी केली होती. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी रेती तस्करांनी खापरखेडा परिसरात कारवाईसाठी गेलेल्या मंगेश शिंदे नामक डीवायएसपीच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर पोलिसांनी आक्रमक होऊन रेती माफियांवर मोक्कासारखी कडक कारवाई केल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले होते. त्यांनी नंतर आपली पद्धत बदलवून चोरून लपून तस्करी सुरू केली होती. अलीकडे त्यांनी दलालांच्या माध्यमातून आरटीओ, पोलीस आणि महसूल विभागातील काही भ्रष्ट मंडळींना हाताशी धरले आहे. त्यांचे पाठबळ मिळाल्याने माफियांकडून बिनबोभाट रेतीची तस्करी सुरू आहे. बदल्यात भ्रष्ट अधिकाऱ्यांना दलालाच्या माध्यमातून महिन्याला लाखोंची देण मिळत आहे. अधिकाऱ्यांच्या हातात लाखो रुपये कोंबून रेती माफिया ‘ओव्हरलोड’ रेती तस्करी करून शासनाला कोट्यवधींचा फटका देत आहेत.

कारवाईसाठी मंथनपोलिसांनी आरटीओ आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत ठेवून संयुक्तपणे शुक्रवारी आणि शनिवारी कारवाई करून घेतली. शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकचालक आणि वाहकांची प्राथमिक चौकशी केली असता ते रेती तस्करीत गुंतलेल्यांच्या इशाऱ्यांवर केवळ रेतीची ने-आण करीत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यांनी दिलेली महत्त्वपूर्ण माहिती ध्यानात घेत त्यांना पोलिसांनी सोडून दिले. मात्र, शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविणाऱ्या रेती माफियांसोबत कुणा-कुणाचे लागेबांधे आहे, त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्यावर कोणती आणि कशा प्रकारे कारवाई करता येईल, त्याबाबत मंथन केले जात आहे. सोबतच रेती तस्करीला आळा घालण्याची ज्यांची जबाबदारी आहे, त्यांच्याकडून काय कारवाई होते, त्याकडेही लक्ष असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली आहे.

खापा आणि गडचिरोलीतून आणली जाते रेतीसध्या सर्वाधिक रेती खापा परिसरातून तसेच गडचिरोली जिल्ह्यातील घाटांमधून नागपूर जिल्ह्यात येत आहे. ही माहिती कळल्याने परिमंडळ चारचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी हुडकेश्वरचे ठाणेदार सत्यवान माने आणि सहकाऱ्यांच्या मदतीने शुक्रवारी २८ सप्टेंबरला पहाटे ५ वाजतापासून कारवाईचा धडाका लावला. हुडकेश्वरमध्ये रेतीने भरलेले १३ ट्रक पकडले. या कारवाईनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले. रेती माफियांनी दलालांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागातील अनेकांचे लाचेच्या रूपाने हात बांधल्याची माहिती पुढे आली. ओव्हरलोडचे काम सांभाळणाºया आदिल, अन्नू नामक दलालाकडून तस्करांना कारवाई न करण्याची हमी मिळाल्याने माफियांनी एका ट्रक्कमध्ये चक्क २८ ते ३० टन रेतीची वाहतूक चालवली आहे. रात्रीच्या वेळी घाटावरून चोरून आणलेली लाखोंची रेती दिघोरी-उमरेड मार्गावर आणि अन्य काही भागातील शेतात साठवून ठेवत आहे. त्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. दरम्यान, शनिवारी रस्त्याच्या दुतर्फा साठवून ठेवलेली ४५ ब्रास रेती (सुमारे १५ ते २० ट्रक रेती) पोलिसांनी जप्त केली. ही सर्व रेती जेसीबी लावून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. ती कुणाची आहे, त्याची चौकशी सुरू झाल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.

टॅग्स :sandवाळूCrime Newsगुन्हेगारी