शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ऑड-इव्हनचे संकट कायम, केवळ वेळ वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:47 IST

राज्य शासनाच्या आदेशानुसार गुरुवार, ९ जुलैपासून सर्व बाजारपेठांमधील प्रतिष्ठाने ऑड-इव्हन पद्धतीनेच सुरू राहणार असून, केवळ सकाळी ९ ते ५ पर्यंत असलेल्या वेळात बदल करून दुकाने सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहतील.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार गुरुवार, ९ जुलैपासून सर्व बाजारपेठांमधील प्रतिष्ठाने ऑड-इव्हन पद्धतीनेच सुरू राहणार असून, केवळ सकाळी ९ ते ५ पर्यंत असलेल्या वेळात बदल करून दुकाने सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहतील.आॅड-इव्हन पद्धत रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे पाठविले आहे. याशिवाय दुकानाची वेळ वाढविण्याची मागणी करण्यात आल्याचे चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी सांगितले. राज्य शासनाच्या या नियमामुळे काहीही फरक पडणार नाही. दुकाने नियमित सुरू राहिल्यास ग्राहक बाजारात येतील आणि विक्री वाढेल. लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद राहिल्यानंतर आता तरी शासनाने व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.आॅड-इव्हनमध्ये एक दिवसाआड दुकाने सुरू असल्याने फूटपाथवरील विक्रेत्यांनी बंद दुकानांसमोरच ठिय्या मांडला आहे. यामुळेदुकानदारांसमोर विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. हे विक्रेते आता दुकानासमोरून हटायला तयार नाहीत. दुकानदारांचा त्यांच्याशी वाद होत आहे. इतवारी सराफा दुकानासमोर अनेक फूटपाथ दुकानदार दिसून येत आहे. दुकानात मौल्यवान वस्तू असल्याने धोका निर्माण झाला आहे. या दुकानदारांना तेथून हटवावे, अशी मागणी नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांनी प्रशासनाकडे केली आहे. याशिवाय गांधीबाग बाजारात अनेक दुकानासमोरील जागेवर फूटपाथवरील विक्रेत्यांनी अवैध कब्जा केला आहे. या दुकानात ग्राहकांची गर्दी होत आहे. मास्क, सॅनिटायझर आणि ग्लोव्हजची सुविधा नसल्याने कोरोना प्रसाराचा धोका निर्माण झाला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दुकानदार संघाने केली आहे.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर