शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

नवेगाव-नागझिऱ्यात अडथळ्यांनी रोखली वाघांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:12 IST

नागपूर : विदर्भातील जंगल वाघांसाठी नंदनवनच. म्हणूनच या प्रदेशातील वनक्षेत्रात वाघांची घनता देशात सर्वांत जास्त आहे आणि नुकत्याच आलेल्या ...

नागपूर : विदर्भातील जंगल वाघांसाठी नंदनवनच. म्हणूनच या प्रदेशातील वनक्षेत्रात वाघांची घनता देशात सर्वांत जास्त आहे आणि नुकत्याच आलेल्या व्याघ्र वाढीच्या अहवालात त्यावर शिक्कामोर्तबही झाले. मात्र, विदर्भातीलच एक अभयारण्य वाघाला फारसे भावलेले दिसत नाही. ताडोबा, पेंचमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाघ असताना याच प्रदेशातील नवेगाव-नागझिऱ्याच्या जंगलात मात्र वाघांची वानवा आहे. घनदाट वनक्षेत्र असूनही वाघांची संख्या केवळ ८ असल्याने आश्चर्य व्यक्त होणे साहजिक आहे.

ताडोबा अभयारण्यात वाघांची संख्या २०० वर पोहोचली असून, येथील वनक्षेत्र वाघांसाठी कमी पडत आहे. पेंचमध्येही बऱ्यापैकी संख्या वाढली आहे. मात्र, ६५० चौरस किलोमीटरच्या वर असलेल्या नवेगाव-नागझिऱ्यात केवळ ८ वाघ आहेत. यामागे अनेक कारणे असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे. नवेगाव-नागझिरा अभयारण्याचे फिल्ड डायरेक्टर रामानुजम यांनी सांगितले, ताडोबा अभयारण्य हे एकत्रित (कॉम्पॅक्ट) आहे आणि बफर झोनमध्ये मानवी वस्त्या तुटक असल्याने वाघांना अधिवासासाठी मोठा एरिया मिळतो. याउलट एकत्रित उल्लेख होत असला तरी नवेगाव-नागझिरा एकत्रित व समुचित नाही. २५० चौ.कि.मी.चा नवेगाव ब्लॉक वेगळा, तर ४०० चौ.कि.मी.चा नागझिरा ब्लॉक वेगळा पडतो. विशेष म्हणजे या दोन्ही ब्लॉकच्या मध्ये असलेल्या बफर एरियामध्ये तब्बल १८५ गावे आहेत. मोठ्या प्रमाणात असलेल्या मानवी वस्त्या हा वाघांच्या अधिवासाचा मोठा अडथळा आहे. याशिवाय अधिवासात विविध विकासकामे, तसेच रेल्वे व रस्त्यांचे जाळे मोठे असल्यानेही वाघांसाठी अडचणीचे हाेत असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हे अभयारण्य लहान-मोठ्या टेकड्यांनी व्यापले आहे. जंगलात तृणभक्षी प्राण्यांची संख्या चांगली आहे; पण कदाचित अधिवास कमी पडत असल्यानेच वाघांची संख्या कमी असण्याची शक्यता आहे. इतर भागातील वाघ या अभयारण्यात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव आला होता; पण याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तृणभक्षी प्राण्यांची गणना नाही

जंगलातील तृणभक्षी प्राण्यांची अशी गणना झाली नाही, केवळ अंदाजानेच ती सांगितली जाते. नागझिऱ्यामध्ये सांबराची संख्या खूप आहे; पण नवेगावमध्ये नाही. हरिण व नीलगायही आढळून येतात; पण त्यांची नेमकी संख्या सांगता येणार नाही.

- रानकुत्रे उठले वाघांच्या जिवावर?

नवेगाव-नागझिरा अभयारण्यात रानकुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या रानकुत्र्यांमुळेच या जंगलात वाघांची संख्या कमी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत तज्ज्ञांद्वारे अभ्यास सुरू असून, अंतिम अहवाल आल्याशिवाय त्याबाबत काही सांगता येणार नाही, असे रामानुजम यांनी स्पष्ट केले.

या जंगलात वाघांची संख्या पूर्वीपासूनच कमी आहे. कदाचित हा अधिवास कमी पडत असेल किंवा रानकुत्र्यांमुळेही वाघांना धोका होत असेल. मात्र, याबाबत सखोल अभ्यास व्हावा आणि संख्या वाढविण्याच्या दिशेने वनविभाग व राज्य शासनाने कार्य करावे, अशी आमची इच्छा आहे.

- नितीन देसाई, वन्यजीव अभ्यासक