शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जनआरोग्य योजनेला कोविड १९ ची बाधा; मेडिकलमध्ये केवळ ९ रुग्णांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 19:37 IST

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मेडिकलमध्ये भरती करण्यात आलेल्या ९००हून अधिक रुग्णांमधून केवळ ९ रुग्णांनाच या योजनेचा लाभ मिळालेला आहे.

ठळक मुद्देविमा कंपन्यांची भूमिका संशयास्पद

कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेला कोविड १९ची बाधा असल्याचे लाभार्थ्यांच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे. योजनेअंतर्गत मेडिकलमध्ये भरती करण्यात आलेल्या ९००हून अधिक रुग्णांमधून केवळ ९ रुग्णांनाच या योजनेचा लाभ मिळालेला आहे. आवेदन भरण्यास येत असलेल्या अडचणींमुळेच, ही स्थिती असून इस्पितळांना रुग्णांवरील उपचाराचा खर्च आपल्या सामान्य बजेटमधून करावा लागत आहे. या संदर्भात विमा कंपन्यांची भूमिका संशयास्पद दिसून येत आहे.

राज्य सरकारने कोविड १९च्या रुग्णांचा खर्च महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून करण्याची घोषणा केली होत. यासाठी विमा कंपन्यांशी करार करण्यात येऊन विमा राशीचा प्रिमिअमही भरण्यात आला. मात्र, विमा कंपन्या उपचार खचार्पासून लांब पळत असल्याचे दिसून येते. नागपूरच्या मेडिकल कॉलेज अण्ड हॉस्पिटलमध्ये या योजनेचा लाभ आतापर्यंत केवळ ९ रुग्णांनाच प्राप्त झाला आहे. ऊर्वरित रुग्णांना उपचार खचार्चा फटका बसत नसला तरी तो खर्च मेडिकलच्या सामान्य बजेट मधून होत आहे. याचा फटका अन्य आजारांचे उपचार व इतर प्रशासकीय खर्चांना बसण्याची शक्यता आहे. मात्र, या संदर्भात मेडिकल व जन आरोग्य योजनेचे अधिकारी बोलण्यास टाळाटाळ करत आहेत.कॉलमवर क्लिक होतच नाहीमेडिकलमध्ये रुग्ण पोहोचल्यावर ऑनलाईन नोंदणी केली जाते. यासाठी भराव्या लागणाऱ्या फार्मच्या कॉलम क्रमांक चारवर क्लिक केल्यास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळतो. मात्र, कॉलमवर क्लिकच होत नाही. यासाठी विमा कंपन्याच जबाबदार असल्याचा आरोपही केला जात आहे. खचार्चा भार पडू नये म्हणून हे षडयंत्र विमा कंपन्याच करत असल्याचा आरोप होत आहे.सुरुवातीपासूनच अडचणकोविड संक्रमणाच्या सुरुवातीपासूनच जन आरोग्य योजनेसंदर्भात अडचणी येत आहेत. राज्य सरकारने या अडचणी सोडविण्याचा प्रयत्नही केला मात्र, त्यानंतर दुसºयाच अडचणी उद्भवत आहेत. सुरुवातीच्या काळात रुग्णांना आधार कार्ड व शिधा पत्रिका मागण्यात आली. मात्र, रुग्णामुळे घरातील सर्व सदस्य क्वॉरंटाईन असल्याने ते शक्य नव्हते. म्हणून त्यासाठी तिन दिवसाचा वेळ देण्यात आला आणि नंतर शिधा पत्रिकेची अटही शिथिल करण्यात आली. तरी अडचणी संपल्या नाहीत. त्यामुळे, व्हॉट्सअप किंवा ऑनलाईन दस्ताऐवज देण्याचा पर्याय देण्यात आला आणि शिधा पत्रिकेच्या ऑनलाईन पडताळणीची सुविधाही देण्यात आली. आता सरकारने ही सर्व कागदपत्रे देण्यासाठी ३० दिवसाचा वेळ दिला आहे.प्रकरणाची कठोर तपासणी व्हावीया प्रकरणावर बोलण्यास कोणताच अधिकारी तयार नाही. मात्र, दबक्या आवाजात प्रकरणाची कठोर तपासणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बहुतांश रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याने विमा कंपन्यांवरील संशय बळावत चालला आहे. सरकारने प्रिमिअम भरल्यानंतरही अशी टाळाटाळ होत असेल तर हे प्रकरण गंभीर आहे.

टॅग्स :Healthआरोग्य