शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'ओबीसी' विद्यार्थ्यांना ना वसतिगृह ना 'आधार'; शिक्षणासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2022 14:32 IST

विद्यार्थ्यांना स्वबळावर करावा लागताे खर्च

नागपूर : इतर मागास वर्ग (ओबीसी) च्या विद्यार्थ्यांना शहरात शैक्षणिक आधार मिळावा म्हणून ७२ वसतिगृह सुरू करण्याची घाेषणा राज्य सरकारने केली हाेती. मात्र शैक्षणिक सत्र सुरू हाेऊनही वसतिगृहाची घाेषणा कागदावरच राहिली आहे. याशिवाय ‘स्वाधार’ याेजनेच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची ‘आधार’ याेजनाही बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वणवण करावी लागत आहे.

यापूर्वीच मविआ सरकारमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी कल्याण मंत्र्यांना विद्यार्थ्यांनी याबाबत निवेदने दिली; पण काहीच हालचाली झाल्या नाहीत. आता नव्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन दिले आहे. मविआ सरकारमध्ये ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृह सुरू करण्याचे जाहीर केले हाेते. त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारनेही ओबीसी मुलांसाठी १८ व मुलींसाठी १८ असे ३६ वसतिगृह बांधून देण्याचे जाहीर करीत ३० जानेवारी २०१९ राेजी या निर्णयाला मान्यता दिली हाेती. मात्र या घाेषणा कागदावरच राहिल्या.

अभियांत्रिकीचा विद्यार्थी खेमराज मेंढे याने सांगितले, अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना माेफत प्रवेश दिला जाताे आणि दारिद्र्यरेषेखालील ओबीसी विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये ५ टक्के जागा आरक्षित असतात. मात्र इतर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वबळावरच खर्च करावा लागताे. इतर मागासवर्ग कल्याण समितीच्या ऑक्टाेबर २०१५ च्या बैठकीत ओबीसी मुला-मुलींसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह बनविण्याची शिफारस केली हाेती. त्यानंतर केंद्र सरकारच्या याेजनेअंतर्गत १०० क्षमता असलेले वसतिगृह बांधण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली. मुलांच्या वसतिगृहासाठी ६० तर मुलींच्या वसतिगृहासाठी ९० टक्के भार केंद्र सरकार उचलणार हाेते पण त्याचेही पुढे काही झाले नाही. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांनी शिकावे की नाही, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.

आधार याेजनाही बारगळली

वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या एससी, एसटी विद्यार्थ्यांच्या खर्चासाठी असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार याेजनेच्या धर्तीवर बाहेर गावच्या ओबीसी विद्यार्थ्यांना वणवण करावी लागू नये म्हणून सावित्रीबाई फुले आधार याेजना महाज्याेतीतर्फे प्रस्तावित हाेती. मात्र सत्ताबदलानंतर ही याेजनाही बारगळण्याची चिन्ह दिसून येत आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीnagpurनागपूर