शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

'ओबीसी' विद्यार्थ्यांना ना वसतिगृह ना 'आधार'; शिक्षणासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2022 14:32 IST

विद्यार्थ्यांना स्वबळावर करावा लागताे खर्च

नागपूर : इतर मागास वर्ग (ओबीसी) च्या विद्यार्थ्यांना शहरात शैक्षणिक आधार मिळावा म्हणून ७२ वसतिगृह सुरू करण्याची घाेषणा राज्य सरकारने केली हाेती. मात्र शैक्षणिक सत्र सुरू हाेऊनही वसतिगृहाची घाेषणा कागदावरच राहिली आहे. याशिवाय ‘स्वाधार’ याेजनेच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची ‘आधार’ याेजनाही बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वणवण करावी लागत आहे.

यापूर्वीच मविआ सरकारमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी कल्याण मंत्र्यांना विद्यार्थ्यांनी याबाबत निवेदने दिली; पण काहीच हालचाली झाल्या नाहीत. आता नव्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन दिले आहे. मविआ सरकारमध्ये ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृह सुरू करण्याचे जाहीर केले हाेते. त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारनेही ओबीसी मुलांसाठी १८ व मुलींसाठी १८ असे ३६ वसतिगृह बांधून देण्याचे जाहीर करीत ३० जानेवारी २०१९ राेजी या निर्णयाला मान्यता दिली हाेती. मात्र या घाेषणा कागदावरच राहिल्या.

अभियांत्रिकीचा विद्यार्थी खेमराज मेंढे याने सांगितले, अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना माेफत प्रवेश दिला जाताे आणि दारिद्र्यरेषेखालील ओबीसी विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये ५ टक्के जागा आरक्षित असतात. मात्र इतर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वबळावरच खर्च करावा लागताे. इतर मागासवर्ग कल्याण समितीच्या ऑक्टाेबर २०१५ च्या बैठकीत ओबीसी मुला-मुलींसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह बनविण्याची शिफारस केली हाेती. त्यानंतर केंद्र सरकारच्या याेजनेअंतर्गत १०० क्षमता असलेले वसतिगृह बांधण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली. मुलांच्या वसतिगृहासाठी ६० तर मुलींच्या वसतिगृहासाठी ९० टक्के भार केंद्र सरकार उचलणार हाेते पण त्याचेही पुढे काही झाले नाही. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांनी शिकावे की नाही, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.

आधार याेजनाही बारगळली

वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या एससी, एसटी विद्यार्थ्यांच्या खर्चासाठी असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार याेजनेच्या धर्तीवर बाहेर गावच्या ओबीसी विद्यार्थ्यांना वणवण करावी लागू नये म्हणून सावित्रीबाई फुले आधार याेजना महाज्याेतीतर्फे प्रस्तावित हाेती. मात्र सत्ताबदलानंतर ही याेजनाही बारगळण्याची चिन्ह दिसून येत आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीnagpurनागपूर