शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'ओबीसी' विद्यार्थ्यांना ना वसतिगृह ना 'आधार'; शिक्षणासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2022 14:32 IST

विद्यार्थ्यांना स्वबळावर करावा लागताे खर्च

नागपूर : इतर मागास वर्ग (ओबीसी) च्या विद्यार्थ्यांना शहरात शैक्षणिक आधार मिळावा म्हणून ७२ वसतिगृह सुरू करण्याची घाेषणा राज्य सरकारने केली हाेती. मात्र शैक्षणिक सत्र सुरू हाेऊनही वसतिगृहाची घाेषणा कागदावरच राहिली आहे. याशिवाय ‘स्वाधार’ याेजनेच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची ‘आधार’ याेजनाही बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वणवण करावी लागत आहे.

यापूर्वीच मविआ सरकारमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी कल्याण मंत्र्यांना विद्यार्थ्यांनी याबाबत निवेदने दिली; पण काहीच हालचाली झाल्या नाहीत. आता नव्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन दिले आहे. मविआ सरकारमध्ये ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृह सुरू करण्याचे जाहीर केले हाेते. त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारनेही ओबीसी मुलांसाठी १८ व मुलींसाठी १८ असे ३६ वसतिगृह बांधून देण्याचे जाहीर करीत ३० जानेवारी २०१९ राेजी या निर्णयाला मान्यता दिली हाेती. मात्र या घाेषणा कागदावरच राहिल्या.

अभियांत्रिकीचा विद्यार्थी खेमराज मेंढे याने सांगितले, अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना माेफत प्रवेश दिला जाताे आणि दारिद्र्यरेषेखालील ओबीसी विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये ५ टक्के जागा आरक्षित असतात. मात्र इतर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वबळावरच खर्च करावा लागताे. इतर मागासवर्ग कल्याण समितीच्या ऑक्टाेबर २०१५ च्या बैठकीत ओबीसी मुला-मुलींसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह बनविण्याची शिफारस केली हाेती. त्यानंतर केंद्र सरकारच्या याेजनेअंतर्गत १०० क्षमता असलेले वसतिगृह बांधण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली. मुलांच्या वसतिगृहासाठी ६० तर मुलींच्या वसतिगृहासाठी ९० टक्के भार केंद्र सरकार उचलणार हाेते पण त्याचेही पुढे काही झाले नाही. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांनी शिकावे की नाही, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.

आधार याेजनाही बारगळली

वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या एससी, एसटी विद्यार्थ्यांच्या खर्चासाठी असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार याेजनेच्या धर्तीवर बाहेर गावच्या ओबीसी विद्यार्थ्यांना वणवण करावी लागू नये म्हणून सावित्रीबाई फुले आधार याेजना महाज्याेतीतर्फे प्रस्तावित हाेती. मात्र सत्ताबदलानंतर ही याेजनाही बारगळण्याची चिन्ह दिसून येत आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीnagpurनागपूर