शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नायलॉन मांजाने गळाच नव्हे तर हाडही कापले जाऊ शकते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 21:10 IST

Nagpur News काचमिश्रित व प्लास्टिक काेटेड सिंथेटिक असल्याने नायलॉन मांजा एखाद्या लाेखंडाच्या तारासारखा मजबूत बनताे. ताे हाताने सहजासहजी ताेडता येणे शक्य नाही.

ठळक मुद्देनायलाॅन मांजा तुटत तर नाहीच, पण नष्टही हाेत नाहीकाच व प्लास्टिक कोटेड असल्याने नायलॉन मांजा होतो लोखंडासारखा टणक व धारदार निर्मितीवर प्रतिबंध हाच पर्याय

नागपूर : धारदार सुऱ्यासारखा माणसांचा गळा, अवयव आणि पक्ष्यांचे पंख छाटणारा नायलाॅन मांजा केवळ जीवघेणाच नाही तर पर्यावरणासाठीही प्रचंड घातक आहे. हा प्लास्टिक काेटेड मांजा सडत नाही, कधी नष्टही हाेत नाही. वर्षानुवर्षे टिकून राहताे. त्यामुळे तारावर किंवा झाडांवर अडकलेला मांजा अनेक वर्षांपर्यंत प्राणी किंवा पक्ष्यांसाठीही घातकच ठरताे.

नायलाॅन मांजा इतका घातक का आहे याचे कारण तज्ज्ञांनी स्पष्ट केले. साधारण सुताचा धागा हा विघटनशील असताे. ताे सहज तुटताे आणि थाेड्या कालावधीत ताे नष्टही हाेताे. मात्र, नायलाॅन मांजाचे तसे नाही. हा सिंगल युस्ड प्लास्टिकसारखा आहे. काचमिश्रित व प्लास्टिक काेटेड सिंथेटिक असल्याने ताे एखाद्या लाेखंडाच्या तारासारखा मजबूत बनताे. ताे हाताने सहजासहजी ताेडता येणे शक्य नाही. त्यामुळे एखाद्या वाहनचालकाच्या शरीरावर आला तर काही कळण्याच्या आत शरीराचे हाडही कापू शकताे. दुसरे म्हणजे अनेक वर्षे जमिनीत गाडून ठेवला तरी प्लास्टिकच्या तत्त्वाप्रमाणे नष्ट हाेत नाही. तारांवर, झाडांवर अडकलेल्या मांजावर ऊन, वारा, पावसाचा प्रभाव पडत नाही व ताे कित्येक वर्ष तसाच टिकून राहताे. त्यामुळे जेवढा काळ ताे झाडांवर अडकून आहे, तेवढी वर्षे प्राणी व पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरू शकताे. म्हणून या मांजा निर्मितीवरच प्रतिबंध आणण्याची गरज आहे.

एमपीसीबी, वनविभाग कुचकामी

किंग काेब्राचे समन्वयक अरविंदकुमार रतुडी यांनी सांगितले, नायलाॅन मांजा एकप्रकारचा प्लास्टिकच असल्याने ताे नष्ट करणे ही प्रदूषण नियंत्रण मंडळाचीही जबाबदारी ठरते. मात्र, तज्ज्ञांच्या टीमने याचे गुणधर्म सांगितले, तेव्हा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मान्य तर केले, पण हव्या त्या उपाययाेजना केल्या नाहीत. खरंतर अशावेळी एमपीसीबी आणि वनविभागाच्या दस्त्याद्वारे कारवाईसाठी तयार हाेणे गरजेचे आहे, पण हे दाेन्ही विभाग आपली जबाबदारी ढकलतात. पाेलीस विभाग, मनपासह या विभागांनीही सामाजिक संघटनांना घेऊन कारवाई केली तर या मांजाच्या वापरावर प्रतिबंध लागू शकताे.

नायलाॅन मांजा प्राणी, पक्ष्यांसह पर्यावरणासाठीही हानिकारक आहे. त्यामुळे त्यावर प्रतिबंध लावणे हाच उपाय आहे. विक्रेता किंवा वापरकर्त्यांवर कारवाई करण्यापेक्षा मांजा निर्मात्यावरच कठाेर कारवाई करणे आवश्यक आहे.

- काैस्तुभ चटर्जी, ग्रीन व्हीजिल संस्था.

टॅग्स :environmentपर्यावरण