शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

नागपुरात शिवभोजन केंद्रांची संख्या वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:47 IST

राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन योजनेस शहरातील सर्व केंद्रांवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रतिसाद पाहता शहरातील केंद्रसंख्या वाढवण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसर्वच केंद्रांवर वाढीव उद्दिष्टांची पूर्तता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन योजनेस शहरातील सर्व केंद्रांवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रतिसाद पाहता शहरातील केंद्रसंख्या वाढवण्यात येणार आहे. केंद्राची ठिकाणे निश्चित करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे एक बैठकही होणार असल्याचे सांगितले जाते.राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील गरीब व गरजूला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना गेल्या २६ जानेवारीपासून राज्यभरात सुरू झाली. शहरात डागा रुग्णालय, गणेशपेठ बसस्थानक, गणेश भोजनालय बसस्थानक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल येथेही दोन ठिकाणी, कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दोन ठिकाणी, मातृसेवा संघ हॉस्पिटल येथे दोन ठिकाणी अशा या नऊ ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, भात समाविष्ट असलेली जेवणाची थाळी १० रुपये प्रति थाळी याप्रमाणे उपलब्ध आहे. शहरात दररोज ७५० लोकांनाच या थाळीचा लाभ घेता येत होता. या ठिकाणी दिलेले उद्दिष्टही होत होते. त्यामुळे गेल्या १९ फेब्रुवारीपासून या ठिकाणी २५ थाळी प्रत्येक ठिकाणी वाढवून देण्यात आली आहे. हेही उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे व शहरातील मागणी लक्षात घेता शासकीय रुग्णालय, रेल्वेस्थानकासह इतर ठिकाणी नवीन केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. याबाबत प्राप्त प्रस्तावांचा विचार करून लवकरच ठिकाण निश्चित करण्यात येतील. त्यानुसार नवीन शिवभोजन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयnagpurनागपूर