शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

नागपुरात ‘क्वारंटाईन’ केलेल्यांची संख्या दोन हजारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 02:15 IST

‘कोरोना’च्या वाढत्या संकटात शहरातील ‘क्वारंटाईन’ केंद्रांमध्ये ठेवल्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढीस लागली आहे. हा आकडा आता दोन हजाराच्या वर गेला आहे. गुरुवारी या केंद्रांमध्ये आणखी १६८ लोक आणल्या गेले असून शहरातील विविध केंद्रांत २ हजार ८९ लोक ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकेंद्रांमध्ये वाढतेय संख्या : घरांमध्ये सव्वाचारशे लोक ‘क्वारंटाईन’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या वाढत्या संकटात शहरातील ‘क्वारंटाईन’ केंद्रांमध्ये ठेवल्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढीस लागली आहे. हा आकडा आता दोन हजाराच्या वर गेला आहे. गुरुवारी या केंद्रांमध्ये आणखी १६८ लोक आणल्या गेले असून शहरातील विविध केंद्रांत २ हजार ८९ लोक ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहेत.‘कोरोना’ चाचणीत ‘पॉझिटिव्ह’ आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून या केंद्रांत ठेवले जात आहे. मार्च महिन्यात परदेशातून येणाऱ्या नागरिकांना ठेवण्यासाठी आमदार निवासातील केंद्रात व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढल्याने इतर ठिकाणीदेखील ‘क्वारंटाईन’ केंद्र सुरू करण्यात आले. गुरुवारी १६८ लोकांना या केंद्रांत आणल्या गेले. यात पार्वतीनगरातील ८० हून अधिक लोक आहेत. बुधवारी रात्रीदेखील दीडशे लोकांना आणण्यात आले.दुसरीकडे ‘क्वारंटाईन’ केंद्रांचा विरोधदेखील होत आहे. वानाडोंगरी, पाचपावली, राजनगर स्थित ‘क्वारंटाईन’ केंद्रांचा विरोध झाला आहे. या केंद्रांमधून २३ जणांना कुठलीही लक्षणे नसल्याने घरी पाठविण्यात आले. तर ११ जणांना इस्पितळात भरती करावे लागले. याशिवाय शहरात ४२३ लोकांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले असून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे.बसेसमध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ नाही‘पॉझिटिव्ह’ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना बसेसच्या माध्यमातून ‘क्वारंटाईन’ केंद्रांवर नेले जात आहे. या प्रक्रियेत ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन होत नसल्याचा आरोप मनपाच्या आरोग्य सभापतींनी लावला आहे. सतरंजीपुरा, मोमिनपुरा तसेच पार्वतीनगर येथील लोकांना बसेसमधून नेण्यात आले, परंतु अंतराच्या नियमांचे पालन झाले नाही. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका होऊ शकतो.अशी आहे आकडेवारी (६ मेची आकडेवारी)आमदार निवास २९१वनामती ७सिम्बॉयसिस ४३२रविभवन ३२हॉटेल ७२पाचपावली ६४४व्हीएनआयटी ६११आमदार निवासात सर्वाधिक ‘क्वॉरंटाईन’शहरातील सात ‘क्वॉरंटाईन’ केंद्रांवर आतापर्यंत ३ हजार ५८३ लोकांना आणून त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली. त्यातील १ हजार ४८४ नागरिकांना घरी पाठविण्यात आले किंवा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत २ हजार ८९ नागरिक तेथे आहेत. सर्वाधिक १ हजार १४२ लोक आमदार निवासात आणले गेले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर