शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

नागपुरात ‘क्वारंटाईन’ केलेल्यांची संख्या दोन हजारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 02:15 IST

‘कोरोना’च्या वाढत्या संकटात शहरातील ‘क्वारंटाईन’ केंद्रांमध्ये ठेवल्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढीस लागली आहे. हा आकडा आता दोन हजाराच्या वर गेला आहे. गुरुवारी या केंद्रांमध्ये आणखी १६८ लोक आणल्या गेले असून शहरातील विविध केंद्रांत २ हजार ८९ लोक ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकेंद्रांमध्ये वाढतेय संख्या : घरांमध्ये सव्वाचारशे लोक ‘क्वारंटाईन’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या वाढत्या संकटात शहरातील ‘क्वारंटाईन’ केंद्रांमध्ये ठेवल्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढीस लागली आहे. हा आकडा आता दोन हजाराच्या वर गेला आहे. गुरुवारी या केंद्रांमध्ये आणखी १६८ लोक आणल्या गेले असून शहरातील विविध केंद्रांत २ हजार ८९ लोक ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहेत.‘कोरोना’ चाचणीत ‘पॉझिटिव्ह’ आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून या केंद्रांत ठेवले जात आहे. मार्च महिन्यात परदेशातून येणाऱ्या नागरिकांना ठेवण्यासाठी आमदार निवासातील केंद्रात व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढल्याने इतर ठिकाणीदेखील ‘क्वारंटाईन’ केंद्र सुरू करण्यात आले. गुरुवारी १६८ लोकांना या केंद्रांत आणल्या गेले. यात पार्वतीनगरातील ८० हून अधिक लोक आहेत. बुधवारी रात्रीदेखील दीडशे लोकांना आणण्यात आले.दुसरीकडे ‘क्वारंटाईन’ केंद्रांचा विरोधदेखील होत आहे. वानाडोंगरी, पाचपावली, राजनगर स्थित ‘क्वारंटाईन’ केंद्रांचा विरोध झाला आहे. या केंद्रांमधून २३ जणांना कुठलीही लक्षणे नसल्याने घरी पाठविण्यात आले. तर ११ जणांना इस्पितळात भरती करावे लागले. याशिवाय शहरात ४२३ लोकांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले असून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे.बसेसमध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ नाही‘पॉझिटिव्ह’ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना बसेसच्या माध्यमातून ‘क्वारंटाईन’ केंद्रांवर नेले जात आहे. या प्रक्रियेत ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन होत नसल्याचा आरोप मनपाच्या आरोग्य सभापतींनी लावला आहे. सतरंजीपुरा, मोमिनपुरा तसेच पार्वतीनगर येथील लोकांना बसेसमधून नेण्यात आले, परंतु अंतराच्या नियमांचे पालन झाले नाही. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका होऊ शकतो.अशी आहे आकडेवारी (६ मेची आकडेवारी)आमदार निवास २९१वनामती ७सिम्बॉयसिस ४३२रविभवन ३२हॉटेल ७२पाचपावली ६४४व्हीएनआयटी ६११आमदार निवासात सर्वाधिक ‘क्वॉरंटाईन’शहरातील सात ‘क्वॉरंटाईन’ केंद्रांवर आतापर्यंत ३ हजार ५८३ लोकांना आणून त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली. त्यातील १ हजार ४८४ नागरिकांना घरी पाठविण्यात आले किंवा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत २ हजार ८९ नागरिक तेथे आहेत. सर्वाधिक १ हजार १४२ लोक आमदार निवासात आणले गेले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर