शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘क्वारंटाईन’ केलेल्यांची संख्या दोन हजारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 02:15 IST

‘कोरोना’च्या वाढत्या संकटात शहरातील ‘क्वारंटाईन’ केंद्रांमध्ये ठेवल्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढीस लागली आहे. हा आकडा आता दोन हजाराच्या वर गेला आहे. गुरुवारी या केंद्रांमध्ये आणखी १६८ लोक आणल्या गेले असून शहरातील विविध केंद्रांत २ हजार ८९ लोक ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकेंद्रांमध्ये वाढतेय संख्या : घरांमध्ये सव्वाचारशे लोक ‘क्वारंटाईन’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या वाढत्या संकटात शहरातील ‘क्वारंटाईन’ केंद्रांमध्ये ठेवल्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढीस लागली आहे. हा आकडा आता दोन हजाराच्या वर गेला आहे. गुरुवारी या केंद्रांमध्ये आणखी १६८ लोक आणल्या गेले असून शहरातील विविध केंद्रांत २ हजार ८९ लोक ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहेत.‘कोरोना’ चाचणीत ‘पॉझिटिव्ह’ आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून या केंद्रांत ठेवले जात आहे. मार्च महिन्यात परदेशातून येणाऱ्या नागरिकांना ठेवण्यासाठी आमदार निवासातील केंद्रात व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढल्याने इतर ठिकाणीदेखील ‘क्वारंटाईन’ केंद्र सुरू करण्यात आले. गुरुवारी १६८ लोकांना या केंद्रांत आणल्या गेले. यात पार्वतीनगरातील ८० हून अधिक लोक आहेत. बुधवारी रात्रीदेखील दीडशे लोकांना आणण्यात आले.दुसरीकडे ‘क्वारंटाईन’ केंद्रांचा विरोधदेखील होत आहे. वानाडोंगरी, पाचपावली, राजनगर स्थित ‘क्वारंटाईन’ केंद्रांचा विरोध झाला आहे. या केंद्रांमधून २३ जणांना कुठलीही लक्षणे नसल्याने घरी पाठविण्यात आले. तर ११ जणांना इस्पितळात भरती करावे लागले. याशिवाय शहरात ४२३ लोकांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले असून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे.बसेसमध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ नाही‘पॉझिटिव्ह’ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना बसेसच्या माध्यमातून ‘क्वारंटाईन’ केंद्रांवर नेले जात आहे. या प्रक्रियेत ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन होत नसल्याचा आरोप मनपाच्या आरोग्य सभापतींनी लावला आहे. सतरंजीपुरा, मोमिनपुरा तसेच पार्वतीनगर येथील लोकांना बसेसमधून नेण्यात आले, परंतु अंतराच्या नियमांचे पालन झाले नाही. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका होऊ शकतो.अशी आहे आकडेवारी (६ मेची आकडेवारी)आमदार निवास २९१वनामती ७सिम्बॉयसिस ४३२रविभवन ३२हॉटेल ७२पाचपावली ६४४व्हीएनआयटी ६११आमदार निवासात सर्वाधिक ‘क्वॉरंटाईन’शहरातील सात ‘क्वॉरंटाईन’ केंद्रांवर आतापर्यंत ३ हजार ५८३ लोकांना आणून त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली. त्यातील १ हजार ४८४ नागरिकांना घरी पाठविण्यात आले किंवा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत २ हजार ८९ नागरिक तेथे आहेत. सर्वाधिक १ हजार १४२ लोक आमदार निवासात आणले गेले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर