शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

महावितरण पुनर्रचनेत कार्यालयांची संख्या वाढणार : कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 21:27 IST

महावितरण प्रशासनाकडून सध्या हाती घेण्यात आलेल्या अंतर्गत मनुष्यबळ पुनर्रचना कार्यक्रमात कर्मचाऱ्यांची कोठेही कपात होणार नसून, उलटपक्षी उपविभागीय आणि शाखा कार्यालयांची संख्या वाढणार असल्याने भविष्यात अधिक मनुष्यबळ लागण्याची शक्यता असल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांनी मनातून भीती काढून टाकावी, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी संचालक (पायाभुत आराखडा) प्रसाद रेशमे यांनी नागपूर येथे आयोजित अधिकारी आणि कर्मचारी मेळाव्यात केले.

ठळक मुद्देपुनर्रचनेमुळे राज्यात ४६ नवीन उपविभाग कार्यालये आणि ९२ शाखा कार्यालये सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरण प्रशासनाकडून सध्या हाती घेण्यात आलेल्या अंतर्गत मनुष्यबळ पुनर्रचना कार्यक्रमात कर्मचाऱ्यांची कोठेही कपात होणार नसून, उलटपक्षी उपविभागीय आणि शाखा कार्यालयांची संख्या वाढणार असल्याने भविष्यात अधिक मनुष्यबळ लागण्याची शक्यता असल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांनी मनातून भीती काढून टाकावी, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी संचालक (पायाभुत आराखडा) प्रसाद रेशमे यांनी नागपूर येथे आयोजित अधिकारी आणि कर्मचारी मेळाव्यात केले.महावितरणमध्ये पुढील महिन्यापासून पुनर्रचना कार्यक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. याची माहिती देण्यासाठी काटोल रोड येथील विद्युत भवनातील महावितरणच्या कार्यालयात कार्यकारी संचालक रेशमे यांनी शुक्रवारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासमवेत संवाद साधला. यावेळी बोलताना रेशमे म्हणाले की, महावितरणची पुनर्रचना वीज ग्राहक आणि कर्मऱ्यांच्या हितावह असून पुनर्रचनेमुळे राज्यात ४६ नवीन उपविभाग कार्यालये आणि ९२ शाखा कार्यालये सुरु होणार आहेत.वीज ग्राहकांच्या तक्रारीची दखल शाखा कार्यालयात घेतल्या जाते मात्र नव्या रचनेत उपविभागीय पातळीवरून या तक्रारीची दखल घेऊन ती सोडवली जाणार आहे. परिणामी जनमित्रांच्या कामाचा ताण कमी होणार आहे. याशिवाय उपकेंद्राची आणि वीज वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी विभागीय पातळीवर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याच्या नेतृत्वात पथक कार्यरत राहणार आहे. या पुनर्रचनेमुळे काही ठिकाणी कर्मचारी अतिरिक्त होणार असले तरी त्याला जवळच्या विभागात अथवा मंडल कार्यालयात समायोजित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. सोबतच काही ठिकाणी नवीन शाखा आणि उपविभागीय कार्यालये सुरु होणार असल्याने अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे तेथेही समायोजन करणे शक्य आहे. अशा अधिकारी-कर्मचाºयांची सेवाज्येष्ठता किंवा घटनादत्त आरक्षणास धक्का लागणार नाही असेही रेशमे यांनी स्पष्ट केले.यावेळी नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी संचालक दिलीप घुगल, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, महाव्यस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता उमेश शहारे, नारायण आमझरे, दिलीप दोडके, हरीश गजबे, बंडू वासनिक, कार्यकारी अभियंता कुंदन भिसे, दीपाली माडेलवार, अमित परांजपे, प्रफुल लांडे, सहायक महाव्यस्थापक (मानव संसाधान) वैभव थोरात उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले.ग्राहक तक्रारी आणि वीज बिल वसुलीसाठी वेगळे पथक राहणारशाखा आणि उपविभागीय कार्यालयात कार्यरत कर्मचारी वर्गाला सध्या अनेक प्रकारची कामे करावी लागतात. परिणामी त्यांच्यावर कामाचा ताण येतो आहे. महावितरण प्रशासनकडून याची दखल घेत मनुष्यबळ पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या रचनेत ग्राहक तक्रारी, देखभाल आणि दुरुस्तीसाठी मोठ्या शहरी भागात उपविभागीय पातळीवर वेगळे कर्मचारी कार्यरत राहणार असून वीज बिल वसुलीसाठी वेगळे कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर