शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

फेरमूल्यांकनावरून ‘एनएसयूआय’, ‘अभाविप’ एकत्र : विद्यापीठ परिसरात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:40 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात फेरमूल्यांकनावरून होणारे आंदोलन संपल्यातच जमा होते. मात्र फेरमूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुदत संपल्याचे कारण समोर करून प्रशासनाने प्रवेश नाकारला अन् फेरमूल्यांकनावरून बऱ्याच कालावधीने विद्यापीठात आंदोलन झाले. विशेष म्हणजे विरुद्ध विचारधारा असलेल्या ‘एनएसयूआय’ व ‘अभाविप’ या संघटना या मुद्यावरून एकत्र आल्या व प्रशासनाविरोधात सायंकाळी उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देमुदत संपल्यानंतर प्रवेशास विद्यापीठाचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात फेरमूल्यांकनावरून होणारे आंदोलन संपल्यातच जमा होते. मात्र फेरमूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुदत संपल्याचे कारण समोर करून प्रशासनाने प्रवेश नाकारला अन् फेरमूल्यांकनावरून बऱ्याच कालावधीने विद्यापीठात आंदोलन झाले. विशेष म्हणजे विरुद्ध विचारधारा असलेल्या ‘एनएसयूआय’ व ‘अभाविप’ या संघटना या मुद्यावरून एकत्र आल्या व प्रशासनाविरोधात सायंकाळी उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केले.नागपूर विद्यापीठात प्रवेशाची अंतिम तारीख ६ आॅगस्ट होती. त्यानंतर विद्यापीठाने त्याला एक महिना मुदतवाढ दिली. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठीच ही प्रवेशाची मुदत असेल. फेरमूल्यांकनात उत्तीर्ण होणाºयांना अटींसह प्रवेश घेता येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. अभियांत्रिकीच्या फेरमूल्यांकनाचा निकाल १२ सप्टेंबर रोजी जाहीर झाला. विद्यार्थी पुढील वर्षासाठी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी गेले असता, त्यांना नकार देण्यात आला. प्रवेशाची मुदत उलटून गेली असल्याचे कारण त्यांना सांगण्यात आले.यानंतर ‘अभाविप’ व ‘एनएसयूआय’चे कार्यकर्ते विद्यार्थ्यांसमवेत शनिवारी सायंकाळी विद्यापीठात धडकले. फेरमूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्या, अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली. सुरक्षारक्षकांनी तातडीने पावले उचलत विद्यापीठाचे सर्व दरवाजे बंद केले. सायंकाळी ६ नंतर शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली. मात्र कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनीदेखील नियमांचा हवाला देत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिला.विद्यापीठात नियमांचेच पालन : कुलगुरूविद्यार्थी संघटनांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर कुलगुरुंनी त्यांना दिलासा देण्यास नाकारले. प्रवेशाची अंतिम तिथी निघून गेली आहे. त्यामुळे आता प्रवेश देता येणार नाही. जर या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला तर पुढे लागणाºया फेरमूल्यांकन निकालानंतरदेखील प्रवेश द्यावा लागेल. असे झाले तर नियमानुसार ९० दिवसांचे शैक्षणिक सत्र पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे परीक्षेचे आयोजन करताना अडचणी येतील. विद्यापीठात नियमांचेच पालन करण्यात येईल, असे डॉ. काणे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन