शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

एनपीआर हा एनआरसी लागू करण्याचा छुपा अजेंडा  : जावेद पाशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 20:38 IST

संविधानाच्या मूल्यातून आलेल्या लोकशाहीत विषमतेचे मूळ असलेली मनुवादी व्यवस्था आणता येत नाही हे लक्षात आल्याने मनुवादी विचारधारेचे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देएनआरसी म्हणजे मनुवादी व्यवस्था आणणारी प्रतिक्रांतीच

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : संविधानाच्या मूल्यातून आलेल्या लोकशाहीत विषमतेचे मूळ असलेली मनुवादी व्यवस्था आणता येत नाही हे लक्षात आल्याने मनुवादी विचारधारेचे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. नॅशनल रजिस्टर  ऑफ  सिटिझन  (एनआरसी) हा त्याचाच भाग आहे. मात्र संविधानामुळे एनआरसी लागू करण्यास अडचण येत असल्याने नॅशनल पापुलेशन रजिस्टर (एनपीआर) च्या माध्यमातून ती लागू करण्यात येत आहे. एनपीआर हा एनआरसी आणण्याचा छुपा अजेंडाच आहे, अशी परखड टीका ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा. जावेद पाशा यांनी केली.विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावित्री-फातिमा संस्कृती संगीतीमध्ये ते बोलत होते. कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे आयोजित कार्यक्रमात विद्रोही चळवळीचे धनाजी गुरव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जगजित सिंह, प्रसेनजित गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटन सत्रात बोलतांना प्रा. पाशा म्हणाले, विषमतेने बरबटलेल्या समाज व्यवस्थेला समतेच्या मार्गावर आणण्यासाठी तथागत बुद्ध, महावीर, चक्रधर, बसव अण्णा, गुरुनानक, येशू, पैगंबर, कबीर, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगवेगळ्या काळात क्रांती केली आहे. मात्र या क्रांतीला मोडून सत्ता वर्चस्वासाठी मनुवाद्यांची प्रतिक्रांती सातत्याने सुरू आहे. एनआरसी आणि सीएए हा सुद्धा प्रतिक्रांतीचाच भाग होय, जो संविधान मानण्यास इन्कार करणाऱ्या संघाच्या थिंक टॅँकने आधीच ठरवून दिला आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत बहुजनांचा सहभाग वाढविल्याने द्वेषाने महात्मा गांधी यांची हत्या करणारी हीच विचारधारा होय. मुस्लिमांना लक्ष्य करून आसाममध्ये एनआरसी लागू केल्यानंतर १४ लाखाहून अधिक बहुजन, आदिवासी व हिंदूनाच त्याचा फटका बसल्याने यांचे षड्यंत्र उघडे पडले. त्यामुळे देशात लागू करण्यात अडचणी लक्षात घेता वेगळा मार्ग निवडण्यात आला. धनाजी गुरव म्हणाले, विषमतापूर्ण व्यवस्थेसाठी प्रतिक्रांती करणे हा त्यांचा ठरलेला अजेंडा आहे. मात्र फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे अनुयायी, गांधींचे अनुयायी आणि पुरोगामी चळवळी चालविणाºयांनी काय केले, याचा विचार करावा. मनुवाद्यांनी वेगवेगळ्या समाजाच्या दैवतांना हिंदुत्वाच्या बुरख्याखाली एकत्रित करून सत्ता वर्चस्व कायम करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. आम्ही मात्र बुद्ध, महावीर, लिंगायत आणि गुरुनानकांच्या समतावादी विचारधारांना एका सूत्रात बांधू शकलो नाही. भारतीय संविधानात या सर्व विचारवंतांचे सार आहे, तरीही या समाजातील लोक संविधान मोडणाºयांच्या दावणीला बांधले जात असल्याचे परखड मत त्यांनी मांडले.प्रास्ताविक प्रसेनजित गायकवाड यांनी केले. संचालन माधुरी सेलोकर यांनी केले.

 मोदी, शहांचे आभार समता आणि सर्वांना समान अधिकारासाठी महान कार्य करणाºया महात्मा गांधी व डॉ. आंबेडकरांना समजून घेण्याचा प्रयत्न बहुजन समाज व मुस्लिमांनी कधी केला नाही. मात्र सीएए, एनआरसी आणण्याच्या घोषणेनंतर या महान नेत्यांशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासाठी मोदी आणि शहा यांचे आभार मानावेच लागतील, अशी उपरोधिक टीका प्रा. पाशा यांनी केली.

टॅग्स :National Register of Citizensएनआरसीnagpurनागपूर