शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

एनपीआर हा एनआरसी लागू करण्याचा छुपा अजेंडा  : जावेद पाशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 20:38 IST

संविधानाच्या मूल्यातून आलेल्या लोकशाहीत विषमतेचे मूळ असलेली मनुवादी व्यवस्था आणता येत नाही हे लक्षात आल्याने मनुवादी विचारधारेचे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देएनआरसी म्हणजे मनुवादी व्यवस्था आणणारी प्रतिक्रांतीच

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : संविधानाच्या मूल्यातून आलेल्या लोकशाहीत विषमतेचे मूळ असलेली मनुवादी व्यवस्था आणता येत नाही हे लक्षात आल्याने मनुवादी विचारधारेचे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. नॅशनल रजिस्टर  ऑफ  सिटिझन  (एनआरसी) हा त्याचाच भाग आहे. मात्र संविधानामुळे एनआरसी लागू करण्यास अडचण येत असल्याने नॅशनल पापुलेशन रजिस्टर (एनपीआर) च्या माध्यमातून ती लागू करण्यात येत आहे. एनपीआर हा एनआरसी आणण्याचा छुपा अजेंडाच आहे, अशी परखड टीका ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा. जावेद पाशा यांनी केली.विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावित्री-फातिमा संस्कृती संगीतीमध्ये ते बोलत होते. कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे आयोजित कार्यक्रमात विद्रोही चळवळीचे धनाजी गुरव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जगजित सिंह, प्रसेनजित गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटन सत्रात बोलतांना प्रा. पाशा म्हणाले, विषमतेने बरबटलेल्या समाज व्यवस्थेला समतेच्या मार्गावर आणण्यासाठी तथागत बुद्ध, महावीर, चक्रधर, बसव अण्णा, गुरुनानक, येशू, पैगंबर, कबीर, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगवेगळ्या काळात क्रांती केली आहे. मात्र या क्रांतीला मोडून सत्ता वर्चस्वासाठी मनुवाद्यांची प्रतिक्रांती सातत्याने सुरू आहे. एनआरसी आणि सीएए हा सुद्धा प्रतिक्रांतीचाच भाग होय, जो संविधान मानण्यास इन्कार करणाऱ्या संघाच्या थिंक टॅँकने आधीच ठरवून दिला आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत बहुजनांचा सहभाग वाढविल्याने द्वेषाने महात्मा गांधी यांची हत्या करणारी हीच विचारधारा होय. मुस्लिमांना लक्ष्य करून आसाममध्ये एनआरसी लागू केल्यानंतर १४ लाखाहून अधिक बहुजन, आदिवासी व हिंदूनाच त्याचा फटका बसल्याने यांचे षड्यंत्र उघडे पडले. त्यामुळे देशात लागू करण्यात अडचणी लक्षात घेता वेगळा मार्ग निवडण्यात आला. धनाजी गुरव म्हणाले, विषमतापूर्ण व्यवस्थेसाठी प्रतिक्रांती करणे हा त्यांचा ठरलेला अजेंडा आहे. मात्र फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे अनुयायी, गांधींचे अनुयायी आणि पुरोगामी चळवळी चालविणाºयांनी काय केले, याचा विचार करावा. मनुवाद्यांनी वेगवेगळ्या समाजाच्या दैवतांना हिंदुत्वाच्या बुरख्याखाली एकत्रित करून सत्ता वर्चस्व कायम करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. आम्ही मात्र बुद्ध, महावीर, लिंगायत आणि गुरुनानकांच्या समतावादी विचारधारांना एका सूत्रात बांधू शकलो नाही. भारतीय संविधानात या सर्व विचारवंतांचे सार आहे, तरीही या समाजातील लोक संविधान मोडणाºयांच्या दावणीला बांधले जात असल्याचे परखड मत त्यांनी मांडले.प्रास्ताविक प्रसेनजित गायकवाड यांनी केले. संचालन माधुरी सेलोकर यांनी केले.

 मोदी, शहांचे आभार समता आणि सर्वांना समान अधिकारासाठी महान कार्य करणाºया महात्मा गांधी व डॉ. आंबेडकरांना समजून घेण्याचा प्रयत्न बहुजन समाज व मुस्लिमांनी कधी केला नाही. मात्र सीएए, एनआरसी आणण्याच्या घोषणेनंतर या महान नेत्यांशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासाठी मोदी आणि शहा यांचे आभार मानावेच लागतील, अशी उपरोधिक टीका प्रा. पाशा यांनी केली.

टॅग्स :National Register of Citizensएनआरसीnagpurनागपूर