शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

आता राळेगण सिद्धीच्या धर्तीवर नागपुरातील बंधारयांची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:13 IST

नागपूर जिल्ह्यातील बंधारयाची कामेसुद्धा आता राळेगण सिद्धीच्या धर्तीवर करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्या.

ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सूचनाजलयुक्त शिवार अभियान कामांचा घेतला आढावा

आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपूर जिल्ह्यातील बंधारयाची कामेसुद्धा आता राळेगण सिद्धीच्या धर्तीवर करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्या.बचत भवन येथे नागपूर जिल्ह्यातील जलसंधारण व जलयुक्त शिवार कामासंदर्भात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ते बोलत होते. यावेळी आमदार समीर मेघे, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, रोहयो उपजिल्हाधिकारी मनिषा जायभाये उपस्थित होते.नदी, नाल्याचे पाणी अडवून बंधारा बांधण्यात येतो. या बंधाºयात अधिक जलसाठा शिल्लक राहावा, याकरिता बंधाºयाची कामे राळेगणसिद्धी येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्या प्रमाणे करण्यात यावी. याकरिता प्रत्यक्ष राळेगणसिद्धी येथील बंधाऱ्या ची पाहणी करून अहवाल तयार करण्याच्या सूचना सुद्धा पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्याना केल्या.पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी यावेळी दिली. तसेच शासकीय विभाग आणि लोकसहभागातून पहिल्याच वर्षी ३१३ गावांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार मृदा व जलसंधारणाची ५ हजार ५१ कामे पूर्ण करण्यात आली. ६१.८८ लाख घनमीटर नाल्यातील व तलावातील गाळ काढण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.जलयुक्त शिवार अभियानात २०१६-१७ या वर्षात ११९ गावे जलपरिपूर्ण झाली आहे. या अभियानातंर्गत २०१७-१८ या वर्षात नागपूर जिल्ह्यातील २२० गावांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. माथा ते पायथा तत्त्वावर निवडण्यात आलेल्या गावांमध्ये ३ हजार ४१९ कामे प्रस्तावित करण्यात आली असून, या कामांवर १५० कोटी ८४ लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली.

तीन वर्षात ४३२ गावे जलयुक्तजलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात तीन वर्षात ४९८ गावांपैकी ४३२ गावे जलयुक्त झाली आहेत. विविध उपाययोजनांमुळे शाश्वत सिंचनासोबतच पिण्याच्या पाणी टंचाईवर मात करतानाच भूगर्भातील जलाशयात लक्षणीय वाढ झाली आहे.रस्तेही होणार खड्डेमुक्तनागपूर शहरातील विविध रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे जनतेला त्रास होणार नाही, यादृष्टीने विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येक रस्त्यांची पाहणी करुन येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण खड्डे बुजविण्याचा कार्यक्रम तयार करा तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डेही १५ डिसेंबरपर्यंत पूर्णपणे बुजवा असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात खड्डेमुक्त रस्ते या विषयावर विविध विभागांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी आमदार समीर मेघे, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, आमदार सुधाकर देशमुख, जिल्हा परिषद सभापती निशा सावरकर, नागपूर महानगरपालिका आयुक्त अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे सह संबंधित विभागाचे अभियंता, उपअभियंता उपस्थित होते.शहरातील रस्त्यांवर ८ ते १० हजार खड्डे असून यासाठी कालबद्ध कार्यक्रमानुसार अंमलबजावणी करावी, यासाठी कार्यकारी अभियंता व संबंधित उप अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.ग्रामीण भागातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून या मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे. विशेषत: तारसा- निमखेडा, कन्हान- तारसा, कान्हान- निमखेडा मार्गावर सतत वर्दळ सुरू त्वरित दखल घेऊन खड्डे बुजविण्यात यावे. तसेच नॅशनल हायवेवरील १६७ किलोमीटरचा रस्ता दुरुस्त करा. या व्यतिरिक्त काटोल, रामटेक, नरखेड, उमरेड- कुही , कामठी या विधानसभा मतदारसंघनिहाय खड्डे असलेल्या रस्त्यांचा अहवाल तयार करुन रस्ते दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील विविध ५० रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे असून अपघाताला आव्हान दिल्या जात असल्याने या मार्गावरील खड्डे बुजविण्याकरिता नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अभियंतांना या बैठकीत देण्यात आल्या.

टॅग्स :Damधरण