शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आता एमआयडीसीचे रिक्त प्लॉट नवीन उद्योजकांना मिळणार

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 17, 2024 20:44 IST

- युटिलिटी प्लॉटची विक्री बंद करावी : बंद कारखान्यांचे वाद निकाली काढावेत.

नागपूर : राज्याच्या औद्योगिक विकासासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेल्या विविध एमआयडीसीमध्ये रिक्त असलेले प्लॉट नवीन उद्योजकांना देण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) घेतला आहे. त्यामुळे नवीन उद्योजकांना प्लॉट मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. यानिमित्ताने अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या कारखान्यांचा लिलाव करून ती जागा नवीन उद्योजकांना देण्याची मागणीही पुढे आली आहे. याद्वारे प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात नवीन उद्योग सुरू होऊन राेजगाराचा प्रश्न सुटणार आहे. 

विविध एमआयडीसीमध्ये रिक्त प्लॉट उद्योजकांना देण्यात यावेत, अशी नवीन उद्योजकांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. शिवाय केवळ प्लॉट अडवून उद्योग सुरू न केलेल्यांकडून प्लॉट परत घेण्याची प्रक्रिया एमआयडीसी सुरू करणार असल्याची माहिती आहे. 

हिंगणा एमआयडीसी ३४ युटिलिटी प्लॉटचे उद्योजकांना हस्तांतरणउद्धव ठाकरे सरकारमधील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हिंगणा एमआयडीसीमधील ३४ युटिलिटी प्लॉटचे हस्तांतरण उद्योजकांना अवैधरीत्या केल्याची माहिती आहे. तसे पाहता या प्लॉटचा उपयोग केवळ बगिचा, हॉस्पिटल वा सार्वजनिक उपयोगासाठी करण्यात येतो. पण मंत्र्याच्या दबावाखाली अधिकाऱ्यांनी युटिलिटी प्लॉटचे हस्तांतरण केले. आता हिंगणा एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनने इएसआयसी रुग्णालयासाठी एमआयडीसीकडे एक एकर प्लॉटची मागणी केली आहे. पण एमआयडीसीच्या विभागीय अधिकाऱ्याकडून रुग्णालयाच्या उभारणीसाठी प्लॉट शिल्लक नसल्याचे उत्तर मिळत असल्याची माहिती आहे. या युटिलिटी प्लॉटच्या विक्रीत झालेल्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची काही उद्योजकांची मागणी आहे.

रिक्त प्लॉटची मागणी कार्यालयात प्रकाशित कराबऱ्याच उद्योजकांनी राज्यातील एमआयडीसीमध्ये सरकारी दरात प्लॉट विकत घेतले, पण अजूनही उद्योग सुरू केला नाही. अशा उद्योजकांची संख्या राज्यात मोठी असून अधिकाऱ्यांनी कार्यालयात प्रकाशित करण्याची मागणी आहे. प्लॉट अडविलेल्यांवर अधिकारी काहीही कारवाई करीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय बँकांकडे थकित कर्जाचा भरणा न केल्यामुळे बंद पडलेल्या कारखान्यांचा वाद निकाली काढून या जमिनी नवीन उद्योजकांना हस्तांतरित कराव्यात, अशी मागणीही आता पुढे आली आहे. 

एमआयडीसीला जमीन अधिग्रहणावर मर्यादाकारखान्याच्या विस्तारीकरणासाठी जागेच्या अधिग्रहणावर एमआयडीसीला मर्यादा आहेत. नव्याने उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांना जमीन देण्यासाठी एमआयडीसीकडे जागा शिल्लक नाही. दुसरीकडे राज्यातील बऱ्याच एमआयडीसीमध्ये बंद पडलेल्या कारखान्यांची संख्या मोठी आहे. शिवाय रिक्त प्लॉट परत घेऊन नवीन उद्योगाला देण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर