शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

आता बसच्या ‘एक्झिट डोअर’वर आरटीओचे लक्ष; समृद्धीच्या एन्ट्री पॉइंटवर वाहनांची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 08:21 IST

समृद्धी महामार्गावर मागील ६ महिने १९ दिवसांत तब्बल १,२८७ अपघात झाले. यात ७० प्राणांतिक, ८३७ गंभीर तर ३८० किरकोळ स्वरूपातील अपघात आहेत.

-सुमेध वाघमारेनागपूर : विदर्भ ट्रॅव्हलच्या बसला लागलेल्या आगीत ‘एक्झिट डोअर’ उघडलेच गेले नाही, यामुळे मृतांचा आकडा वाढला. ‘आरटीओ’ने याला उशिरा का होईना गंभीरतेने घेतल्याचे दिसून येत आहे. समृद्धी महामार्गाच्या ‘एन्ट्री पाइंट’वरच आता वायू पथकाला २४ बाय ७ तैनात करून या ‘डोअर’ची प्रत्यक्ष तपासणी हाती घेतली आहे. या शिवाय, वाहनाची कागदपत्रे, टायर सुस्थितीत असल्यावरच पुढील प्रवासाला परवानगी देत आहे.

समृद्धी महामार्गावर मागील ६ महिने १९ दिवसांत तब्बल १,२८७ अपघात झाले. यात ७० प्राणांतिक, ८३७ गंभीर तर ३८० किरकोळ स्वरूपातील अपघात आहेत. शनिवारी झालेल्या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याने संपूर्ण यंत्रणाच खडबडून जागी झाली. या महामार्गावर आतापर्यंत ९५ जणांचे जीव गेले आहेत. अपघात रोखण्यासाठी आरटीओकडून सुरुवातीपासून उपाययोजना केल्या जात असल्या तरी दरम्यानच्या काळात  शिथिलता आली होती. 

चालकाचे समुपदेशन

समृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पाइंटवरच आता ‘आरटीओ’चे पथक प्रत्येक वाहनांची कागदपत्रे तपासत आहे. या सोबतच टायरची तपासणी केली जात आहे. कमी हवा असेल किंवा टायर गुळगुळीत झाले असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत त्यांना परत पाठविले जात आहे. चालकांचे समुपदेशन केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, ट्रॅव्हल बसची विशेष तपासणी केली जात आहे. यात आपत्कालीन स्थितीत बाहेर पडणारा दरवाजा उघडतो किंवा नाही याची प्रत्यक्ष चाचणी घेतली जात आहे. सर्व काही सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यावरच पुढील प्रवासाला परवानगी दिली जात आहे.  

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात