शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

आता बसच्या ‘एक्झिट डोअर’वर आरटीओचे लक्ष; समृद्धीच्या एन्ट्री पॉइंटवर वाहनांची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 08:21 IST

समृद्धी महामार्गावर मागील ६ महिने १९ दिवसांत तब्बल १,२८७ अपघात झाले. यात ७० प्राणांतिक, ८३७ गंभीर तर ३८० किरकोळ स्वरूपातील अपघात आहेत.

-सुमेध वाघमारेनागपूर : विदर्भ ट्रॅव्हलच्या बसला लागलेल्या आगीत ‘एक्झिट डोअर’ उघडलेच गेले नाही, यामुळे मृतांचा आकडा वाढला. ‘आरटीओ’ने याला उशिरा का होईना गंभीरतेने घेतल्याचे दिसून येत आहे. समृद्धी महामार्गाच्या ‘एन्ट्री पाइंट’वरच आता वायू पथकाला २४ बाय ७ तैनात करून या ‘डोअर’ची प्रत्यक्ष तपासणी हाती घेतली आहे. या शिवाय, वाहनाची कागदपत्रे, टायर सुस्थितीत असल्यावरच पुढील प्रवासाला परवानगी देत आहे.

समृद्धी महामार्गावर मागील ६ महिने १९ दिवसांत तब्बल १,२८७ अपघात झाले. यात ७० प्राणांतिक, ८३७ गंभीर तर ३८० किरकोळ स्वरूपातील अपघात आहेत. शनिवारी झालेल्या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याने संपूर्ण यंत्रणाच खडबडून जागी झाली. या महामार्गावर आतापर्यंत ९५ जणांचे जीव गेले आहेत. अपघात रोखण्यासाठी आरटीओकडून सुरुवातीपासून उपाययोजना केल्या जात असल्या तरी दरम्यानच्या काळात  शिथिलता आली होती. 

चालकाचे समुपदेशन

समृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पाइंटवरच आता ‘आरटीओ’चे पथक प्रत्येक वाहनांची कागदपत्रे तपासत आहे. या सोबतच टायरची तपासणी केली जात आहे. कमी हवा असेल किंवा टायर गुळगुळीत झाले असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत त्यांना परत पाठविले जात आहे. चालकांचे समुपदेशन केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, ट्रॅव्हल बसची विशेष तपासणी केली जात आहे. यात आपत्कालीन स्थितीत बाहेर पडणारा दरवाजा उघडतो किंवा नाही याची प्रत्यक्ष चाचणी घेतली जात आहे. सर्व काही सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यावरच पुढील प्रवासाला परवानगी दिली जात आहे.  

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात