शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

आता शाळा कळविणार मोबाईलवर निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:19 IST

विद्यार्थी व पालकांसाठी एक आशादायक बातमी आहे. निकाल पाहण्यासाठी त्यांना आता शाळेत जाण्याची गरज नाही. त्याऐवजी पालकांच्या मोबाईलवर किंवा ई-मेलवर शाळेकडून निकाल पाठविले जाणार आहेत.

आशीष दुबेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थी व पालकांसाठी एक आशादायक बातमी आहे. निकाल पाहण्यासाठी त्यांना आता शाळेत जाण्याची गरज नाही. त्याऐवजी पालकांच्या मोबाईलवर किंवा ई-मेलवर शाळेकडून निकाल पाठविले जाणार आहेत. शिक्षण विभागाने यासंदर्भात तसे निर्देश दिले असून, यासाठी फॉर्म्युला तयार करून तो शाळांना पाठविला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागाकडून आलेल्या आदेशानुसार मिळालेल्या प्रारूपानुसार निकालपत्रक तयार करण्यात शिक्षक गुंतले आहेत. प्रत्यक्षात या कामात त्यांना बऱ्याच अडचणी येत आहेत. यासाठी त्यांनी शाळेतील प्राचार्यांच्या माध्यमातून शिक्षण विभागाकडे सहकार्याचीही मागणी केली आहे.शाळांना १० मेपर्यंत निकाल जाहीर करायचे आहेत. यंदा परीक्षा न झाल्याने निकालपत्र तयार करावे लागणार नाही, अशीच बहुतेक शिक्षकांची धारणा होती. मात्र आलेल्या आदेशामुळे आता त्यांची धावपळ उडाली आहे. या निकालामध्ये विद्यार्थ्यांना प्रमोट करायचे आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भातील एक प्रारूप तयार करून पाठवले असले तरी प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांसाठी अद्याप अशा प्रकारचा फॉर्म्युला मिळालेला नाही. तर सीबीएससी अभ्यासक्रमसंबंधित शाळांच्या परीक्षा पूर्ण झाल्याने आता त्यानुसारच ते निकालपत्रक तयार करत आहेत. ज्या शाळांमध्ये परीक्षाच झालेल्या नाहीत, तिथे घटक चाचण्या किंवा तोंडी परीक्षेच्या आधारावर निकाल घोषित करण्यात आले आहेत.आता पालकांचे मोबाईल नंबर मिळविण्यासाठी धावाधावशिक्षण विभागाच्या आदेशानंतर आता शिक्षक विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी शोधण्याच्या कामी गुंतले आहेत. लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने शिक्षकांना आपल्या स्तरावरच हे नंबर शोधावे लागत आहेत.असा आहे फॉर्म्युलाशिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार १३ मार्चपर्यंत झालेल्या प्रथम व द्वितीय सत्रातील मौखिक प्रात्यक्षिक प्रथम सत्र परीक्षेत १०० गुण तर अंतर्गत मूल्यांकनासाठी ४० गुण द्यायचे आहेत. परीक्षांच्या आधारावर विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन करायचे आहे.

 

टॅग्स :SchoolशाळाResult Dayपरिणाम दिवस