शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

आता, गरिबांची आर्थिक विवंचना दूर करा! नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 22:54 IST

बाबासाहेबांचे लंडनमधील घर विकत घेऊन राजकुमार बडोले यांनी देशाला एक आंतरराष्ट्रीय स्मारक दिले आहे. त्यांनी सामाजिक न्याय देण्याचे प्रयत्न अग्रक्रमाने केले आहे. आता, त्यांनी इनोव्हेशन, डेव्हलपमेंटचा विचार तळागाळातल्या आर्थिक विवंचनेत जगणाऱ्यांची समस्या दूर करण्याचे प्रयत्न करावे, असा मौलिक सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे दिला.

ठळक मुद्दे‘भावसुमनांची ओंजळ’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाबासाहेबांचे लंडनमधील घर विकत घेऊन राजकुमार बडोले यांनी देशाला एक आंतरराष्ट्रीय स्मारक दिले आहे. त्यांनी सामाजिक न्याय देण्याचे प्रयत्न अग्रक्रमाने केले आहे. आता, त्यांनी इनोव्हेशन, डेव्हलपमेंटचा विचार तळागाळातल्या आर्थिक विवंचनेत जगणाऱ्यांची समस्या दूर करण्याचे प्रयत्न करावे, असा मौलिक सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे दिला.युगंधर क्रिएशन्सच्या वतीने शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित सोहळ्यात, शारदा बडोले यांच्या ‘भावसुमनांची ओंजळ’ या पहिल्याच कवितासंग्रहाचे प्रकाशन गडकरी यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रसिद्ध आंबेडकरी विचारक रावसाहेब कसबे, माजी मंत्री राजकुमार बडोले, वनराई फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी.एस. थूल, लेखिका जुल्फी शेख उपस्थित होते. याप्रसंगी दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.उदारमतवाद आणि दहशतवाद अशा दोन मतांचा फार मोठा वैचारिक संघर्ष जगात सुरू आहे. भगवान बुद्धाने दिलेला जगण्याचा संदेश अखिल मानवतेसाठीचा आहे. त्याच्या विचारांची प्रेरणा बाबासाहेबांनी घेतली आणि सामाजिक व शैक्षणिक क्रांती घडली आहे. आता त्यापुढे जाऊन, ज्ञान-विज्ञानाच्या बाबतीत काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. विज्ञान आधारित आर्थिक प्रगती व विकासाच्या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. त्याच अनुषंगाने नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांना डिझेलमुक्त करण्याचे कार्य सुरू झाले असून, भंडारा-गोंदिया जिल्ह्यात तणसापासून बायोसीएनजीचे २०० प्रकल्प उभे राहू शकतात आणि १० हजारांवर युवकांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याअनुषंगाने कार्य करण्याचे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. याप्रसंगी रावसाहेब कसबे यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. संदेश वाघ यांनी केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. डॉ. अनिल खोब्रागडे व प्रख्यात गायिका बेला शेंडे यांनी कवितासंग्रहातील दोन गीतांची प्रस्तुती दिली.शारदा यांना अपघातशारदा बडोले यांना सकाळी बागेत फिरताना अपघात झाल्याने, त्या प्रकाशन सोहळ्याला हजर राहू शकल्या नाही. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीliteratureसाहित्य