शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

आता नागपूर-मुंबई विमानाचे रात्री उड्डाण, भाडे १९०० ते २ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:07 IST

विमाने रिक्त जाण्याऐवजी प्रवाशांकडून कमी भाडे घेऊन मुंबई आणि दिल्लीला जात आहेत. त्यामुळे मुंबईला जाणारे विमान नागपूर विमानतळावरून रात्री उड्डाण भरणार आहे.

ठळक मुद्देमदिनाहून येताहेत एअर इंडियाची विमाने : कंपनीची मध्यरात्रीनंतर दिल्ली विमानसेवा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मक्का येथे यात्रेसाठी गेलेले भाविक आता मदिनाहून नागपुरात एअर इंडियाच्या विमानाने परत येत आहेत. ही विमाने सकाळी, दुपारी आणि रात्री येणार आहेत. विमाने रिक्त जाण्याऐवजी प्रवाशांकडून कमी भाडे घेऊन मुंबई आणि दिल्लीला जात आहेत. त्यामुळे मुंबईला जाणारे विमान नागपूर विमानतळावरून रात्री उड्डाण भरणार आहे.मदिना येथून एकूण १२ विमानातून यात्रेकरू नागपुरात येणार आहेत. पहिले विमान १ सप्टेंबरला आले. दुसरे विमान गुरुवारी मध्यरात्रीनंतर रात्री २ वाजता येणार आहे. हेच विमान मुंबईला रिक्त जाण्याऐवजी एअर इंडियाने कमी फेअरची योजना आणली आहे. या विमानाचे भाडे १९०० ते २ हजारांदरम्यान आहे. एरवी नागपूर ते मुंबईचे भाडे ३५०० ते ५ हजार रुपयांदरम्यान असते. त्यामुळे रात्री प्रवास करताना प्रवाशांची आर्थिक बचत होणार आहे.एअर इंडियाचे वरिष्ठ स्टेशन व्यवस्थापक वसंत बरडे यांनी सांगितले की, एअर इंडियाची एकूण १२ विमाने मदिना येथून नागपुरात येणार आहेत. त्यापैकी ९ विमाने मुंबईला परत जातील. ही विमाने रिक्त जाण्याऐवजी कंपनीने कमी फेअर शुल्काची योजना आणली आहे. त्याचा प्रवाशांना फायदा होत आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर मुंबईला जाणाऱ्या १६० सिटचे एअर बस विमान फुल्ल आहे. याशिवाय वेळापत्रकानुसार प्रवाशांनी पूर्वीच बुकिंग केले आहे.याशिवाय एअर इंडिया २८ सप्टेंबरपासून नागपूर-दिल्ली आणि दिल्ली-नागपूर नवीन विमानसेवा रात्री सुरू करणार आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमानाचे भाडे कमी राहणार आहे. हे विमान रात्री २ वाजता उड्डाण करून पहाटे ३.४० वाजता दिल्लीला पोहोचणार आहे. तत्पूर्वी दिल्लीहून रात्री ११.३० वाजता निघून नागपुरात १.३५ वाजता पोहोचणार आहे.घरगुती प्रवासात एअर इंडिया पहिल्यांदाच मध्यरात्रीनंतर विमान सेवा सुरू करणार आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय मार्गावरच रात्री धावपट्टीचा उपयोग करण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास अन्य कंपन्याही विमानसेवा सुरू करण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीनंतर नागपुरातून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना अन्य शहरात जाण्यासाठी कनेक्टिंग विमाने मिळतील.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाnagpurनागपूर