शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

आता वंचितशिवाय सरकार बनणे अशक्य : अण्णाराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 22:21 IST

वंशवाद, जातीवाद आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या राजकीय पक्षाला दूर सारण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडी ही तिसरा सक्षम पर्याय म्हणून पुढे आली असून, यापुढे महाराष्ट्रात वंचित आघाडीशिवाय सरकार बनविणे अशक्य राहील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी येथे पत्रपरिषदेत केला.

ठळक मुद्देउमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वंशवाद, जातीवाद आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या राजकीय पक्षाला दूर सारण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडी ही तिसरा सक्षम पर्याय म्हणून पुढे आली असून, यापुढे महाराष्ट्रात वंचित आघाडीशिवाय सरकार बनविणे अशक्य राहील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी येथे पत्रपरिषदेत केला.वंचित बहुजन आघाडी येत्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. उमेदवारांच्या मुलाखतीची सुरुवात शनिवारी नागपुरातून करण्यात आली. रविभवन येथील कॉटेज क्रमांक १३ मध्ये नागपूरसह वर्धा, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यातील उमेदवारांच्या मुलाखती यावेळी घेण्यात आल्या. मुलाखतींना उत्तम प्रतिसाद मिळाला. १११ जणांनी मुलाखती दिल्या. दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, महिला प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, खुशाल मेश्राम, सागर डबरासे, नीतेश जंगले, शहराध्यक्ष रवी शेंडे उपस्थित होते.काँग्रेससोबत आघाडी होईल की नाही, याबाबत विचारले असता अण्णाराव पाटील यांनी सांगितले की, आघाडीचा निर्णय पक्षनेतृत्व घेतील. परंतु उद्या आघाडी झाली नाही तर ऐन वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून आम्ही राज्यातील सर्व २८८ जागा लढविण्याची तयारी ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला चांगले मतदान झाले. त्या आधारावर विधानसभेच्या कमीतकमी ८२ जागा निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला. राज्यातील उमेदवारांच्या मुलाखतीला नागपुरातून सुरुवात होत आहे. चांगला प्रतिसाद आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही विविध वंचित बहुजन समाजाला प्रतिनिधित्व दिले जाईल. परंतु उमेदवारी देताना चारित्र्यसंपन्न, सुशिक्षित, समाजाशी नाळ जुळलेला आणि प्रामाणिक राहील, यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.लक्ष्मण माने यांच्याबाबत विचारले असता त्यांचा बोलविता धनी वेगळा असल्याचे सांगत यापुढे पक्षात असा प्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक