शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आता वंचितशिवाय सरकार बनणे अशक्य : अण्णाराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 22:21 IST

वंशवाद, जातीवाद आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या राजकीय पक्षाला दूर सारण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडी ही तिसरा सक्षम पर्याय म्हणून पुढे आली असून, यापुढे महाराष्ट्रात वंचित आघाडीशिवाय सरकार बनविणे अशक्य राहील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी येथे पत्रपरिषदेत केला.

ठळक मुद्देउमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वंशवाद, जातीवाद आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या राजकीय पक्षाला दूर सारण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडी ही तिसरा सक्षम पर्याय म्हणून पुढे आली असून, यापुढे महाराष्ट्रात वंचित आघाडीशिवाय सरकार बनविणे अशक्य राहील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी येथे पत्रपरिषदेत केला.वंचित बहुजन आघाडी येत्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. उमेदवारांच्या मुलाखतीची सुरुवात शनिवारी नागपुरातून करण्यात आली. रविभवन येथील कॉटेज क्रमांक १३ मध्ये नागपूरसह वर्धा, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यातील उमेदवारांच्या मुलाखती यावेळी घेण्यात आल्या. मुलाखतींना उत्तम प्रतिसाद मिळाला. १११ जणांनी मुलाखती दिल्या. दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, महिला प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, खुशाल मेश्राम, सागर डबरासे, नीतेश जंगले, शहराध्यक्ष रवी शेंडे उपस्थित होते.काँग्रेससोबत आघाडी होईल की नाही, याबाबत विचारले असता अण्णाराव पाटील यांनी सांगितले की, आघाडीचा निर्णय पक्षनेतृत्व घेतील. परंतु उद्या आघाडी झाली नाही तर ऐन वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून आम्ही राज्यातील सर्व २८८ जागा लढविण्याची तयारी ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला चांगले मतदान झाले. त्या आधारावर विधानसभेच्या कमीतकमी ८२ जागा निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला. राज्यातील उमेदवारांच्या मुलाखतीला नागपुरातून सुरुवात होत आहे. चांगला प्रतिसाद आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही विविध वंचित बहुजन समाजाला प्रतिनिधित्व दिले जाईल. परंतु उमेदवारी देताना चारित्र्यसंपन्न, सुशिक्षित, समाजाशी नाळ जुळलेला आणि प्रामाणिक राहील, यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.लक्ष्मण माने यांच्याबाबत विचारले असता त्यांचा बोलविता धनी वेगळा असल्याचे सांगत यापुढे पक्षात असा प्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक