शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

आता विधानसभानिहाय समाधान शिबिर

By admin | Updated: May 31, 2015 02:38 IST

प्रशासन आणि जनता यामधील सेतूचं काम समाधान शिबिर करील. यापुढे नागपूर शहर व जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात हा उपक्रम राबविण्यात येईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : शिबिर म्हणजे प्रशासन व जनतेमधील ‘सेतू’नागपूर : प्रशासन आणि जनता यामधील सेतूचं काम समाधान शिबिर करील. यापुढे नागपूर शहर व जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात हा उपक्रम राबविण्यात येईल. जेणेकरून जनतेला न्याय मिळेल. यापुढे कालमर्यादेत काम पूर्ण करण्याची हमी देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिले. मुख्यमंत्री प्रतिनिधित्व करीत असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी समाधान शिबिराच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन मुंडले हायस्कूल येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. महापौर प्रवीण दटके, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, पक्षनेते दयानंद तिवारी, आ. सुधाकर देशमुख, आ.प्रा. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, आ. समीर मेघे, आ. विकास कुंभारे, आ.डॉ. मिलिंद माने, विभागीय आयुक्त अनुप कुमार, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पालक सचिव प्रवीण दराडे, पोलीस आयुक्त एस.पी. यादव, अप्पर आदिवासी आयुक्त माधवी खोडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, दैनंदिन गरजांसाठी लागणारी कागदपत्रे वेळीच उपलब्ध करून द्यावी. केवळ शिबिरातच नव्हे तर रोजच्या रोज कालमर्यादेत प्रशासनाने काम पूर्ण केले पाहिजे. समाधान शिबिर हे जनता आणि प्रशासनामधील दुवा आहे. यापुढे हे उपक्रम जनता आणि प्रशासन या दोघांमध्ये सेतूचे काम करणार आहे. यानिमित्ताने लोकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. हैदराबाद हाऊस येथील मुख्यमंत्री सचिवालय आपण सुरू केले असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. लोकांना वेळेत सेवा मिळाली पाहिजे, या हेतूने सेवा हमी विधेयक राज्य शासनाने आणले आहे. या विधेयकामध्ये १५० सेवांचा अंतर्भाव केला असला तरी भविष्यात सर्व सेवा समाविष्ट करण्याचा मानस असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कायदा केल्यानंतर कोणीही त्यात कुचराई करता कामा नये. जनतेच्या तक्रारी व समस्यांना प्रशासन आणि शासन जबाबदार असणार आहे. प्रशासनात गतिमानता आणल्याशिवाय लोकांची कामे तातडीने होणार नाही. त्यासाठी संगणकीकरणाचा उपयोग कामकाजात आणला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)