शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नदी पात्रातील झोपडपट्टीधारकांना नोटीस

By admin | Updated: May 15, 2016 02:47 IST

पावसाळ्यात पिवळी नदी व चांभार नाला परिसरातील वस्त्यांना पुराचे पाणी शिरण्याचा धोका असतो.

शहरातील १२१ ठिकाणे धोकादायक : ३८०० कुटुंबांना धोका नागपूर : पावसाळ्यात पिवळी नदी व चांभार नाला परिसरातील वस्त्यांना पुराचे पाणी शिरण्याचा धोका असतो. अनेकदा प्राणहानी होण्याचा धोका असतो. ही बाब विचारात घेता नदी व नाल्यातील गाळ काढण्यासोबतच नदीपात्रातील झोपडपट्टीधारकांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जाणार आहे. महापालिकेच्या मंगळवारी व आशीनगर झोन कार्यालयांनी नदी पात्रातील अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्याला सुरुवात केली आहे. महापालिके च्या आपत्ती निवारण विभागाने पावसाळ्यात पाणी शिरण्याची शक्यता असलेली नागपूर शहरातील १२१ ठिकाणे व वस्त्या धोकादायक ठरविल्या आहेत. अतिवृष्टी व पूर आल्यास या वस्त्यात पाणी शिरण्याचा धोका असतो. यामुळे ३८०० कुटुंंबांना धोका निर्माण होतो. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात या वस्त्यांतील लोकांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यापूर्वी नियोजन करण्यात आले आहे. आपत्ती निवारणासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. नदी व नाल्यातील गाळ व कचरा काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पिवळी नदी काठावर वा नदीपात्रात ४०० अतिक्रमणे आहेत. गंगानगर, गोदावरीनगर, सूरजनगर, पलोटीनगर आदींचा यात समावेश आहे. यातील ३०० झोपडपट्टीधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)नियमाचे उल्लंघन करून बांधकामनियमानुसार नदी पात्रात ५०० मीटर परिसरात कोणत्याही स्वरुपाचे बांधकाम करता येत नाही. परंतु शहरातील सर्वच नद्यांच्या काठावर अतिक्रमण करण्यात आले आहे. नियमाचे सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे. काही भागातील अतिक्रमण वर्षानुवर्षे असल्याने ते काढणे शक्य नाही. परंतु अलिकडील काही वर्षात वसलेल्या झोपड्या हटविण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. पिवळी नदी पात्रात २२०० अतिक्र मणआशीनगर झानेच्या हद्दीतील पिवळी नदी पात्रात २२०० अतिक्र मण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना आठवडाभरात अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रामदासपेठ, काचीपुरा झोपडपट्टीचा भाग, धरमपेठ विद्यालयाच्या मागील भाग, तेलंगखेडी तलावाचा परिसर, शीलानगर, गवळीपुरा, पांढराबोडी, हजारी पहाड, गांधीनगर झोपडपट्टी, संजयनगर, शिवाजीनगर, आदर्शनगर, ताजनगर, वांजरा, वांजरी, नारी, झिंगाबाई टाकळी, सक्करदरा भागातील झोपडपट्ट्या, पोहरा नदी काठावरील वस्त्यांना पावसाळ्यात पाणी शिरण्याचा धोका असतो.