शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

नदी पात्रातील झोपडपट्टीधारकांना नोटीस

By admin | Updated: May 15, 2016 02:47 IST

पावसाळ्यात पिवळी नदी व चांभार नाला परिसरातील वस्त्यांना पुराचे पाणी शिरण्याचा धोका असतो.

शहरातील १२१ ठिकाणे धोकादायक : ३८०० कुटुंबांना धोका नागपूर : पावसाळ्यात पिवळी नदी व चांभार नाला परिसरातील वस्त्यांना पुराचे पाणी शिरण्याचा धोका असतो. अनेकदा प्राणहानी होण्याचा धोका असतो. ही बाब विचारात घेता नदी व नाल्यातील गाळ काढण्यासोबतच नदीपात्रातील झोपडपट्टीधारकांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जाणार आहे. महापालिकेच्या मंगळवारी व आशीनगर झोन कार्यालयांनी नदी पात्रातील अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्याला सुरुवात केली आहे. महापालिके च्या आपत्ती निवारण विभागाने पावसाळ्यात पाणी शिरण्याची शक्यता असलेली नागपूर शहरातील १२१ ठिकाणे व वस्त्या धोकादायक ठरविल्या आहेत. अतिवृष्टी व पूर आल्यास या वस्त्यात पाणी शिरण्याचा धोका असतो. यामुळे ३८०० कुटुंंबांना धोका निर्माण होतो. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात या वस्त्यांतील लोकांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यापूर्वी नियोजन करण्यात आले आहे. आपत्ती निवारणासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. नदी व नाल्यातील गाळ व कचरा काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पिवळी नदी काठावर वा नदीपात्रात ४०० अतिक्रमणे आहेत. गंगानगर, गोदावरीनगर, सूरजनगर, पलोटीनगर आदींचा यात समावेश आहे. यातील ३०० झोपडपट्टीधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)नियमाचे उल्लंघन करून बांधकामनियमानुसार नदी पात्रात ५०० मीटर परिसरात कोणत्याही स्वरुपाचे बांधकाम करता येत नाही. परंतु शहरातील सर्वच नद्यांच्या काठावर अतिक्रमण करण्यात आले आहे. नियमाचे सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे. काही भागातील अतिक्रमण वर्षानुवर्षे असल्याने ते काढणे शक्य नाही. परंतु अलिकडील काही वर्षात वसलेल्या झोपड्या हटविण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. पिवळी नदी पात्रात २२०० अतिक्र मणआशीनगर झानेच्या हद्दीतील पिवळी नदी पात्रात २२०० अतिक्र मण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना आठवडाभरात अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रामदासपेठ, काचीपुरा झोपडपट्टीचा भाग, धरमपेठ विद्यालयाच्या मागील भाग, तेलंगखेडी तलावाचा परिसर, शीलानगर, गवळीपुरा, पांढराबोडी, हजारी पहाड, गांधीनगर झोपडपट्टी, संजयनगर, शिवाजीनगर, आदर्शनगर, ताजनगर, वांजरा, वांजरी, नारी, झिंगाबाई टाकळी, सक्करदरा भागातील झोपडपट्ट्या, पोहरा नदी काठावरील वस्त्यांना पावसाळ्यात पाणी शिरण्याचा धोका असतो.