शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नव्हे केवळ एक कुटुंबच मजबूत झाले : राधामोहन सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:39 IST

‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह कृषी विकास व तंत्रज्ञान यांच्यावर भाष्य करतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात त्यांनी राजकीय स्वरूपाच्या भाषणावरच जास्त भर दिला. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेतकऱ्यांऐवजी केवळ एक कुटुंबच मजबूत झाले, असा आरोप करत अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. 

ठळक मुद्देआघाडी व संपुआ सरकारवर जोरदार टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह कृषी विकास व तंत्रज्ञान यांच्यावर भाष्य करतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात त्यांनी राजकीय स्वरूपाच्या भाषणावरच जास्त भर दिला. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेतकऱ्यांऐवजी केवळ एक कुटुंबच मजबूत झाले, असा आरोप करत अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. 

विदर्भाचा भाग हा शेतकरी आत्महत्यांसाठीच चर्चेत होता. मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून केवळ एकाच कुटुंबाला मजबूत करण्याचे प्रयत्न झाले. जर काही चांगले काम केले असते, तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींवर २००७ मध्येच अंमलबजावणी व्हायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. आता मोदी सरकार त्याला लागू करत आहे, तेव्हा विरोधकांना शेतकरी आठवत आहेत. देशाचे राजकुमार मागील १० वर्षांपासून कुठल्या खाटेवर झोपले होते, असा प्रश्न उपस्थित करत संपुआ शासनाने लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांची दुरवस्था झाली असल्याचा आरोप त्यांनी लावला. विरोधक नोटाबंदीमुळे शेतकरी अडचणीत आल्याचे आरोप करत आहेत. मात्र नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना कुठलीही समस्या निर्माण झाली नाही. प्रत्यक्षात नोटाबंदीमुळे बँकांमध्ये पैशांचा ओघ वाढला व शेतकरी हिताच्या विविध योजनांची मजबूतपणे अंमलबजावणी झाली. नोटाबंदीमुळे काही विशिष्ट लोकांचे नुकसान नक्कीच झाले व ते आज जामिनावर फिरत आहेत, असा टोला त्यांनी मारला. संपुआ सरकारच्या काळापेक्षा कृषीक्षेत्रातील अर्थसंकल्पीय तरतूद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्रात फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला नेहमीच फायदा होतो व त्यांचे ‘व्हिजन’ नवी दिशा दाखविणारे असते, असेदेखील राधामोहन सिंह म्हणाले. 
मराठवाड्यातील मुख्यमंत्र्यांनी काय केले ?काही वर्षांअगोदर लातूरमध्ये अक्षरश: रेल्वेगाड्यांतून पिण्याचे पाणी आणण्यात आले होते. आश्चर्याची बाब म्हणजे लातूर व आजूबाजूच्या परिसराने महाराष्ट्राला चार मुख्यमंत्री दिले. मात्र त्यांनी एक विशिष्ट कुटुंब, पक्ष आणि स्वत:च्याच फायद्यावर भर दिला. जलसंवर्धनाकडे दुर्लक्षच केले. परिणामी चार मुख्यमंत्री देऊनदेखील लातूरच्या नशिबी अशी स्थिती आली, अशी टीका राधामोहन सिंह यांनी केली.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी