शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कुंडली नव्हे, रिपोर्टने जुळणार ‘रेशीमगाठी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:37 IST

विवाह अर्थातच विश्वासाचे नाते. परंतु जोडीदारातील एकाला दुर्धर आजार जडल्यास संसाराची राखरांगोळी झाल्याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात.

ठळक मुद्देतास ग्रामपंचायतने घेतला ठराव : विवाहपूर्व एचआयव्ही, सिकलसेल तपासणी

शरद मिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कभिवापूर : विवाह अर्थातच विश्वासाचे नाते. परंतु जोडीदारातील एकाला दुर्धर आजार जडल्यास संसाराची राखरांगोळी झाल्याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात. आजार लपवून विवाहानंतर त्याचा खुलासा झाल्यास पवित्र नात्यात कटुता निर्माण होते आणि कुटुंबीयांवर मोठा आघात होतो. अशा प्रसंगाची दखल म्हणून सुमारे १५०० लोकसंख्येच्या तास गटग्रामपंचायतने महत्त्वपूर्ण ठराव घेतला आहे. गावातील तरुण-तरुणी जन्म पत्रिका पाहून विवाह बंधनात न अडकता, एचआयव्ही, सिकलसेल तपासणीचे रिपोर्ट कार्ड बघितल्यानंतर रेशीमगाठी जुळणार आहे. ग्रामपंचायतच्या या आगळ्यावेगळ्या ठरावाच्या संकल्पपूर्तीसाठी तास येथील महिलांनी निर्धार केला आहे.गटग्रामपंचायत तास व सह्याद्री संस्था नागपूर यांच्या संयुक्त प्रयत्नातून ११ आॅक्टोबरला असंख्य गावकºयांच्या उपस्थितीत ‘विवाहपूर्व एचआयव्ही, एड्स व सिकलसेल चाचणी’चा ठराव घेण्यात आला. या गटग्रामपंचायत अंतर्गत मोखाळा गावाचाही समावेश आहे. १५ आॅगस्ट या स्वातंत्र्यदिनी व गांधी जयंतीला झालेल्या ग्रामसभेत सदर विषय ठेवण्यात आला होता. हा ठराव सर्वानुमते पारित झाल्यानंतर त्याची गावात १०० टक्के अंमलबजावणी करण्यासाठी प्रारंभी सह्याद्री संस्था, ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील तरुणांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले.दरम्यान, ११ आॅक्टोबरला ग्रामपंचायतमध्ये झालेल्या एका सभेत ‘आधी एचआयव्ही, एड्स व सिकलसेलची चाचणी आणि त्यानंतर लग्न’ असा संकल्प ग्रामस्थांनी केला आणि तास गावामध्ये नव्या आदर्शाच्या पाऊलखुणा उमटण्यास सुरुवात झाली. यावेळी सरपंच युवराज शंभरकर, उपसरपंच वर्षा ढोणे, ग्रामविकास अधिकारी ए.डी. गजघाटे, विभागीय पर्यवेक्षक रुपाली सदावर्ती, जिल्हा साधन व्यक्ती नंदू सातपुते, ग्रामीण रुग्णालयाचे एचआयव्ही समुपदेशक ओमप्रकाश पोटभरे, सारिका मेश्राम, संगीता मेश्राम आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थितांना एचआयव्ही, एड्स व सिकलसेलबाबत सखोल माहिती देऊन ठरावाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय सदर ठरावाची प्रत शासनाच्या एड्स नियंत्रण संस्था मुंबई व नागपूर जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाला पाठविण्यात आली.सह्याद्रीतर्फे गौरवसह्याद्री संस्थेने यासाठी प्रयत्न केले असले तरी याबाबतचा ठराव पारित करणे व त्यांच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतने घेतलेला पुढाकार व त्यास ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद हा मोलाचा आहे. हा ऐतिहासिक ठराव ग्रामपंचायतने एकमताने पारित केल्याबद्दल सह्याद्रीतर्फे ग्रामपंचायत पदाधिकाºयांचा सत्कार यावेळी करण्यात आला.कौटुंबिक कलह थांबतीलअशा प्रकाराचा ऐतिहासिक ठराव घेणारी तास गटग्रामपंचायत पहिलीच ठरली आहे. एचआयव्हीमुळे विवाहानंतर हातावरील मेहंदी निघण्यापूर्वीच संसाराची राखरांगोळी होते. यामध्ये जोडीदारापैकी कुणीही जबाबदार असू शकतो. त्यामुळे तळहातावरील रेषा बघून, जन्म पत्रिका बघितल्यानंतर विवाह बंधनात अडकण्यापेक्षा एचआयव्ही, एड्स, सिकलसेल तपासणीचे रिपोर्ट कार्ड बघून विवाहाच्या रेशीमगाठी जुळल्यास कौटुंबिक कलह थांबतील, अशा प्रतिक्रिया सरपंच युवराज शंभरकर, उपसरपंच वर्षा ढोणे, ग्रामसेवक ए. डी. गजघाटे, एचआयव्ही समुपदेशक ओमप्रकाश पोटभरे यांनी व्यक्त केल्या.