शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

ईश्वरापेक्षा मोठा वैज्ञानिक नाही : शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:34 IST

अध्यात्मात विज्ञान सामावलेले आहे. विज्ञानात आपण अध्यात्माचा शोध घेऊ शकत नाही. परंतु अध्यात्मात विज्ञानाचा शोध घेता येतो असे सांगून ईश्वरापेक्षा कोणताच वैज्ञानिक मोठा नाही, असे मार्गदर्शन श्री ऋगवैदिय पूर्वाम्नाय गोवर्धन मठ पुरी पीठाचे १४५ वे श्रीमद्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी केले.

ठळक मुद्देश्री ऋगवैदिय पूर्वाम्नाय गोवर्धन मठपुरी पीठाचे १४५ वे श्रीमद्जगद्गुरु

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अध्यात्मात विज्ञान सामावलेले आहे. विज्ञानात आपण अध्यात्माचा शोध घेऊ शकत नाही. परंतु अध्यात्मात विज्ञानाचा शोध घेता येतो असे सांगून ईश्वरापेक्षा कोणताच वैज्ञानिक मोठा नाही, असे मार्गदर्शन श्री ऋगवैदिय पूर्वाम्नाय गोवर्धन मठ पुरी पीठाचे १४५ वे श्रीमद्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी केले.श्री ऋगवैदिय पूर्वाम्नाय गोवर्धन मठ पुरी पीठाचे १४५ वे श्रीमद्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती महाराजांचे शनिवारी नागपुरात आगमन झाले. हिवरीनगरच्या श्री बडी मारवाड माहेश्वरी भवनात त्याच्या दर्शनाचा, प्रवचनाचा लाभ भाविकांनी घेतला. स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज म्हणाले, विज्ञानाच्या मान्यता अस्थिर आहेत. वेदविरहित विज्ञानाला क्रियान्वित केल्यामुळे जगात विस्फोटाची स्थिती निर्माण झाली आहे. केवळ ऊँ आणि रामाची व्याख्या केली तर त्यात संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे. भारतीय शिक्षण पद्धतीवर ते म्हणाले, ही पद्धती साम्यवाद आणि विदेश तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. परंतु भारतीय शिक्षण पद्धती कितीतरी पटीने मोठी आहे. परंपरेने शास्त्रांचे ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. भारताचे पौराणिक नाव आणि इतर नावांबाबत त्यांनी विस्ताराने माहिती दिली. सोबतच भारताला भारत म्हटल्यास वावगे नसल्याचे त्यांनी सांगितले. स्वामीजींच्या आगमनाप्रसंगी त्यांचे स्वागत आणि वंदन करण्यात आले. त्यांच्या चरणपादुकांचे पूजन अरुण लखानी यांनी केले. पादुका दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, पुरुषोत्तम मालू, राधेशाम सारडा, महेश पुरोहित, मनोज बियाणी, राजेंद्र चांडक उपस्थित होते.सद्भाव स्थापन करण्याची गरजस्वामी शंकराचार्य सरस्वती महाराज म्हणाले, संवादाच्या माध्यमातून संवाद स्थापन करण्याची गरज आहे. आजचा काळ संक्रमणाचा आहे. सनातन मार्गावर वाटचाल करण्यासाठी लोक असमर्थ आहेत. वर्णव्यवस्था योग्य असल्याचे सांगत त्यांनी ती आवश्यक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, सर्वांच्या मर्यादा असतात. त्यांचे पालन केल्यामुळेच आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहचता येते. पूर्वीच्या जन्मात चांगले कर्म केले नसल्यास त्याचा परिणाम या जन्मावर पडतो. परंतु धर्म आणि ईश्वराच्या भक्तीने आपण ते अनुकूल करु शकतो. वाल्मिकी रामायण आणि गीतेत त्याचा उल्लेख आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnagpurनागपूर