शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

ईश्वरापेक्षा मोठा वैज्ञानिक नाही : शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:34 IST

अध्यात्मात विज्ञान सामावलेले आहे. विज्ञानात आपण अध्यात्माचा शोध घेऊ शकत नाही. परंतु अध्यात्मात विज्ञानाचा शोध घेता येतो असे सांगून ईश्वरापेक्षा कोणताच वैज्ञानिक मोठा नाही, असे मार्गदर्शन श्री ऋगवैदिय पूर्वाम्नाय गोवर्धन मठ पुरी पीठाचे १४५ वे श्रीमद्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी केले.

ठळक मुद्देश्री ऋगवैदिय पूर्वाम्नाय गोवर्धन मठपुरी पीठाचे १४५ वे श्रीमद्जगद्गुरु

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अध्यात्मात विज्ञान सामावलेले आहे. विज्ञानात आपण अध्यात्माचा शोध घेऊ शकत नाही. परंतु अध्यात्मात विज्ञानाचा शोध घेता येतो असे सांगून ईश्वरापेक्षा कोणताच वैज्ञानिक मोठा नाही, असे मार्गदर्शन श्री ऋगवैदिय पूर्वाम्नाय गोवर्धन मठ पुरी पीठाचे १४५ वे श्रीमद्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी केले.श्री ऋगवैदिय पूर्वाम्नाय गोवर्धन मठ पुरी पीठाचे १४५ वे श्रीमद्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती महाराजांचे शनिवारी नागपुरात आगमन झाले. हिवरीनगरच्या श्री बडी मारवाड माहेश्वरी भवनात त्याच्या दर्शनाचा, प्रवचनाचा लाभ भाविकांनी घेतला. स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज म्हणाले, विज्ञानाच्या मान्यता अस्थिर आहेत. वेदविरहित विज्ञानाला क्रियान्वित केल्यामुळे जगात विस्फोटाची स्थिती निर्माण झाली आहे. केवळ ऊँ आणि रामाची व्याख्या केली तर त्यात संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे. भारतीय शिक्षण पद्धतीवर ते म्हणाले, ही पद्धती साम्यवाद आणि विदेश तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. परंतु भारतीय शिक्षण पद्धती कितीतरी पटीने मोठी आहे. परंपरेने शास्त्रांचे ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. भारताचे पौराणिक नाव आणि इतर नावांबाबत त्यांनी विस्ताराने माहिती दिली. सोबतच भारताला भारत म्हटल्यास वावगे नसल्याचे त्यांनी सांगितले. स्वामीजींच्या आगमनाप्रसंगी त्यांचे स्वागत आणि वंदन करण्यात आले. त्यांच्या चरणपादुकांचे पूजन अरुण लखानी यांनी केले. पादुका दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, पुरुषोत्तम मालू, राधेशाम सारडा, महेश पुरोहित, मनोज बियाणी, राजेंद्र चांडक उपस्थित होते.सद्भाव स्थापन करण्याची गरजस्वामी शंकराचार्य सरस्वती महाराज म्हणाले, संवादाच्या माध्यमातून संवाद स्थापन करण्याची गरज आहे. आजचा काळ संक्रमणाचा आहे. सनातन मार्गावर वाटचाल करण्यासाठी लोक असमर्थ आहेत. वर्णव्यवस्था योग्य असल्याचे सांगत त्यांनी ती आवश्यक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, सर्वांच्या मर्यादा असतात. त्यांचे पालन केल्यामुळेच आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहचता येते. पूर्वीच्या जन्मात चांगले कर्म केले नसल्यास त्याचा परिणाम या जन्मावर पडतो. परंतु धर्म आणि ईश्वराच्या भक्तीने आपण ते अनुकूल करु शकतो. वाल्मिकी रामायण आणि गीतेत त्याचा उल्लेख आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnagpurनागपूर