शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा विद्यार्थ्यांविना पोरकी

By admin | Updated: May 28, 2014 00:52 IST

‘झाड झडूले शस्त्र बनेंगे फूल बनेगी सेना..’ अशा शब्दात राष्ट्रप्रेमाचा बिगुल फुंकणार्‍या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून समाज विकासाचा एक नवीन आदर्श घडविला.

नागपूर : ‘झाड झडूले शस्त्र बनेंगे फूल बनेगी सेना..’ अशा शब्दात राष्ट्रप्रेमाचा बिगुल फुंकणार्‍या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून समाज विकासाचा एक नवीन आदर्श घडविला. त्यांच्या याच जाज्वल्य विचारांचा समाजाला पुढेही लाभ व्हावा, या उदात्त उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये मोठा गाजावाजा करीत राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा विभाग सुरू करण्यात आले. परंतु दोन वर्षे लोटूनही या विभागाला विद्यार्थीच उपलब्ध होत नसल्याने राष्ट्रसंतांची विचारधाराच जणू पोरकी झाली आहे.

विदर्भ ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी. त्या उद्देशाने २00५ मध्ये नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्यात आले. त्यानंतर चार वर्षांनी २00९ साली राष्ट्रसंतांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यापीठात भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तत्कालीन कुलगुरू एस.एन. पठाण यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील, तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आवर्जून उपस्थित होते. त्यावेळी नागपूर विद्यापीठामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा विभाग सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री चव्हाण यांनी त्यासाठी दोन कोटी रुपयेसुद्धा उपलब्ध करून दिले. या निधीतून राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यावर भर देण्यात आला.

विद्यापीठातील तुकडोजी विचारधारा विभागासाठी डॉ. अक्षयकुमार काळे आणि श्री गुरुदेव युवा मंचचे प्रवर्तक ज्ञानेश्‍वर रक्षक यांनी परिश्रमपूर्वक अभ्यासक्रम तयार केला. २0१0-११ मध्ये विचारधारा विभागाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. सध्या हा विभाग मराठी विभागांतर्गत असून, डॉ. अक्षयकुमार काळे विभागाचे प्रमुख म्हणून कार्यभार पाहत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा विभागात सध्या बी.ए. आणि एम.ए. अभ्यासक्रम सुरू आहे. शैक्षणिक सत्राचे हे दुसरे वर्ष आहे. परंतु या विभागाला अजूनपर्यंत विद्यार्थीच उपलब्ध झालेले नाही. परिणामी हा विभाग केवळ कागदावरच उरला आहे. यासंदर्भात विद्यापीठातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारेसाठी बी.ए.चा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. परंतु विद्यापीठातील संलग्नित एकही महाविद्यालय हा विभाग सुरू करायला तयार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अधिव्याख्यातांचा खर्च कोण भागविणार हा आहे. तसेच एम.एम. अभ्यासक्रमासाठीसुद्धा काही अटी घालण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी विभागाकडे पाठ फिरविली आहे. एकूणच विद्यापीठातील अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा विभागाच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)