शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

परीक्षेची चिंता नाही, शाळा बंद झाल्याने काळजी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 10:30 IST

Nagpur News कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, प्रशासनाने ७ मार्चपर्यंत शाळा बंद केल्या. शाळा, ज्युनिअर कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची लिंक लागली होती. आता शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण कसा होईल? याची चिंता पालकांना सतावत आहे.

ठळक मुद्देदहावी, बारावीच्या पालकांनी व्यक्त केली खंत

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दहावी आणि बारावीची परीक्षा एप्रिल महिन्यात ऑफलाईन होणार आहे. कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. नोव्हेंबरमध्ये कशातरी शाळा सुरू झाल्या. पण कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, प्रशासनाने ७ मार्चपर्यंत शाळा बंद केल्या. शाळा, ज्युनिअर कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची लिंक लागली होती. आता शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण कसा होईल? याची चिंता पालकांना सतावत आहे.

कोरोना संक्रमणात परीक्षेचे नियोजन बोर्डासाठी डोकेदुखी ठरणार आहे. ऑफलाईन परीक्षा असल्याने पालकांनाही परीक्षा देण्यासाठी पाठविण्याबाबत काहीसी भीती आहे. पण या भीतीपेक्षा शाळा बंद झाल्याने पालक पुन्हा चिंतेत आहे. नागपूर जिल्ह्यातील काही पालकांशी यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले की, परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी बोर्डाची आहे. कोरोना असल्याने बोर्ड त्या दृष्टीकोनातून सुरक्षात्मक उपाययोजना करणारच आहे. पालक म्हणून आम्हीसुद्धा विद्यार्थ्यांना योग्य सुरक्षात्मक उपाययोजना करूनच पाठविणार आहोत. पण खरा प्रश्न आहे, की शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी अभ्यास करायला लागले होते. सराव परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी होणार होती. किमान त्या माध्यमातून परीक्षेची तयारी होणार होती. मात्र, शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची लिंक तुटणार आहे. कोरोनाचे संकट पुढे किती दिवस राहाते, शाळा पुन्हा सुरू होतील की नाही, हा प्रश्न आहे.

- माझी मुलगी दहावीची परीक्षा देणार आहे. परीक्षा ऑफलाईनच व्हायला पाहिजे. त्यामुळे मुलांचे योग्य मूल्यांकन व त्याला गुणवत्ता सिद्ध करता येईल. बोर्ड करेल ना सुरक्षात्मक नियोजन.

राजेश भागवतकर, पालक

- परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची बोर्ड घेईल ना काळजी. पण, खरी काळजी आता शाळा ज्या बंद झाल्यात ना, त्याची आहे. मुले कशीतरी अभ्यासाला लागली होती. शालेय परीक्षेच्या माध्यमातून त्यांची उजळणी होणार होती. शाळा बंद झाल्याने पुन्हा विद्यार्थ्यांची लिंक तुटेल.

दिलीप आडे, पालक

- प्रशासनाने केवळ दहावी व बारावीचे वर्गच सुरू करायला हवे होते. उगाच पाचव्या वर्गापासून शाळा सुरू केली. त्यामुळे शाळेत गर्दी झाली आणि विद्यार्थी संक्रमित झाले. परिणामी शाळा बंद कराव्या लागल्या. पण, शाळा बंद केल्याने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होणार आहे. सर्वच मुलांकडे ऑनलाईनची साधने नाहीत आणि विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्यानेही घेत नाहीत. शाळा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी होत होती.

- रिना चवरे, पालक

- कोरोनाच्या भीतीमुळे मुलांना वर्षभर शाळेत पाठविले नाही. परंतु परीक्षेसाठी त्यांना शाळेत पाठवून अनेक विद्यार्थ्यांच्या संपर्कात येऊ देणे म्हणजे एकप्रकारे कोरोनाला निमंत्रण देणे होय. मुलांमध्ये भीती असल्याने ते परीक्षेत एकाग्रपणे राहून पेपर सोडवू शकणार नाहीत. यासाठी परीक्षा ऑनलाईन घेणेच संयुक्तिक आहे.

बाळा आगलावे, पालक

- दहावी आणि बारावीच्या मुलांना कोरोना कळतोय. खबरदारी घ्यावी हेसुद्धा त्यांना माहिती आहे. शाळा सुरू झाल्यानंतर मुले खबरदारी घेतच होती. शाळांनीही मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली होती. शिक्षण चांगले सुरू होते. मुलेही परीक्षेच्या तयारीत व्यस्त झाली होती. त्यामुळे दहावी आणि बारावीचे वर्ग किमान बंद करायला नको होते.

रामचंद्र उमाठे, पालक

- विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झाला नाही. शाळेत कसातरी अभ्यासक्रम पूर्ण झाला असता, सराव परीक्षेच्या माध्यमातून त्यांचा सराव झाला असता. अभ्यासक्रमच पूर्ण होणार नाही, तर परीक्षा कशी देणार, याची काळजी आहे.

विलास कांबळे, पालक

टॅग्स :SchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस