शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात नळाला नाही धार, नागरिक झाले बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 21:20 IST

No water, nagpur news एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठाही कमी दाबाने होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे टिल्लू पंपाचा वापर वाढला आहे.

ठळक मुद्देदिवसाआड पाणी, त्यातही दाब नाही : टिल्लू पंपाचाही वापर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत गोरेवाडा स्थित (पेंच १, पेंच २, पेंच ३) आणि गोधनी (पेंच ४) जलशुद्धीकरण केंद्रावर आधारित असलेले लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली, मंगळवारी, आसीनगर तसेच सतरंजीपुरा झोन या भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठाही कमी दाबाने होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे टिल्लू पंपाचा वापर वाढला आहे.

सक्करदारा परिसरातील नागरिकांनी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार केली आहे. अन्य काही भागातील नागरिकांच्याही टिल्लू पंपाचा वापर होत असल्याने नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही नागरिकांना पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

पंपाचा वापर होत असलेल्या वस्त्या

मनपा व ओसीडब्ल्यू यांनी पंपाचा सर्रास वापर होणाऱ्या भागाची माहिती घेतली आहे. यात धंतोली झोन अंतर्गत महाल, सावित्रीबाई फुले नगर, वकीलपेठ, सिरसपेठ, भालदारपुरा आणि बाजेरिया, बजरंग नगर, आंबेडकर मार्ग, आशी नगर झोनमध्ये दीक्षित नगर, यशोधरा नगर, धरमपेठ झोनमधील फुटाला वस्ती, संजय नगर वस्ती, हजारी पहाड, सुरेंद्रगढ, सतरंजी पुरा झोन भागातील मोमिनपुरा, मोहम्मद आली सराय, कुंभार पुरा, बरसे नगर, शोभा खेत, लष्कारीपुरा घासी पुरा, हनुमान नगर झोनमध्ये राहटे नगर टोळी, नेहरू नगरमधील ताजबाग, या भागात बेकायदेशीररीत्या टिल्लू पंप मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत.

कायदेशीर कारवाईचा इशारा

बेकायदेशीररीत्या बूस्टर टिल्लू पंप वापरून जास्तीचे पाणी घेणे हे केवळ बेकायदेशीरच आहे. मनपाच्या पाणी उपविधीनुसार दंडनीय अपराध आहे व असा वापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येऊ शकते. मनपा पाणीपट्टी दर उपविधीनुसार बूस्टर पंप अथवा तत्सम उपकरण वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यात पाणीपुरवठा खंडित करून पंप जप्त करण्याचा इशारा मनपाने दिला आहे. ओसीडब्ल्यू व मनपाने नागरिकांना टिल्लू पंप न वापरण्याचे आवाहन केले आहे. पंपाचा वापर होत असल्याने मनपा व ओसीडब्ल्यूला कळविण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातnagpurनागपूर