शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

वेतन मिळाले नाही, घरांमधून कचरा उचल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:27 IST

शहरातील कचरा संकलनासाठी दोन कंपन्यांच्या नियुक्तीला जेमतेम दीड महिना होत नाही तोच कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना दीड महिना लोटूनही वेतन न मिळाल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले.

ठळक मुद्देस्वच्छता कर्मचाऱ्यांचा असहकार, मुख्यालयात प्रदर्शन : कचरा संकलन व्यवस्था कोलमडली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरातील कचरा संकलनासाठी दोन कंपन्यांच्या नियुक्तीला जेमतेम दीड महिना होत नाही तोच कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना दीड महिना लोटूनही वेतन न मिळाल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले. कचरा उचल थांबविल्याने शहरात स्वच्छता व्यवस्था कोलमडली असून परिणामी शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र निर्माण झाले.शहरातील अव्यवस्था बघता आंदोलनकारी कर्मचाऱ्यांना १५ दिवसाचे वेतन देण्यात आले. मात्र न्यूनतम वेतनश्रेणीच्या आधारे वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचा असंतोष अधिकच भडकला. त्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी महापालिका मुख्यालयात जाऊन प्रदर्शन केले. कर्मचाऱ्यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन सोपविले. आयुक्तांनी नियमानुसार वेतन जारी करण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले आहे. आंदोलनकर्त्या कर्मचाºयांनी मुख्यालयासमोर जोरदार प्रदर्शन केले. सोबतच कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर हुकूमशाहीचे वर्तन करण्याचा आरोप करीत शनिवारी कामबंद आंदोलनाची घोषणा केली. दोन्ही कंपन्यांचे अधिकारी कर्मचाऱ्यांशी अव्यवहार करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. एका भागात काम करीत असताना हजेरी लावण्यासाठी दुसऱ्या भागात जावे लागते. पावसामुळे काही मिनिटे उशीर झाला तरी कर्मचाऱ्यांना परत पाठविण्यात येत असल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या.विशेष म्हणजे दीड महिन्याअगोदरच शहरातील कचरा संकलन अधिक सक्षम करण्यासाठी दहा झोनला दोन भागात विभागून दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली. यानुसार झोन १ ते ५ पर्यंतचे कंत्राट ए.जी. एन्वायरोला तर झोन क्रमांक ६ ते १० पर्यंतचे काम बीव्हीजी कंपनीला देण्यात आले. काम मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कचरा उचल न झाल्याने अव्यवस्था निर्माण झाली होती. ही स्थिती सामान्य होण्यासाठी १५ दिवस लोटले. यादरम्यान दोन्ही कंपन्यांवर एक-एक लाख रुपये दंडही लावण्यात आला होता. वेतन कमी मिळालेशुक्रवारी सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करताच दोन्ही कंपन्यांचे अधिकारी सक्रिय झाले. यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात १५ दिवसाचे वेतन जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बीव्हीजी कंपनीच्या ९५० पैकी ६३५ कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा करण्यात आले. दुसरीकडे ए.जी. एन्वायरोच्या १००० पैकी ६०० कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा करण्यात आल्याची माहिती आहे. कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार कामगारांना ६७८ रुपये तर वाहन चालकांना ९५५ रुपये देण्याचा करार झाला होता. मात्र जे वेतन खात्यांमध्ये जमा करण्यात आले ते कामगारांना ४०० रुपये तर वाहन चालकांना प्रतिदिन ६०० रुपये वेतन देण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी एवढ्या कमी वेतनामध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न