शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आता सकाळी ११ नंतर वीज जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 21:55 IST

शहरातील वाढते तापमान बघता महावितरणच्या नागपूरकर वीज ग्राहकांची दुपार सुसह्य करण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून देखभाल व दुरुस्तीचे काम तूर्तास उर्वरित उन्हाळाभर सकाळी ११ च्या पूर्वी केले जाणार आहे. महावितरणने हिट अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला असून सकाळी ११ वाजतानंतर आता ‘नो शटडाऊन’ म्हणजेच वीज जाणार नाही.

ठळक मुद्देदुपारी ‘नो शटडाऊन’ : महावितरणने जारी केला‘हिट अ‍ॅक्शन प्लान’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वाढते तापमान बघता महावितरणच्या नागपूरकर वीज ग्राहकांची दुपार सुसह्य करण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून देखभाल व दुरुस्तीचे काम तूर्तास उर्वरित उन्हाळाभर सकाळी ११ च्या पूर्वी केले जाणार आहे. महावितरणने हिट अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला असून सकाळी ११ वाजतानंतर आता ‘नो शटडाऊन’ म्हणजेच वीज जाणार नाही.मान्सूनपूर्व तयारीच्या कामात महावितरणने गती पकडली आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावयाची याशिवाय नियमित देखभाल व दुरुस्ती सोबतच महामेट्रोच्या अत्यावश्यक कामांसाठी वेगवेगळ्या भागातील वीजपुरवठा रीतसर पूर्वसूचना देऊन काही वेळेपुरता स्थगित केला जात आहे. अनेकदा दुपारभर ही कामे चालत असल्याने संबंधित भागाचा वीजपुरवठा काही तासांसाठी बंद केल्या जातो, मात्र मागील काही दिवसांपासून नागपुरात अंग पोळून काढणारे तापमान बघता देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी ११ वाजताच्या पुढे वीजपुरवठा खंडित न करण्याचा निर्णय महावितरणच्या काँग्रेसनगर विभागाने घेतला आहे. यामुळे देखभाल व दुरुस्तीच्या सर्व कामांकरिता नागपुरातील महावितरणच्या ग्राहकांना पूर्वसूचना देऊन सकाळी ११ पूर्वीच वीजपुरवठा बंद केला जाणार आहे.मागील काही दिवसांपासून नागपूरकरांना प्रचंड उन्हाळ्याला सामोरे जावे लागत आहे. पाऱ्याने सातत्याने चाळीशी ओलांडली आहे. अशावेळी देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद केल्याने ग्राहकांना प्रचंड मन:स्ताप होतो, सोबतच देखभाल व दुरुस्तीच्या कामावरील कर्मचाऱ्यांनाही कडक उन्हाचा त्रास होतो, हे लक्षात घेता किमान उन्हाळ्यात तरी वीज ग्राहकांना यात दिलासा मिळावा याकरिता महावितरणच्या शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके आणि काँग्रेसनगर विभागाचे कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांनी हा निर्णय घेतला आहे.या निर्णयाची अंमलबजावणी यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. प्रचंड उष्णता व विजेचा वाढीव भार यामुळे वीज वितरण यंत्रणेत एखादा तांत्रिक दोष निर्माण झाल्यास दुपारीही वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. हा बिघाड त्वरित दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करेपर्यत ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे तसेच खंडित वीजपुरवठा किंवा विजेसंबंधी तक्रारीसाठी १९१२ किंवा १८००२३३३४३५अथवा १८००१०२३४३५या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन