शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

‘कोरोना’काळात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ नाहीच : राजकीय नेत्यांनी ‘संयम’ पाळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:46 IST

लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या नेतेमंडळींना आंदोलनाच्या नादात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा मात्र सोयीस्कररीत्या विसर पडतो आहे. नेतेच ‘कोरोना’बाबतीत खबरदारी घेत नसल्याने कार्यकर्तेदेखील त्यांचीच री ओढताना दिसून येत आहेत. अशा स्थितीत हे राजकारणी ‘कोरोना वाहक’ तर होणार नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देलोका सांगे ब्रह्मज्ञान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे ‘कोरोना’चा प्रकोप सुरू असताना उपराजधानीत राजकीय वातावरणदेखील तापलेले दिसून येत आहे. विविध मुद्द्यांवरून आंदोलने करण्यात येत आहे. मात्र लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या नेतेमंडळींना आंदोलनाच्या नादात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा मात्र सोयीस्कररीत्या विसर पडतो आहे. नेतेच ‘कोरोना’बाबतीत खबरदारी घेत नसल्याने कार्यकर्तेदेखील त्यांचीच री ओढताना दिसून येत आहेत. अशा स्थितीत हे राजकारणी ‘कोरोना वाहक’ तर होणार नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.‘कोरोना’चा प्रकोप सुरूच असल्यामुळे सर्वांनी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करावे व तसेच ‘मास्क’ घालावेत अशा वारंवार सूचना देण्यात येत आहेत. खुद्द राजकीय पक्षांचे नेतेदेखील यासंदर्भात सूचना करताना दिसून येतात. मात्र आंदोलन किंवा बैठकांदरम्यान मात्र त्याचा विसर पडत आहे. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी राज्यातील विविध ठिकाणी राजभवनासमोर निदर्शने केली. या आंदोलनात आजी व माजी मंत्र्यांसह विविध पदाधिकारीदेखील सहभागी झाले होते. मात्र यावेळी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा पार फज्जा उडाल्याचे चित्र होते. शिवाय अनेक जण ‘मास्क’ न घालता वावरत असल्याचे चित्र होते. अशा गर्दीत एखादा जरी व्यक्ती कोरोनाबाधित असला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.केवळ काँग्रेसच नव्हे तर भाजपकडूनदेखील ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन होत नसल्याची स्थिती आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठविण्याची मोहीम सुरू आहे. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्रित येताना ‘कोरोना’च्या बाबतीत काळजी घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे.सामाजिक संघटनांनीदेखील ‘डिस्टन्सिंग’ पाळावेकेंद्र सरकारविरोधात संघप्रणित ‘भामसं’कडून ‘सरकार जगाओ’ मोहीम राबविण्यात येत आहे. यात होत असलेल्या निदर्शनांमध्ये लोक जवळजवळ उभे राहून घोषणा देत आहेत. अनेक जण तर ‘मास्क’ न घालता वावरत आहेत. अद्याप ‘कोरोना’चा धोका संपलेला नाही याचा त्यांना विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर