शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

थकबाकीदारांना शास्ती माफी नाही : पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाची धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 21:20 IST

बिकट आर्थिक स्थितीतून सावरण्यासाठी मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या घरटॅक्स व पाणीपट्टी वसुलीवर महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. घरटॅक्स वसुलीतून २०१९-२० या वर्षात ५३१ कोटींचे तर पाणीपट्टीतून १६६ कोटी वसुलीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआर्थिक परिस्थितीमुळे आयुक्तांचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिकट आर्थिक स्थितीतून सावरण्यासाठी मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या घरटॅक्स व पाणीपट्टी वसुलीवर महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. घरटॅक्स वसुलीतून २०१९-२० या वर्षात ५३१ कोटींचे तर पाणीपट्टीतून १६६ कोटी वसुलीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. परंतु पाणीपट्टीच्या वित्त वर्षातील बिलाच्या तुलनेत थकीत बिलाची रक्कम मोठी आहे. अशीच अवस्था मालमत्ता कराची असल्याने थकीत करावरील शास्ती माफ केल्यास वसुलीवर परिणाम होणार आहे. यामुळे थकबाकीदारांना शास्ती माफ करणार नसल्याचे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.गतकाळात वेळोवेळी शास्ती माफ करण्यात आली आहे. त्यानंतरही थकबाकी वसुलीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. शास्ती माफ करण्याचा अधिकार हा महापालिका कायद्यानुसार आयुक्तांना आहे. सध्याची महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता, शास्ती माफ करण्याचा विचार नसल्याचे आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले आहे. मालमत्ता करापासून २५ जानेवारीपर्यंत २०५ कोटी वसूल झाले आहे. हा आकडा मार्च अखेरीस २६० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता नाही.पाणीपट्टीतून १६६ कोटींची वसुली अपेक्षित आहे. मनपाच्या तिजोरीत १४० कोटी जमा झाले आहे. पुढील ३५ दिवसात यात १० ते १५ कोटींची भर पडणार आहे. उद्दिष्टपूर्तीच्या दिशेन वसुली असली तरी जुनी थकबाकी १९९ कोटींच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत शास्ती माफ केल्यास मनपाच्या वसुलीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यापूर्वी वेळोवेळी शास्ती माफ करून वसुली मोहीम राबविण्यात आली होती. परंतु त्यानंतरही थकबाकी कायम आहे.वर्ष २०१९-२० मध्ये २,३८८ कोटी खर्चाचा अंदाज आहे तर उत्पन्न २,४०० कोटींच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच स्थायी समितीचा अर्थसंकल्प व वास्तविक उत्पन्न यात दरवर्षी २० टक्के तफावत आहे. त्यातच मनपाकडे एकूण ४९५.५१ कोटींची देणी थकीत आहे. यावरून स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात ८०० कोटींची कपात होण्याची शक्यता आहे. आयुक्तांच्या अर्थसंकल्पानंतर निधीअभावी काही मोठे प्रकल्प प्रभावित होण्याची शक्यता आहे.आयुक्तांच्या अर्थसंकल्पात स्थिती स्पष्टमहापालिका आयुक्त यांनी वर्ष २०१९-२० चा सुधारित व वर्ष २०२०-२१ चा प्रस्तावित अर्थसंकल्प मांडल्यानंतर महापालिकेच्या आर्थिक स्थितीचे चित्र स्पष्ट होणार आहे. यातून ३१ मार्चपर्यंत जमा होणारा महसूल व खर्च आणि दायित्व याची स्थिती स्पष्ट होईल. खर्च व दायित्वानंतर निधी शिल्लक राहत असल्यास आवश्यक सुविधांच्या विकासकामांना प्राधान्याने निधी वाटप केला जाईल, असे प्रशासनाकडून संकेत देण्यात आले आहे.४५४ कोटींची थकबाकीनागपूर शहरात ६ लाख १३ हजार मालमत्ता आहेत. यातील ५ लाख ५० हजार मालमत्ताधारकांना डिमांड वाटप केले आहे. चार लाख ४३ हजार १४६ मालमत्ताधारकांकडे ५१४ कोटींची थकबाकी होती. यातील १ लाख १० हजार मालमत्ताधारकांनी ६० कोटींची थकबाकी भरली आहे. तीन लाख ३३ हजार ८७ मालमत्ताधारकांकडे ४५४ कोटींची थकबाकी कायम आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर