शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी

By योगेश पांडे | Updated: April 30, 2025 21:32 IST

‘संघ गंगाके तीन भगिरथ’ नाटकाचे उद्घाटन

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: भगिरथाने प्रयत्न करून भारतात गंगा आणली आणि तिने देशाला सुजलाम सुफलाम केले. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अनेक भगिरथांनी आयुष्य समिधा अर्पण करुन समाजात पोहोचविले आहे. आज संघाने विशाल रूप धारण केले आहे. ज्याप्रमाणे गंगेच्या प्रवाहाला थांबविता येत नाही, त्याचप्रमाणे संघाला थांबविण्याचेदेखील कुणाकडेच साहस नाही, असे प्रतिपादन संघाचे माजी सरकार्यवाह व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले. बुधवारी ‘संघ गंगा के तीन भगिरथ’ या नाटकाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

वनामती येथे आयोजित या नाटकाच्या उद्घाटन सोहळ्याला विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, सहसंघचालक व नाटकाचे लेखक श्रीधर गाडगे प्रामुख्याने उपस्थित होते. हे नाटक संघाचे प्रथम तीन सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार, गोळवलकर गुरूजी व बाळासाहेब देवरस यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारे आहे. देश गंगेमुळे सुजलाम सुफलाम झाला व त्याचे खरे कारण भगिरथ आहे. संघाच्या गंगेतदेखील पहिले तीन सरसंघचालक हे भगिरथासारखेच होते. रामायण, महाभारत कुणीही प्रत्यक्ष पाहिलेले नाही, त्यामुळे त्याचे नाट्य उभारताना एखादा प्रसंग पाहताना मनात शंका येत नाही. मात्र संघाच्या तीन भगिरथांचे आपण साक्षीदार आहोत. त्यांनी समाजातील शुद्ध प्रवाह अविरल चालत राहील यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले. जोपर्यंत समाजाला आवश्यकता असेल तोपर्यंत संघप्रवाह सुरूच असेल, असे भय्याजी म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ प्रचारक रविंद्र भुसारी, दिलीप जाजू, निखील मुंडले, निलिमा बावणे, अरुणा पुरोहित हेदेखील उपस्थित होते.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर