शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

क्वारंटाईन सेंटरमुळे संसर्ग परसला नाही : मनपा आयुक्तांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:33 IST

क्वारंटाईन सेंटरमध्ये व्यवस्थापनाचा अभाव आणि निकृष्ट जेवण मिळत असल्याबाबतच्या आरोपात तथ्य नाही,असा दावा करताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, सात्विक जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. स्वच्छता राखली जात आहे. क्वारंटाईन सेंटरमुळे संसर्ग पसरत असल्याचे वारंवार होत असलेले आरोप चुकीचे आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊन शिथिल झाल्यास जनतेला नियम पाळावे लागतील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: क्वारंटाईन सेंटरमध्ये व्यवस्थापनाचा अभाव आणि निकृष्ट जेवण मिळत असल्याबाबतच्या आरोपात तथ्य नाही,असा दावा करताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, सात्विक जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. स्वच्छता राखली जात आहे. क्वारंटाईन सेंटरमुळे संसर्ग पसरत असल्याचे वारंवार होत असलेले आरोप चुकीचे आहेत.कारण रविनगर केंद्रातील एका खोलीतील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला होता तर दुसरी व्यक्ती निगेटिव्ह होती. अशा परिस्थितीत, केंद्रामुळे संसर्ग वाढत आहे असे म्हणता येणार नाही.आयुक्तांनी फेसबुक लाईव्हमधून शहरातील नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. लॉकडाऊन शिथिल झाल्यास जनतेला नियम पाळावे लागतील, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. शारीरिक अंतर पाळण्याची जबाबदारी दुकानदार आणि आस्थापना प्रमुखांची असेल. मास्क वापरणे बंधनकारक राहील.आयुक्त म्हणाले, असे आढळून आले आहे की, जेव्हा एखादा गंभीर रुग्ण खासगी रुग्णालयात येतो तेव्हा त्याला कोविड-१९ चा रिपोर्ट संदर्भात विचारणा केली जाते किंवा नमुने घेतले जातात. संबंधित रुग्णाला त्वरित उपचाराची गरज आहे म्हणून त्यावर तातडीने उपचार करा. अहवालाची वाट पाहू नका. मार्गदर्शक सूचना देखील असेच सांगते.मानपा रुग्णालयांच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. नागपूरात आलो तेव्हा परिस्थिती चांगली नव्हती. परंतु आता ४०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ती कॉपोर्रेट हॉस्पिटलपेक्षा कमी नाही. ते म्हणाले की कोविड -१९ ची सध्या जी परिस्थिती नागपुरात आहे, याचे श्रेय संपूर्ण टीमला आहे. झालेल्या चुका किंवा अपयश यासाठी मी आयुक्त म्हणून जबाबदार आहे.प्रसिद्धीसाठी काम करत नाहीआयुक्त म्हणाले की, सरकारच्या दिशानिर्देशांचे पालन करून लोकांचे कल्याण करावयाचे आहे. मी नियम व कायद्याच्या कक्षेत राहून अधिक चांगले काम करतो. मी ग्राउंड लेव्हलवर काम करतो. प्रसिध्दीसाठी कधीही काम केले नाही. कोविडचा संसर्ग वाढताच सतरंजीपुरा, मोमीनपुरा येथे जाऊन उघडी दुकाने बंद केली.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेcorona virusकोरोना वायरस बातम्या