शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

क्वारंटाईन सेंटरमुळे संसर्ग परसला नाही : मनपा आयुक्तांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:33 IST

क्वारंटाईन सेंटरमध्ये व्यवस्थापनाचा अभाव आणि निकृष्ट जेवण मिळत असल्याबाबतच्या आरोपात तथ्य नाही,असा दावा करताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, सात्विक जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. स्वच्छता राखली जात आहे. क्वारंटाईन सेंटरमुळे संसर्ग पसरत असल्याचे वारंवार होत असलेले आरोप चुकीचे आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊन शिथिल झाल्यास जनतेला नियम पाळावे लागतील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: क्वारंटाईन सेंटरमध्ये व्यवस्थापनाचा अभाव आणि निकृष्ट जेवण मिळत असल्याबाबतच्या आरोपात तथ्य नाही,असा दावा करताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, सात्विक जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. स्वच्छता राखली जात आहे. क्वारंटाईन सेंटरमुळे संसर्ग पसरत असल्याचे वारंवार होत असलेले आरोप चुकीचे आहेत.कारण रविनगर केंद्रातील एका खोलीतील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला होता तर दुसरी व्यक्ती निगेटिव्ह होती. अशा परिस्थितीत, केंद्रामुळे संसर्ग वाढत आहे असे म्हणता येणार नाही.आयुक्तांनी फेसबुक लाईव्हमधून शहरातील नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. लॉकडाऊन शिथिल झाल्यास जनतेला नियम पाळावे लागतील, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. शारीरिक अंतर पाळण्याची जबाबदारी दुकानदार आणि आस्थापना प्रमुखांची असेल. मास्क वापरणे बंधनकारक राहील.आयुक्त म्हणाले, असे आढळून आले आहे की, जेव्हा एखादा गंभीर रुग्ण खासगी रुग्णालयात येतो तेव्हा त्याला कोविड-१९ चा रिपोर्ट संदर्भात विचारणा केली जाते किंवा नमुने घेतले जातात. संबंधित रुग्णाला त्वरित उपचाराची गरज आहे म्हणून त्यावर तातडीने उपचार करा. अहवालाची वाट पाहू नका. मार्गदर्शक सूचना देखील असेच सांगते.मानपा रुग्णालयांच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. नागपूरात आलो तेव्हा परिस्थिती चांगली नव्हती. परंतु आता ४०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ती कॉपोर्रेट हॉस्पिटलपेक्षा कमी नाही. ते म्हणाले की कोविड -१९ ची सध्या जी परिस्थिती नागपुरात आहे, याचे श्रेय संपूर्ण टीमला आहे. झालेल्या चुका किंवा अपयश यासाठी मी आयुक्त म्हणून जबाबदार आहे.प्रसिद्धीसाठी काम करत नाहीआयुक्त म्हणाले की, सरकारच्या दिशानिर्देशांचे पालन करून लोकांचे कल्याण करावयाचे आहे. मी नियम व कायद्याच्या कक्षेत राहून अधिक चांगले काम करतो. मी ग्राउंड लेव्हलवर काम करतो. प्रसिध्दीसाठी कधीही काम केले नाही. कोविडचा संसर्ग वाढताच सतरंजीपुरा, मोमीनपुरा येथे जाऊन उघडी दुकाने बंद केली.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेcorona virusकोरोना वायरस बातम्या