शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

काँग्रेस-राष्ट्रवादी नव्हे मोगलाई मराठ्यांची युती : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 20:30 IST

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील मराठा समाजातील नेत्यांना वर्चस्व हवे आहे. त्यामुळे त्यांच्यातील युती ही दोन पक्षांची नसून दोन जातींची असेल. मोगलाई मराठ्यांची ती युती असून त्याला केवळ पक्षाचे लेबल असेल, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे गुरुवारी केली. एका कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता रविभवन येथे पत्रकारांशी बोलत होते.

ठळक मुद्दे पक्षाचे केवळ लेबल, जातीला अधिक महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील मराठा समाजातील नेत्यांना वर्चस्व हवे आहे. त्यामुळे त्यांच्यातील युती ही दोन पक्षांची नसून दोन जातींची असेल. मोगलाई मराठ्यांची ती युती असून त्याला केवळ पक्षाचे लेबल असेल, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे गुरुवारी केली.एका कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता रविभवन येथे पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस पक्षाला १२ जागांची मागणी करण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आले नाही. मुळात काँग्रेसच इतर पक्षांना सोबत घेण्याच्या तयारीत नाही. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नवीन पर्याय उभा केला आहे. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव मान्य केला नाही तर लोकसभेच्या सर्व जागा लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली माणसे बसविण्यासाठी सीबीआयमध्ये फेरबदलमोदी सरकारला सत्तेतून घालविण्यासाठी राफेल मुख्य कारण ठरणार आहे. राफेल हा बोफोर्सपेक्षा मोठा घोटाळा असून हा गुन्हेगारी आणि फसवेगिरी स्वरूपाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेलच्या खरेदीप्रक्रिया संदर्भात तांत्रिक बाबींची माहिती मागितली आहे. सीबीआय महासंचालकांना त्याबाबत नोटीस बजावली होती. त्यामुळे खरेदी प्रक्रियातील बाबी समोर आल्या असत्या. त्या रोखण्यासाठीच मोदी सरकारने फेरबदल करून आपली माणसे बसविली, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारण