शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

यंदा उन्हाळ्यात शीतकक्ष स्थापनच झाले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 21:48 IST

उन्हाळ्यात उष्माघाताचे रुग्ण वाढत असल्याने दरवर्षी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासमोर उष्माघाताच्या रुग्णांवर उपचारासाठी उपाययोजना कराव्या लागतात. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात शीतकक्षाची स्थापना करावी लागते. आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी लागते. परंतु यंदा उन्हाळ्यात उष्माघाताचे रुग्ण आढळलेच नाहीत. त्यामुळे शीतकक्षच स्थापन झाले नाही.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात आढळले नाहीत उष्माघाताचे रुग्ण : कोरोना इफेक्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्यात उष्माघाताचे रुग्ण वाढत असल्याने दरवर्षी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासमोर उष्माघाताच्या रुग्णांवर उपचारासाठी उपाययोजना कराव्या लागतात. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात शीतकक्षाची स्थापना करावी लागते. आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी लागते. परंतु यंदा उन्हाळ्यात उष्माघाताचे रुग्ण आढळलेच नाहीत. त्यामुळे शीतकक्षच स्थापन झाले नाही.उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन किंबहुना उष्माघाताने कुणाचाही मृत्यू होऊ नये म्हणून दरवर्षी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शीतकक्ष स्थापन करण्यात येतो. एप्रिल महिना संपल्यानंतर मे महिन्यात तापमानात वाढ होते. याच महिन्यात शेतकरी शेतीमध्ये मशागतीचे काम करतात. उन्हातान्हात राबताना उष्माघाताच्या घटना घडतात. उन्हाळ्यात ग्रामीण भागात लग्नसराईसुद्धा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. शिवाय पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा होतो, परिणामी आजारपण वाढते. परंतु यंदा उन्हाळा संपूनही उष्माघाताचे रुग्ण आढळले नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाला शीतकक्ष स्थापन करण्याच्या भानगडी कराव्या लागल्या नाहीत. उष्माघाताचे रुग्ण न आढळण्यास कोरोना इफेक्ट म्हणावा लागेल. सरकारने २३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन केले. ग्रामीण भागात लॉकडाऊनचे कडेकोट पालन करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली नाही. कोरोनामुळे शेतीचे कामेही ठप्प पडलीत. मे महिन्यात तापमान ४७ वर पोहचले पण दोन-चार दिवसच उन्हाचे चटके सहन करावे लागले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अनेक वर्षानंतर पहिल्यांदा अतिशय कमी दिवस उन्हाचे चटके नागपूरकरांना बसले. कोरोनामुळे सामूहिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. वाहतुकीची साधने बंद करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागात लग्नसोहळे साजरे झाले नाहीत. वाहतुकीची साधने बंद असल्याने प्रत्येकजण आपल्याच घरात बसून होता. त्यामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढले नाहीत. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाला उष्माघातावर उपाययोजना करण्यासाठी शीतकक्ष स्थापन करावा लागला नाही. त्यासाठी कु लरची व्यवस्था, औषधांची व्यवस्था, उष्माघाताच्या रुग्णांसाठी औषधांचा मुबलक साठा ठेवावा लागला नाही.फक्त कोरोनावर लक्षकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने इतर उपक्रमांपेक्षा कोरोनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे ग्रामीण भागात राबविण्यात येणारे इतर सर्व उपक्रम बंद करण्यात आले. यंदा तापमानही जाणवले नाही. प्रत्येकजण घरातच असल्यामुळे उष्माघाताचे रुग्ण आढळले नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnagpurनागपूर