शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

ना रक्ततपासणी, ना सोनोग्राफी, १० ते १५ टक्के महिला थेट प्रसूतीलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

नागपूर : बाळाचा जन्म हा कुटुंबात सर्वांत आनंदाचा क्षण मानला जाताे. महिलेची गर्भधारणा झाल्यापासून प्रसूतीपर्यंत सर्व प्रकारच्या चाचण्या व ...

नागपूर : बाळाचा जन्म हा कुटुंबात सर्वांत आनंदाचा क्षण मानला जाताे. महिलेची गर्भधारणा झाल्यापासून प्रसूतीपर्यंत सर्व प्रकारच्या चाचण्या व साेनाेग्राफी आईच्या आराेग्यासाठी आणि बाळाच्या सुखरूप जन्मासाठी महत्त्वाच्या असतात. मात्र काेराेनामुळे या आवश्यक चाचण्यांचे प्रमाण कमी झाले व थेट प्रसूतीला जाण्याचे गंभीर प्रकार दिसून आले. जिल्ह्यात अशा गर्भवती महिलांचे प्रमाण १० ते १५ टक्के हाेते. यामुळे व्यंगबाळ जन्माला येण्याचे किंवा ऐनवेळी चाचण्या केल्याने गर्भपात करावे लागण्याचे प्रमाणही वाढल्याचे निदर्शनास आले.

काेराेनाच्या प्रकाेपामुळे अनेक गाेष्टींना अडथळे निर्माण झाले. विशेष म्हणजे गर्भवती महिलांनाही अनेक प्रकारचे त्रास भाेगावे लागले. उल्लेखनीय म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत प्रसूतीचे प्रमाणही घटले आहे. २०१९ मध्ये शहरात ५३ हजारांवर बाळजन्मांची नाेंद झाली. २०२० मध्ये घटून ती ४४ हजारांवर आली. २०२१ मध्ये पहिल्या पाच महिन्यांत त्यापेक्षा कमी प्रसूती झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यापेक्षा गंभीर म्हणजे गर्भधारणेनंतर आवश्यक असलेल्या चाचण्या करण्याचेही प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. शहरातील स्त्रीराेग व प्रसूतितज्ज्ञ डाॅ. चैतन्य शेंभेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात त्यांच्याकडे सव्वाशेच्या जवळपास प्रसूती झाल्या. त्यांपैकी ८२ ते ८५ प्रसूती सुखरूप झाल्या. मात्र काही महिलांना त्रासाचा सामना करावा लागला, तर १० प्रकरणांत ऐनवेळच्या तपासणीत बाळ व्यंग आढळल्याने गर्भपात करावा लागला. दुसऱ्या लाटेदरम्यान या समस्या वाढल्याचे दिसून आले.

स्त्रीराेगतज्ज्ञ डाॅ. राेहिणी पाटील यांनी सांगितले, काेराेनाकाळात अनेक महिलांनी प्रसूतिपूर्व चाचण्या करण्याचे टाळले. काहींनी काैटुंबिक अडचणीमुळे तर अनेकींनी काेराेना टेस्ट करण्याच्या भीतीमुळे साेनाेग्राफी व आवश्यक चाचण्या वेळेवर केल्या नाही. काही घरात काेराेना रुग्ण असल्याने किंवा कुणाचा मृत्यू झाल्याने येऊ शकल्या नाही. व्यंग बाळ जन्माचे प्रमाण कमी असले तरी हा प्रकार झाला. हा प्रकार सुदृढ बाळाच्या जन्मासाठी व मातेच्या आराेग्यासाठी धाेकादायक आहे.

प्रसूतीपर्यंतच्या चाचण्या

- ६ आठवड्यांत पहिली साेनाेग्राफी; तसेच रक्ततपासणी, हिमाेग्लाेबिन, सिकलसेल, थायराॅईड, ब्लड शुगर, एचआयव्ही गरजेची.

- १३ आठवडे : एनटी स्कॅन व डबल मार्कर टेस्ट तसेच साेनाेग्राफी अत्यावश्यक.

- १९ आठवडे : रक्ततपासणी व साेनाेग्राफी अत्यावश्यक.

- २४ आठवडे : बाळाचे ईकाे व ब्लड शुगर टेस्ट. हार्टबिट, किडनी, रक्तप्रवाह व पाण्याचे प्रमाण याेग्य आहे की नाही.

- २८ आठवडे : साेनाेग्राफी

- ३६ आठवडे : साेनाेग्राफी व ब्लड टेस्ट.

साेनाेग्राफी, चाचण्या आवश्यकच : डॉ. शेंभेकर (फोटो)

प्रसूतिरोगतज्ज्ञ डाॅ. चैतन्य शेंभेकर यांच्या मते गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत प्रत्येक टेस्ट व साेनाेग्राफी आवश्यक आहे; पण काही अत्यावश्यक आहेत. १३ व १९ आठवड्यांची टेस्ट व साेनाेग्राफी करणे गरजेचे आहे. यामुळे गर्भामध्ये काही व्यंग आहे का, बाळाला काही समस्या आहेत का, मेंटल रिटार्डेशन किंवा डाऊन सिन्ड्राेम आहेत का, हे लक्षात येते. साडेचार महिन्यांनंतरच्या तपासणीमध्ये बाळाचे हार्टबिट, किडनी व इतर अवयव याेग्य पद्धतीने विकसित झाले की नाही, ते लक्षात येते. व्यंग आढळल्यास उपाययाेजना करण्यात येते किंवा नाहीच शक्य झाले तर २० आठवड्यांच्या आत कायदेशीररीत्या गर्भपात करता येते. मात्र या चाचण्या चुकल्या तर ऐनवेळी उपाय करणे अडचणीचे जाते आणि माता व बाळाच्या जिवाला धाेका निर्माण हाेऊ शकताे.

कोट..

रुग्णालयात कुठलीही गर्भवती महिला आली तर सर्व प्रकारची तपासणी व साेनाेग्राफी करणे बंधनकारक आहे. ती रुग्णालयातून करा किंवा बाहेरून. गेल्या वर्षभरातही चाचण्या टाळल्याचे प्रकार झाले नाही. व्यंग बाळ जन्मल्याचीही नाेंद रुग्णालयात नाही.

- डाॅ. प्रशांत उईके, विभागप्रमुख, स्त्रीराेग व प्रसूती विभाग, मेयाे