शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बीएड, एमएड प्रवेश परीक्षेचे विदर्भात केंद्रच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:57 IST

विविध अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सद्यस्थितीत ‘बीएड’, ‘एमएड’ तीन वर्षीय ‘इंटिग्रेटेड’ अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या प्रवेशपरीक्षेचे विदर्भातील एकाही जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने परीक्षेसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरातील केंद्रांवर जावे लागणार आहे.

ठळक मुद्दे‘अभाविप’चा आक्षेप : १० दिवसात दिलासा न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सद्यस्थितीत ‘बीएड’, ‘एमएड’ तीन वर्षीय ‘इंटिग्रेटेड’ अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या प्रवेशपरीक्षेचे विदर्भातील एकाही जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने परीक्षेसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरातील केंद्रांवर जावे लागणार आहे.यासंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्षेप घेतला आहे. परिषदेने नागपूर विभागाच्या सहसंचालक डॉ.अर्चना नेरकर यांना निवेदन देऊन विदर्भात परीक्षा केंद्र देण्याची मागणी केली आहे. या प्रवेश परीक्षेची माहिती ‘महासीईटी’ या ‘पोर्टल’वरुन सार्वजनिक करण्यात आली. परीक्षेच्या माहितीपत्रकात विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी एकाही ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आलेले नाही. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर याच शहरांची नावे नमूद आहे. त्यामुळे नाईलाजाने विद्यार्थ्यांना याच शहरांमध्ये परीक्षेसाठी जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडदेखील बसणार आहे. बरेच विद्यार्थी तर परीक्षेपासून वंचित राहतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता दहा दिवसाच्या आत विदर्भात परीक्षा केंद्र द्यावे. अन्यथा अभाविपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभाविपचे महानगर मंत्री वैभव बावनकर यांनी दिला आहे.यासंदर्भात सहसंचालकांनी मुख्यालयात पत्र पाठवून वरील घोळ लक्षात आणून दिला आहे. परीक्षा केंद्र वाढवून देण्यासंदर्भात संचालकांनी विचार करावा, असे यात नमूद आहे.

 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा