शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

‘२४ बाय ७’ पाणीपुरवठा नाहीच; 'ओसीडब्ल्यू'वर गडकरी नाखुश, त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 13:38 IST

या कंपनीच्या एकूणच कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे आदेश देत कंपनीच्या कामात सुधारणा झाली नाही तर तुमचे कंत्राट रद्द करावे लागेल, असा इशाराही गडकरी यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे‘२४ बाय ७‘ योजना पूर्ण करण्याची तारीख सांगा : पाण्याचे अंकेक्षण करून अहवाल द्या

नागपूर : उपराजधानीच्या प्रत्येक वस्तीत ‘२४ बाय ७’ पाणी मिळेल, असा दावा करीत शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी व्हिओलिया-ओसीडब्ल्यू या कंपनीवर सोपविण्यात आली होती. मात्र, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच या कंपनीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. या कंपनीच्या एकूणच कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे आदेश देत कंपनीच्या कामात सुधारणा झाली नाही तर तुमचे कंत्राट रद्द करावे लागेल, असा इशाराही गडकरी यांनी दिला आहे.

गडकरी यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी ओसीडब्ल्यूच्या पाणी वितरणाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी गडकरी म्हणाले, पेंच आणि कन्हानमधून पुरेसे पाणी मिळत असतानाही गेल्या १० वर्षांपासून संपूर्ण शहर पाणीसमस्येला तोंड देत आहे. महापालिका पाणी उपलब्ध करून देत आहे; पण वितरणाची जबाबदारी व्हिओलिया (ओसीडब्ल्यू) पार पाडत नाही. तुमचे काम समाधानकारक नाही. अधिकारी गांभीर्याने काम करीत नाहीत; त्यामुळे आम्ही बदनाम होतो आहे, अशा शब्दांत गडकरी यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

शहरातील एकाही भागाला २४ बाय ७ पाणीपुरवठा होऊ शकला नाही. संपूर्ण शहरात ही योजना कधी लागू होईल, याची तारीख आणि योजना राबविण्याचा संपूर्ण कार्यक्रम सादर करा, असे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीला आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आयुक्त राधाकृष्णन बी. ओसीडब्ल्यूचे बाबू, सिंग व अन्य अधिकारी उपस्थित होते.

अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकली नाही

पाणीपुरवठ्यासाठी अनेक ठिकाणी अजूनही पाईपलाईन टाकण्यात आली नाही. करारानुसार पाईपलाईन कंपनीला टाकणे आवश्यक असताना त्याकडे लक्ष दिले जात नाही. प्रायोगिक स्तरावर एका झोनमध्ये ही योजना राबविली; पण तेथेही २४ तास पाणी नाही. गडकरी यांनी व्हिओलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीत यांच्याशी ऑनलाईन संपर्क साधला व आपली नापसंती व्यक्त केली.

४० टक्के पाणी कुठे मुरतेय ?

शहराला रोज ७०० एमएलडी पाणीपुरवठा होत असताना केवळ ६० टक्के पाण्याचे बिलिंग होते. ४० टक्के पाणी कुठे जाते हे शोधण्यात कंपनी अपयशी ठरली असल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आला. शहरात ५० हजार कनेक्शन अवैध असल्याचेही सांगण्यात आले. ग्राहकांकडे लावण्यात आलेले मीटरचे पैसे केंद्र शासनाच्या निधीतून देण्यात आले. मग कंपनीला कोणता भुर्दंड बसला? असा सवालही उपस्थित झाला.

टॅग्स :WaterपाणीNitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका