शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘२४ बाय ७’ पाणीपुरवठा नाहीच; 'ओसीडब्ल्यू'वर गडकरी नाखुश, त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 13:38 IST

या कंपनीच्या एकूणच कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे आदेश देत कंपनीच्या कामात सुधारणा झाली नाही तर तुमचे कंत्राट रद्द करावे लागेल, असा इशाराही गडकरी यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे‘२४ बाय ७‘ योजना पूर्ण करण्याची तारीख सांगा : पाण्याचे अंकेक्षण करून अहवाल द्या

नागपूर : उपराजधानीच्या प्रत्येक वस्तीत ‘२४ बाय ७’ पाणी मिळेल, असा दावा करीत शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी व्हिओलिया-ओसीडब्ल्यू या कंपनीवर सोपविण्यात आली होती. मात्र, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच या कंपनीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. या कंपनीच्या एकूणच कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे आदेश देत कंपनीच्या कामात सुधारणा झाली नाही तर तुमचे कंत्राट रद्द करावे लागेल, असा इशाराही गडकरी यांनी दिला आहे.

गडकरी यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी ओसीडब्ल्यूच्या पाणी वितरणाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी गडकरी म्हणाले, पेंच आणि कन्हानमधून पुरेसे पाणी मिळत असतानाही गेल्या १० वर्षांपासून संपूर्ण शहर पाणीसमस्येला तोंड देत आहे. महापालिका पाणी उपलब्ध करून देत आहे; पण वितरणाची जबाबदारी व्हिओलिया (ओसीडब्ल्यू) पार पाडत नाही. तुमचे काम समाधानकारक नाही. अधिकारी गांभीर्याने काम करीत नाहीत; त्यामुळे आम्ही बदनाम होतो आहे, अशा शब्दांत गडकरी यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

शहरातील एकाही भागाला २४ बाय ७ पाणीपुरवठा होऊ शकला नाही. संपूर्ण शहरात ही योजना कधी लागू होईल, याची तारीख आणि योजना राबविण्याचा संपूर्ण कार्यक्रम सादर करा, असे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीला आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आयुक्त राधाकृष्णन बी. ओसीडब्ल्यूचे बाबू, सिंग व अन्य अधिकारी उपस्थित होते.

अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकली नाही

पाणीपुरवठ्यासाठी अनेक ठिकाणी अजूनही पाईपलाईन टाकण्यात आली नाही. करारानुसार पाईपलाईन कंपनीला टाकणे आवश्यक असताना त्याकडे लक्ष दिले जात नाही. प्रायोगिक स्तरावर एका झोनमध्ये ही योजना राबविली; पण तेथेही २४ तास पाणी नाही. गडकरी यांनी व्हिओलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीत यांच्याशी ऑनलाईन संपर्क साधला व आपली नापसंती व्यक्त केली.

४० टक्के पाणी कुठे मुरतेय ?

शहराला रोज ७०० एमएलडी पाणीपुरवठा होत असताना केवळ ६० टक्के पाण्याचे बिलिंग होते. ४० टक्के पाणी कुठे जाते हे शोधण्यात कंपनी अपयशी ठरली असल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आला. शहरात ५० हजार कनेक्शन अवैध असल्याचेही सांगण्यात आले. ग्राहकांकडे लावण्यात आलेले मीटरचे पैसे केंद्र शासनाच्या निधीतून देण्यात आले. मग कंपनीला कोणता भुर्दंड बसला? असा सवालही उपस्थित झाला.

टॅग्स :WaterपाणीNitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका