शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

‘२४ बाय ७’ पाणीपुरवठा नाहीच; 'ओसीडब्ल्यू'वर गडकरी नाखुश, त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 13:38 IST

या कंपनीच्या एकूणच कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे आदेश देत कंपनीच्या कामात सुधारणा झाली नाही तर तुमचे कंत्राट रद्द करावे लागेल, असा इशाराही गडकरी यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे‘२४ बाय ७‘ योजना पूर्ण करण्याची तारीख सांगा : पाण्याचे अंकेक्षण करून अहवाल द्या

नागपूर : उपराजधानीच्या प्रत्येक वस्तीत ‘२४ बाय ७’ पाणी मिळेल, असा दावा करीत शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी व्हिओलिया-ओसीडब्ल्यू या कंपनीवर सोपविण्यात आली होती. मात्र, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच या कंपनीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. या कंपनीच्या एकूणच कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे आदेश देत कंपनीच्या कामात सुधारणा झाली नाही तर तुमचे कंत्राट रद्द करावे लागेल, असा इशाराही गडकरी यांनी दिला आहे.

गडकरी यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी ओसीडब्ल्यूच्या पाणी वितरणाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी गडकरी म्हणाले, पेंच आणि कन्हानमधून पुरेसे पाणी मिळत असतानाही गेल्या १० वर्षांपासून संपूर्ण शहर पाणीसमस्येला तोंड देत आहे. महापालिका पाणी उपलब्ध करून देत आहे; पण वितरणाची जबाबदारी व्हिओलिया (ओसीडब्ल्यू) पार पाडत नाही. तुमचे काम समाधानकारक नाही. अधिकारी गांभीर्याने काम करीत नाहीत; त्यामुळे आम्ही बदनाम होतो आहे, अशा शब्दांत गडकरी यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

शहरातील एकाही भागाला २४ बाय ७ पाणीपुरवठा होऊ शकला नाही. संपूर्ण शहरात ही योजना कधी लागू होईल, याची तारीख आणि योजना राबविण्याचा संपूर्ण कार्यक्रम सादर करा, असे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीला आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आयुक्त राधाकृष्णन बी. ओसीडब्ल्यूचे बाबू, सिंग व अन्य अधिकारी उपस्थित होते.

अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकली नाही

पाणीपुरवठ्यासाठी अनेक ठिकाणी अजूनही पाईपलाईन टाकण्यात आली नाही. करारानुसार पाईपलाईन कंपनीला टाकणे आवश्यक असताना त्याकडे लक्ष दिले जात नाही. प्रायोगिक स्तरावर एका झोनमध्ये ही योजना राबविली; पण तेथेही २४ तास पाणी नाही. गडकरी यांनी व्हिओलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीत यांच्याशी ऑनलाईन संपर्क साधला व आपली नापसंती व्यक्त केली.

४० टक्के पाणी कुठे मुरतेय ?

शहराला रोज ७०० एमएलडी पाणीपुरवठा होत असताना केवळ ६० टक्के पाण्याचे बिलिंग होते. ४० टक्के पाणी कुठे जाते हे शोधण्यात कंपनी अपयशी ठरली असल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आला. शहरात ५० हजार कनेक्शन अवैध असल्याचेही सांगण्यात आले. ग्राहकांकडे लावण्यात आलेले मीटरचे पैसे केंद्र शासनाच्या निधीतून देण्यात आले. मग कंपनीला कोणता भुर्दंड बसला? असा सवालही उपस्थित झाला.

टॅग्स :WaterपाणीNitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका