शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

मनपाला हायड्रन्टसाठी कंत्राटदार मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:27 IST

शहरात आगीची घटना घडल्यानंतर होणारी धावपळ टाळण्यासाठी व वेळीच आग आटोक्यात यावी यासाठी अग्निशमन विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी ११६ हायड्रन्ट लावण्याचे प्रस्तावित आहे. परंतु याबाबतच्या चारदा निविदा काढूनही कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे यासाठी जलप्रदाय विभागालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

ठळक मुद्देचारदा निविदा काढूनही प्रतिसाद नाही : महत्त्वाच्या ठिकाणी ११६ हायड्रन्ट लावणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात आगीची घटना घडल्यानंतर होणारी धावपळ टाळण्यासाठी व वेळीच आग आटोक्यात यावी यासाठी अग्निशमन विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी ११६ हायड्रन्ट लावण्याचे प्रस्तावित आहे. परंतु याबाबतच्या चारदा निविदा काढूनही कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे यासाठी जलप्रदाय विभागालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.१९४७ च्या सुमारास शहरात एक हजार हायड्रन्ट होते. कुठे आग लागल्यास रस्त्याच्या शेजारी असलेल्या या हायड्रन्टमधून अग्निशमनच्या बंबांना २४ तास पाणीपुरवठा करण्याची सोय होती. त्यामुळे पाण्याने भरलेल्या बंबांची प्रतीक्षा करावी लागत नव्हती. कालांतराने शहराचा विकास झाला. रस्ते रुंद झाले. या रस्त्यांच्या कामात हायड्रन्ट हरवले.शहरात कोणत्याही भागात आग लागल्यास हायड्रन्टमुळे पाणी उपलब्ध होत होते. मात्र, गतकाळात याकडे दुर्लक्ष झाले. पाईपलाईन टाकताना असलेल्या हायड्रन्टला जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे आज शहरात केवळ १३ हायड्रन्ट उरले आहेत. शहराच्या सर्व भागात हायड्रन्ट नसल्याने आग लागल्यास अग्निशमन विभागाला धावपळ करून जलकुंभांवरून पाणी भरावे लागते. याला अनेकदा वेळ लागतो. अशापरिस्थितीत आगीमुळे मोठे नुकसान होते. याचा विचार करता अग्निशमन व जलप्रदाय विभागाने शहरात संयुक्त सर्वेक्षण करून हायड्रन्टसाठी ११६ ठिकाणे निश्चित केली. जलप्रदाय समिती व स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर जलप्रदाय विभागाने याबाबतच्या ४९.९९ लाखांच्या निविदा काढल्या, परंतु चारवेळा निविदा काढूनही कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळालेला नाही.शहराची लोकसंख्या आज ४० लाखाच्या घरात पोहचली आहे. मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने इमारतींची संख्या वाढली आहे. शहराचा झालेला विस्तार व वाढलेल्या इमारती विचारात घेता, हायड्रन्टची गरज निर्माण झाली आहे.अग्निशमन विभागाने हायड्रन्ट लावण्यासाठी ११६ जागांची निवड केली आहे. यातील ११६ नवीन फायर हायड्रन्ट लावण्याचे प्रस्तावित आहे. प्रस्ताव तयार करताना नवीन हायड्रन्ट लावण्यासोबतच बंद असलेल्या व दुरुस्त करण्याजोग्या हायड्रन्टची दुरुस्ती केली जाणार आहे. नवीन ११६ हायड्रन्ट उभारण्याकरिता ४९.९९ लाखांची निविदा काढण्यात आली, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे आजवर जलप्रदाय विभागाने याकडे लक्ष दिले नव्हते. आता निविदा काढल्या तर कंत्राटदारांचा प्रतिसाद नाही. त्यामुळे यासाठी जलप्रदाय विभागालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfireआग