शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

हे सगळेच बंडखोर अडीच वर्षे सरकारमध्ये राहिले तरी कसे? नितीन राऊत यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 11:47 IST

राऊत यांना शिवसेनेतील बंडखोरांकडून होत असलेल्या आरोपांबाबत विचारले असता त्यांनी उपरोक्त सवाल केला.

ठळक मुद्देकोरोना आटोक्यात, वीज कंपन्याही फायद्यात

नागपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे शिवसेनेला संपवायला चालले होते, असा आरोप शिवसेनेतील बंडखोर सातत्याने करताहेत. बंडखोरांचा हा आक्षेप होता तर मग हे बंडखोर अडीच वर्षे महाविकास आघाडीमध्ये राहिले कसे, असा सवाल काँग्रेसचे नेते व माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी येथे केला.

प्रेस क्लबतर्फे आयोजित ‘मिट द प्रेस’ या कार्यक्रमात नितीन राऊत यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना शिवसेनेतील बंडखोरांकडून होत असलेल्या आरोपांबाबत विचारले असता त्यांनी उपरोक्त सवाल केला. राऊत म्हणाले, शिवसेनेत जे झाले ते दुर्दैवी आहे. त्याबाबत मी अधिक बोलू शकत नाही; परंतु जे घडलं ते दुर्दैवी आहे. 

यावेळी त्यांनी त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांबाबतही सांगितले. कोरोनामुक्त नागपूर आणि महापारेषण, महानिर्मिती व महावितरण या तिन्ही वीज कंपन्या फायद्यात आणण्याचे महत्त्वाचे कार्य आपल्या कार्यकाळात झाले. याशिवाय अनेक प्रकल्प मार्गी लावण्यात यश आले. आपण आपल्या कार्यकाळात कुणाशीही दुजाभाव केला नाही. विकासकामाला प्राधान्य दिले, याचे समाधान आहे, असे राऊत म्हणाले.

देशभरात कोळशाची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. वीज संकट निर्माण झाले. अनेक राज्यांमध्ये लोडशेडिंग जाहीर झाले; परंतु महाराष्ट्रात आपण लोडशेडिंग होऊ दिले नाही. यासोबतच राज्यात ३० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार केले. त्यापैकी ५ हजार कोटींची गुंतवणूक विदर्भातील आहे. यात सहा कंपन्या विदर्भात येणार असून, ४ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल. यासोबतच डॉ. आंबेडकर कन्वेंशन सेंटर पूर्णत्वास आले. डॉ. आंबेडकर रुग्णालयाचे श्रेणीवर्धन केले. लोकसंवादच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, जोसेफ राव व ज्येष्ठ संपादक एस.एन. विनोद उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Rautनितीन राऊत