शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हे सगळेच बंडखोर अडीच वर्षे सरकारमध्ये राहिले तरी कसे? नितीन राऊत यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 11:47 IST

राऊत यांना शिवसेनेतील बंडखोरांकडून होत असलेल्या आरोपांबाबत विचारले असता त्यांनी उपरोक्त सवाल केला.

ठळक मुद्देकोरोना आटोक्यात, वीज कंपन्याही फायद्यात

नागपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे शिवसेनेला संपवायला चालले होते, असा आरोप शिवसेनेतील बंडखोर सातत्याने करताहेत. बंडखोरांचा हा आक्षेप होता तर मग हे बंडखोर अडीच वर्षे महाविकास आघाडीमध्ये राहिले कसे, असा सवाल काँग्रेसचे नेते व माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी येथे केला.

प्रेस क्लबतर्फे आयोजित ‘मिट द प्रेस’ या कार्यक्रमात नितीन राऊत यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना शिवसेनेतील बंडखोरांकडून होत असलेल्या आरोपांबाबत विचारले असता त्यांनी उपरोक्त सवाल केला. राऊत म्हणाले, शिवसेनेत जे झाले ते दुर्दैवी आहे. त्याबाबत मी अधिक बोलू शकत नाही; परंतु जे घडलं ते दुर्दैवी आहे. 

यावेळी त्यांनी त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांबाबतही सांगितले. कोरोनामुक्त नागपूर आणि महापारेषण, महानिर्मिती व महावितरण या तिन्ही वीज कंपन्या फायद्यात आणण्याचे महत्त्वाचे कार्य आपल्या कार्यकाळात झाले. याशिवाय अनेक प्रकल्प मार्गी लावण्यात यश आले. आपण आपल्या कार्यकाळात कुणाशीही दुजाभाव केला नाही. विकासकामाला प्राधान्य दिले, याचे समाधान आहे, असे राऊत म्हणाले.

देशभरात कोळशाची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. वीज संकट निर्माण झाले. अनेक राज्यांमध्ये लोडशेडिंग जाहीर झाले; परंतु महाराष्ट्रात आपण लोडशेडिंग होऊ दिले नाही. यासोबतच राज्यात ३० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार केले. त्यापैकी ५ हजार कोटींची गुंतवणूक विदर्भातील आहे. यात सहा कंपन्या विदर्भात येणार असून, ४ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल. यासोबतच डॉ. आंबेडकर कन्वेंशन सेंटर पूर्णत्वास आले. डॉ. आंबेडकर रुग्णालयाचे श्रेणीवर्धन केले. लोकसंवादच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, जोसेफ राव व ज्येष्ठ संपादक एस.एन. विनोद उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Rautनितीन राऊत