शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जो प्रदेशाध्यक्ष होतो, तो पुढे काय काय होतो, फडणवीस केंद्रात गेल्यावर...; गडकरींची धमाल बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 14:59 IST

राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर राज्यात भाजपामध्ये खांदेपालट झाला. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली तर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे.

नागपूर-

राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर राज्यात भाजपामध्ये खांदेपालट झाला. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली तर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे. बावनकुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आज त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. सर्वांनी बावनकुळे यांचा आजवरचा जीवनप्रवास उलगडून सांगितला आणि त्यांचं अभिनंदन केलं. पण सर्वाधिक लक्ष वेधलं ते म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणानं. गडकरींनी आपल्या स्टाइलमध्ये तुफान फटकेबाजी यावेळी केली. 

"आपल्यातला एक कार्यकर्ता आज महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे. तुम्हाला माहितच आहे जो प्रदेशाचा अध्यक्ष होतो तो पुढे काय काय होतो. म्हणजे मी मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देत नाहीय बरं, नाहीतर मीडियामध्ये माझ्या नावानं जे मी बोललो नाही ते माझ्या नावावर खपवून देतात. फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, पण ते केंद्रात गेल्यावर नंतर बावनकुळे तुमचा विचार होऊ शकतो", असं नितीन गडकरी मिश्किलपणे म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकला. भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी बावनकुळेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीलाही सुरुवात केली. 

"बावनकुळेंना येणाऱ्या काळामध्ये पक्षाची सेवा करण्याची संधी आहे. तसंच त्यांच्या कतृत्वालाही वाव मिळणार आहे. हा पक्ष कार्यकर्त्याचा पक्ष आहे. पिता-पुत्राचा किंवा आई-मुलाचा हा पक्ष नाही. एक ऑटोरिक्षा चालवणारा सामान्य माणूस आज महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला तो आपल्या कतृत्वानं आणि कामानं. हे भाजपाचं वैशिष्ट्य आहे. एका कार्यकर्त्याचा सन्मान होणं हे माझ्यासहीत देवेंद्र फडणवीसांसहीत सर्व कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा विषय आहे", असं नितीन गडकरी म्हणाले. 

महाराष्ट्राचं भविष्य बदलण्याची भाजपामध्ये ताकद"बावनकुळे जरी महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष झाले असले तरी त्यांना नागपूर जिल्ह्यामध्ये शासकीय कामांमध्येही लक्ष द्यावं आणि मदत करावी एवढी मी त्यांना नक्कीच विनंती करेन. कारण त्यांना हे प्रश्न माहित आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पक्षाला येणाऱ्या काळामध्ये आपली शक्ती वाढविण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्राचं भविष्य बदलवण्याची ताकद जर कोणत्या पक्षात असेल तर ती ताकद फक्त भाजपामध्येच आहे. त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली शासनाचं काम तर होणारच आहे. पण तेवढं संघटन देखील मजबूत झालं पाहिजे. दोन्ही ताकदीतून पक्षाचा विस्तार आपल्याला करायचा आहे", असंही नितीन गडकरी म्हणाले. 

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस