शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जो प्रदेशाध्यक्ष होतो, तो पुढे काय काय होतो, फडणवीस केंद्रात गेल्यावर...; गडकरींची धमाल बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 14:59 IST

राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर राज्यात भाजपामध्ये खांदेपालट झाला. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली तर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे.

नागपूर-

राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर राज्यात भाजपामध्ये खांदेपालट झाला. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली तर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे. बावनकुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आज त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. सर्वांनी बावनकुळे यांचा आजवरचा जीवनप्रवास उलगडून सांगितला आणि त्यांचं अभिनंदन केलं. पण सर्वाधिक लक्ष वेधलं ते म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणानं. गडकरींनी आपल्या स्टाइलमध्ये तुफान फटकेबाजी यावेळी केली. 

"आपल्यातला एक कार्यकर्ता आज महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे. तुम्हाला माहितच आहे जो प्रदेशाचा अध्यक्ष होतो तो पुढे काय काय होतो. म्हणजे मी मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देत नाहीय बरं, नाहीतर मीडियामध्ये माझ्या नावानं जे मी बोललो नाही ते माझ्या नावावर खपवून देतात. फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, पण ते केंद्रात गेल्यावर नंतर बावनकुळे तुमचा विचार होऊ शकतो", असं नितीन गडकरी मिश्किलपणे म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकला. भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी बावनकुळेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीलाही सुरुवात केली. 

"बावनकुळेंना येणाऱ्या काळामध्ये पक्षाची सेवा करण्याची संधी आहे. तसंच त्यांच्या कतृत्वालाही वाव मिळणार आहे. हा पक्ष कार्यकर्त्याचा पक्ष आहे. पिता-पुत्राचा किंवा आई-मुलाचा हा पक्ष नाही. एक ऑटोरिक्षा चालवणारा सामान्य माणूस आज महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला तो आपल्या कतृत्वानं आणि कामानं. हे भाजपाचं वैशिष्ट्य आहे. एका कार्यकर्त्याचा सन्मान होणं हे माझ्यासहीत देवेंद्र फडणवीसांसहीत सर्व कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा विषय आहे", असं नितीन गडकरी म्हणाले. 

महाराष्ट्राचं भविष्य बदलण्याची भाजपामध्ये ताकद"बावनकुळे जरी महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष झाले असले तरी त्यांना नागपूर जिल्ह्यामध्ये शासकीय कामांमध्येही लक्ष द्यावं आणि मदत करावी एवढी मी त्यांना नक्कीच विनंती करेन. कारण त्यांना हे प्रश्न माहित आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पक्षाला येणाऱ्या काळामध्ये आपली शक्ती वाढविण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्राचं भविष्य बदलवण्याची ताकद जर कोणत्या पक्षात असेल तर ती ताकद फक्त भाजपामध्येच आहे. त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली शासनाचं काम तर होणारच आहे. पण तेवढं संघटन देखील मजबूत झालं पाहिजे. दोन्ही ताकदीतून पक्षाचा विस्तार आपल्याला करायचा आहे", असंही नितीन गडकरी म्हणाले. 

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस