शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

इंटर मॉडेल स्टेशन अजनीतच, मात्र 'ग्रीन बेल्ट'ला वगळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 15:52 IST

कॉन्कोर टर्मिनल परिसरात खूप झाडे आहेत. हा भाग वगळण्यात येईल. उर्वरित भागात वनविभागाच्या सर्वेक्षणानुसार सुबाभळाची झाडे आहेत. आम्ही त्यांचे प्रत्यारोपण करू, असे गडकरी यांनी सांगितले.

ठळक मुद्देमध्यवर्ती कारागृह व सिंचन वसाहतीच्या जागा संपादित करण्याचा प्रस्ताव

आशिष रॉय

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : १२०० कोटी रुपयांचा ‘आयएमएस’ (इंटर मॉडेल स्टेशन) प्रकल्प अजनी येथेच उभारण्यात येणार असून, त्याच्या आराखड्यात सुधारणा करण्यात येईल. या परिसरातील हिरवा पट्टा वगळून त्याऐवजी रेल्वेचे काही क्वॉर्टर्स ताब्यात घेण्यात येईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

‘लोकमत’शी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. कॉन्कोर टर्मिनल परिसरात खूप झाडे आहेत. हा भाग वगळण्यात येईल. उर्वरित भागात वनविभागाच्या सर्वेक्षणानुसार सुबाभळाची झाडे आहेत. आम्ही त्यांचे प्रत्यारोपण करू, असे गडकरी यांनी सांगितले.

१२०० कोटी मंजूर करण्यात आल्याने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रथम फेज कार्यान्वित करेल. मी झाडे वाचविण्यासाठी जागा बदलली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. मध्यवर्ती कारागृह आणि सिंचन वसाहत असलेल्या जागा राज्य सरकारकडून संपादित करण्याचा प्रस्ताव आम्ही तयार करीत आहोत. आम्ही केंद्र सरकारकडून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे गोदामदेखील ताब्यात घेणार आहोत. आयएमएसचे उर्वरित तीन टप्पे या जमिनींवर येतील, असे त्यांनी सांगितले.

मी स्वत: पर्यावरणाचा समर्थक आहे. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री परिसरात दीड लाख झाडे पाडण्याची परवानगी दिली होती, परंतु आम्ही त्यांचे प्रत्यारोपण करत आहोत. दिल्लीतील द्वारका एक्स्प्रेसवे प्रकल्पासाठी तोडण्यासाठी आवश्यक असलेल्या १२,००० झाडांचे आम्ही यशस्वीपणे प्रत्यारोपण केले. आम्ही नागपुरातही त्याची पुनरावृत्ती करू, असे त्यांनी सांगितले.

पर्यावरण व राज्य शासनामुळे कंत्राटदाराने प्रकल्प सोडला

पर्यावरणवादी आणि राज्य सरकारच्या विरोधामुळे कंत्राटदाराने प्रकल्प सोडला असल्याची खंत गडकरी यांनी व्यक्त केली. आता सिमेंट आणि स्टीलचे दर दुप्पट झाले आहेत. ‘आयएमएस’च्या फेज-१ साठी अडीच हजार कोटी रुपये खर्च येऊ शकतात. ही जनतेच्याच पैशाची उधळपट्टी आहे, असे ते म्हणाले.

पर्यावरणवाद्यांशी चर्चा करणार

अजनी येथील ‘आयएमएस’वरील त्यांच्या हरकतींवर चर्चा करण्यासाठी शहरातील पर्यावरणप्रेमींना बोलवण्याची गडकरी यांची योजना आहे. मला त्यांच्या चिंता दूर करायच्या आहेत. मी हा प्रकल्प सोडण्याचे ठरविले होते. परंतु शहरातील अनेक व्यावसायिक आणि उद्योगपतींनी मला तसे न करण्याची विनंती केली. सुधारित आराखड्यालाही राज्य सरकारने विरोध केल्यास मी प्रकल्प वगळेल. मात्र त्यामुळे नागपूर आणि विदर्भाचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूरenvironmentपर्यावरण