शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कर्मचाऱ्यांनो वीजचोरी थांबवा अन्यथा... नितीन गडकरींचा वीज कर्मचाऱ्यांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 10:34 IST

वीज कर्मचाऱ्यांनी जर महावितरणची वीज चोरी थांबवली नाही तर भविष्यात त्यांच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे भ्रष्टाचार सोडून वीज कर्मचार्‍यांनी त्वरीत वीज चोरी थांबवावी असे आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले.

नागपूर : वीज कर्मचाऱ्यांनी जर महावितरणची वीजचोरी थांबवली नाही तर भविष्यात त्यांच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी त्वरित वीज चोरी थांबवावी, असे आवाहन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

भारतीय मजदूर संघाच्या संलग्न असलेल्या महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे नववे अधिवेशन शनिवारी रेशिमबाग स्मृती मंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन प्रसंगी गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी जयप्रकाश होळीकर होते. तसेच अमरसिंग ताखला, एल. पी. कटकवार, बाबासाहेब हरदास, अन्ना देसाई, दत्ता धामनकर, अनिल ढोमणे आदी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, जनरेशन कॉस्ट कमी झाली पाहिजे. आकोडा टाकून, वीज चोरी केली तर देशाचे काय होईल, राज्याचे काय होईल हे आत्ता सांगत नाही. पण तुम्ही वीज चोरी थांबवली नाही तर तुमच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा देशहितासाठी मी वीज चोरी होऊ देणार नाही, अशी शपथ घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक सुभाष सावजी यांनी केले. संचालन शंकर पहाडे यांनी तर सुनील बोक्षे यांनी आभार मानले.

टॅग्स :electricityवीजNitin Gadkariनितीन गडकरीEmployeeकर्मचारीtheftचोरी